AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार?, राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात देवेंद्रजी…

राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? यावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार?, राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात देवेंद्रजी...
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 02, 2022 | 8:41 AM
Share

मुंबई :  राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet expansion) कधी होणार? याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. याच प्रश्नावरून विरोधक शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवत आहेत. मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी इतका वेळ का लागत आहे? असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे राज्यात लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. मंत्रिमंडळाच्या यापूर्वीच्या विस्ताराला देखील विलंब झाला होता. तेव्हाही विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. दरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार करधी होणार? यावर आता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मंत्रिमंडळाचा (Cabinet) विस्तार कधी होणार याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार हा पक्षश्रेष्ठींना आहे. तेच याबाबत निर्णय घेतील असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. 

काय म्हणाले विखे पाटील?

दिवाळीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी शक्यता होती. याबाबत राधाकृष्ण विखे पाटील यांना विचारले असता, मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार हे ठरवण्याचा अधिकार हा पक्षश्रेष्ठींनाच असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याबाबत पक्षश्रेष्ठीच निर्णय घेतील.  देवेंद्रजींनी सांगितलं की लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

विरोधकांकडून टीका

दरम्यान मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून विरोधक राज्य सरकारवर टीकेची झोड उठवत आहेत.  सरकार अस्थिर असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. तर शिंदे गटातील प्रत्येक आमदाराला मंत्रिपद हवं आहे, त्यामुळे मंत्रिमंडळाच्या विस्ताराला विलंब होत असल्याची टीका काही दिवसांपूर्वी राष्ट्रावादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली होती. तर जोपर्यंत बहुमत आहे, तोपर्यंत सरकार सत्तेत राहील असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Follow Us
नाशिक TCS प्रकरणातील संशयित आरोपी मतीन पटेलला जामीन
नाशिक TCS प्रकरणातील मतीन पटेलला जामीन मंजूर
58 लाख नोंदींच्या प्रमाणपत्रांची मागणी;मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला थेट इशारा: ५८ लाख नोंदींची प्रमाणपत्रे हवीत, वेळ आल्यास सरकार पाडू
भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
बदलापूर वृक्ष प्राधिकरण नियुक्तीवरून भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
देवेंद्र फडणवीसांची धर्मेंद्र प्रधान यांच्याशी भेट; म्हणाले,‘माझे बंधू
फडणवीस-प्रधान भेट: माझे बंधू म्हणत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
बदलापुरात सीलबंद पाण्याच्या नावाखाली दूषित पाण्याची विक्री?
बदलापूरमध्ये सीलबंद पाण्याच्या नावाखाली अशुद्ध पाण्याची विक्री
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळला; कंत्राटदारांवर 12 कोटींचा दंड
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रो स्लॅब कोसळला, आदित्य ठाकरेंची कठोर कारवाईची मागणी
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या'...
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' निर्णयाने... फुटीर 6 खासदारांबाबत नवी अपडेट समोर
नवनाथ वाघमारेंचं वादग्रस्त वक्तव्य, नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्याचा निषेध, मराठा नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या...
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या बड्या नेत्यासह एकाच मंचवर, त्या व्हिडीओची तुफान चर्चा
सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
Sachin Ahir | सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...