AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Gandhi ED Inquiry : ‘कुत्ते की मौत मरेगा…’ राहुल गांधींच्या ईडी चौकशीवरुन काँग्रेस नेते घसरले, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जहरी टीका

महाराष्ट्रातही नागपूरमध्ये काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी नागपूर काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष शेख हुसेन यांनी मोदींवर जहरी टीका केलीय. तिकडे छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनीही मोदींवर जोरदार टीका केलीय.

Rahul Gandhi ED Inquiry : 'कुत्ते की मौत मरेगा...' राहुल गांधींच्या ईडी चौकशीवरुन काँग्रेस नेते घसरले, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जहरी टीका
राहुल गांधी, नरेंद्र मोदीImage Credit source: TV9
| Updated on: Jun 15, 2022 | 4:12 PM
Share

नागपूर : नॅशनल हेराल्ड केस (National Herald case) प्रकरणात काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांची चौकशी सुरु आहे. सलग तिसऱ्या दिवशी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची चौकशी सुरु आहे. त्यामुळे काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. देशात विविध राज्यात काँग्रेसकडून जोरदार आंदोलन करण्यात येतेय. अशास्थितीत आता काँग्रेस नेत्यांचा तोल गेल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातही नागपूरमध्ये (Nagpur) काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी नागपूर काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष शेख हुसेन यांनी मोदींवर जहरी टीका केलीय. तिकडे छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनीही मोदींवर जोरदार टीका केलीय.

नागपूरमध्ये ईडी कार्यालयाबाहेर काँग्रेसनं आंदोलन केलं. या आंदोलनावेळी बोलताना शेख हुसेन यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं. शेख हुसेन म्हणाले की, ‘नरेंद्र मोदी तेरा वही हाल होगा, जैसे कुत्ते की मौत होती है, ऐसे नरेंद्र मोदी की मौत होगी’. भले यासाठी मला हजार नोटीस मिळतील. मला त्याची चिंता नाही. आम्ही लढत आलो आहोत आणि पुढेही लढत राहू. शेख हुसेन यांनी मोदींवर केलेल्या टीकेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हुसेन यांच्या या टीकेवर भाजप नेत्यांनी तीव्र विरोध केलाय. या वक्तव्यावर गिट्टीखदान पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आलाय. भाजपने हुसेन यांच्या अटकेची मागणी केलीय. तसंच त्यांना अटक झाली नाही तर भाजपने आंदोलनाचा इशारा दिलाय.

भुपेश बघेल यांचा मोदींवर हल्लाबोल

तिकडे काँग्रेस नेते आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनीही मोदींवर जोरदार हल्ला चढवलाय. आम्ही आता आमचे कर्मचारी AICC कार्यालयही घेऊन येऊ शकत नाही. फक्त दोन मुख्यमंत्रीच इथे येऊ शकतात, अन्य कुणाला प्रवेश नाही असं आम्हाला सांगण्यात आलंय. त्यांनी राहुल गांधींच्या जबड्यात हात घालण्याचा प्रयत्न केलाय. त्यांना हे महागात पडेल, असा इशारा बघेल यांनी दिलाय.

राहुल गांधींची सलग तिसऱ्या दिवशी ईडी चौकशी

राहुल गांधींची सलग तिसऱ्या दिवशी चौकशी

राहुल गांधी यांची आज सलग तिसऱ्या दिवशी ईडी चौकशी सुरु आहे. कथित नॅशनल हेराल्ड प्रकरणात राहुल गांधी यांची चौकशी करण्यात येत आहे. पहिल्या दिवशी साडे साठ तास, दुसऱ्या दिवशी तब्बल 10 तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर आज पुन्हा एकदा राहुल गांधींना ईडी चौकशीला बोलावण्यात आलं. त्यामुळे काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते चांगलेच आक्रमक बनले आहेत. आज दिल्लीत काँग्रेस कार्यकर्त्यांकडून हिंसक आंदोलन करण्यात आलं. रस्त्यावर टायर जाळण्यात आले.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.