AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पराभव का झाला? कारणं शोधण्यासाठी राहुल गांधी अमेठीला जाणार

अमेठी हा गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलाय. पण हा पराभव काँग्रेससह राहुल गांधींच्याही जिव्हारी लागणारा होता. कारण, सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मतदारसंघात चक्क पक्षाच्या अध्यक्षालाच पराभव स्वीकारावा लागला होता.

पराभव का झाला? कारणं शोधण्यासाठी राहुल गांधी अमेठीला जाणार
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 08, 2019 | 7:52 PM
Share

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत काँग्रेससाठी सर्वात धक्कादायक निकाल होता तो म्हणजे अमेठीचा. काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी यांचा या मतदारसंघातून पराभव झाला. या पराभवाची कारणं शोधण्यासाठी राहुल गांधी 10 जुलैला अमेठीत जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. अमेठी हा गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलाय. पण हा पराभव काँग्रेससह राहुल गांधींच्याही जिव्हारी लागणारा होता. कारण, सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मतदारसंघात चक्क पक्षाच्या अध्यक्षालाच पराभव स्वीकारावा लागला होता.

सूत्रांच्या माहितीनुसार, या एकदिवसीय दौऱ्यात राहुल गांधी मतदारसंघातल्या लोकांशीही चर्चा करतील. अमेठीमध्ये भाजपच्या उमेदवार आणि विद्यमान केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी विजय मिळवला होता. राहुल गांधींनी यावेळी दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, ज्यात त्यांनी केरळमधील वायनाडमधून विजय मिळवला.

काँग्रेसच्या लोकसभा निवडणुकीतील खराब कामगिरीनंतर राहुल गांधी यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. सध्या ते पक्षाच्या कामासाठी विविध दौरे करत आहेत. पक्ष बांधणी करण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतात, असं राहुल गांधींनी राजीनामा देताना म्हटलं होतं. काँग्रेसकडून आता नवा पक्षाध्यक्ष निवडला जाणार आहे.

राहुल गांधींनी नुकतीच राजीनाम्याची अधिकृत घोषणा केली होती. पण पक्षाने अधिकृतपणे त्यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही. विशेष म्हणजे 10 जुलैलाच काँग्रेसच्या कार्यकारिणीचीही बैठक होण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये राहुल गांधींचा राजीनामा स्वीकारण्याबाबत निर्णय होईल. नवा अध्यक्ष निवडण्याच्या प्रक्रियेत सहभाग घेणार नसल्याचं राहुल गांधींनी अगोदरच स्पष्ट केलंय.

संबंधित बातम्या :

अखेर अध्यक्षपदावरुन पायउतार, राहुल गांधींचं 4 पानी पत्र जसंच्या तसं

अध्यक्षपदाचा राजीनामा, आर्टिकल 15 पाहण्यासाठी राहुल गांधी थिएटरमध्ये

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...