AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK : पाकिस्तानने टॉस जिंकला, भारताची बॅटिंग, प्लेइंग ईलेव्हनमध्ये 2 बदल, कुणाला संधी?

India vs Pakistan Toss, T20i World Cup 2026 : टीम इंडिया आणि पाकिस्तान या दोन्ही संघांचा हा आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील तिसरा सामना आहे. दोन्ही संघ अजिंक्य आहेत.

IND vs PAK : पाकिस्तानने टॉस जिंकला, भारताची बॅटिंग, प्लेइंग ईलेव्हनमध्ये 2 बदल, कुणाला संधी?
IND vs PAK T20i World Cup 2026 TossImage Credit source: Social Media
| Updated on: Feb 15, 2026 | 6:49 PM
Share

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 27 व्या सामन्यात ए ग्रुपमधील 2 कट्टर आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने भिडण्यासाठी सज्ज आहेत. हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला आहे. पाकिस्तानच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा याने फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानने या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हन कोणताही बदल केलेला नाही. तर टीम इंडियाने या सामन्यासाठी बदल केले आहेत.

टीम इंडियात 2 बदल

टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये 2 बदल करण्यात आले आहेत.  टीम इंडियाचा ओपनर अभिषेक शर्मा याचं कमबॅक झालं आहे. त्यामुळे संजू सॅमसन याला बाहेर व्हावं लगालं आहे. तर कोलंबोतील ही खेळपट्टी फिरकीपटूंसाठी पोषक असल्याने अर्शदीप सिंह याच्या जागी कुलदीप यादव याला संधी देण्यात आली आहे.

हेड टु हेड रेकॉर्ड्स

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात एकूण 8 सामने खेळवण्यात आले आहेत. भारताने या 8 पैकी 7 सामने जिंकले आहेत. तर पाकिस्तानला एकमेव सामना जिंकता आला आहे. तर एकूणच टी 20i क्रिकेटमध्ये दोन्ही संघात एकूण 16 सामने झाले आहेत. त्यापैकी भारताने 13 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर पाकिस्तानला 3 सामनेच जिंकता आले आहेत.

1 विरुद्ध 6

टीम इंडिया आणि पाकिस्तान हा सामना 1 विरुद्ध 6 अशी लढत आहे. टीम इंडिया आयसीसी टी 20I रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी आहे. तर पाकिस्तान सहाव्या क्रमांकावर विराजमान आहे.

टीम इंडियाचा ‘दस का दम’

टीम इंडियाने आतापर्यंत आयसीसी टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत सलग 10 सामने जिंकले आहेत. भारताने नामिबिया आणि त्याआधी यूएसएवर मात केली आहे. तर भारताने टी 20I वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत खेळलेले सर्व 8 सामने जिंकले होते.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह.

पाकिस्तानचे 11 खेळाडू : सलमान आगा (कॅप्टन), सॅम अयुब, साहिबजादा फरहान, बाबर आझम, मोहम्मद नवाज, शादाब खान, फहीम अश्रफ, उस्मान खान (विकेटकीपर), शाहीन आफ्रिदी, अबरार अहमद आणि उस्मान तारीक.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.