AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘राज ठाकरेंना बोलण्याचा अधिकार, पण मुख्यमंत्रीही संकटात सापडलेल्या जनतेला मदत करतायत’

आपल्याकडे लोकशाही असल्यामुळे राज ठाकरे यांना बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. | Dada Bhuse

'राज ठाकरेंना बोलण्याचा अधिकार, पण मुख्यमंत्रीही संकटात सापडलेल्या जनतेला मदत करतायत'
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे
| Updated on: Oct 29, 2020 | 9:06 PM
Share

मुंबई: राज ठाकरे यांना सरकारवर टीका करण्याचा अधिकार आहे. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील संकटात सापडलेल्या जनतेला मदत करतच आहेत, असे वक्तव्य राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी केले. आपल्याकडे लोकशाही असल्यामुळे राज ठाकरे यांना बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र, मुख्यमंत्रीही त्यांचे काम चोखपणे करत आहेत. त्यामुळे मला या सगळ्यावर अधिक काही बोलायचे नाही, असे दादा भुसे यांनी सांगितले. (Shivsena leader Dada bhuse comment on Raj Thackeray criticism on Uddhav Thackeray)

राज्यातील कांदा व्यापारी आणि शेतकऱ्यांनी गुरुवारी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कृषीमंत्री दादा भुसे यांची भेट घेतली. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री, कृषीमंत्री आणि कांदा उत्पादकांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर दादा भुसे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी आपल्या अडचणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. यानंतर कांदा खरेदीच्यादृष्टीने सकारात्मक निर्णय झाला. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शुक्रवारी केंद्र सरकारशी चर्चा करून कांद्याच्या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करतील, असे दादा भुसे यांनी सांगितले.

तर या बैठकीला आलेल्या शेतकऱ्यांनीही प्रसारमाध्यमांसमोर आपली व्यथा मांडली. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याने आमच्या मनात संतापाची भावना आहे. मोठमोठ्या नेत्यांच्या बैठकी होतात, तरीही निर्णय होत नाहीत. दिवाळीचा सण तोंडावर आल्याने आता आम्ही काय करायचं? आम्ही अंमली पदार्थ विकतोय का, असा उद्विग्न सवाल एका शेतकऱ्याने विचारला. त्यामुळे आता याबाबत लवकरात लवकर निर्णय व्हावा. जेणेकरून कांदा व्यापारी आमचा माल विकत घेतील, असेही या शेतकऱ्याने सांगितले.

तर कांदा व्यापाऱ्यांनी या बैठकीनंतर सकारात्मक भूमिका घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बैठकीला मान देऊन आम्ही शुक्रवारपासून कांदा लिलाव करत आहोत. मात्र, आम्हाला केंद्र सरकारच्या नियमांचे पालन करावे लागतेय. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने केंद्राशी बोलणी करुन यावर तोडगा काढावा, अशी मागणी नंदकुमार डांगा या व्यापाऱ्याने केली.

संबंधित बातम्या:

Special Report | राज ठाकरेंच्या राज्यपाल भेटीचा अर्थ काय? राज्यपाल राज भेटीसाठी उत्सुक का?

Raj Thackeray Update | राज्यपाल म्हणाले पवार साहेबांशी बोलून घ्या : राज ठाकरे

राज्य सरकार अडलंय कुठं? धरसोडपणा सोडून कधी काय होणार आहे ते सांगा : राज ठाकरे

(Shivsena leader Dada bhuse comment on Raj Thackeray criticism on Uddhav Thackeray)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.