AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे सरकारकडून भंडाऱ्यात 10 कोवळ्या बाळांची हत्या, आता यवतमाळमध्ये सॅनिटायझर पाजलं : राम कदम

भाजप आमदार राम कदम यांनी यवतमाळमध्ये पोलिओ लसीकरणावेळी 12 लहान मुलांना सॅनिटायझर पाजलं गेल्याच्या घटनेचा निषेध केला आहे. ( Ram Kadam Thackeray Government )

ठाकरे सरकारकडून भंडाऱ्यात 10 कोवळ्या बाळांची हत्या, आता यवतमाळमध्ये सॅनिटायझर पाजलं : राम कदम
राज्याच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 288 आमदारांना विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करायची होती. भाजपने केवळ सचिन वाझे यांना अटक करावी, इतकीच मागणी केली होती. मात्र, महाविकासआघाडी सरकारने ही मागणी मान्य केली नाही.
| Updated on: Feb 02, 2021 | 1:34 PM
Share

मुंबई: भाजप आमदार राम कदम ( Ram Kadam) यांनी यवतमाळमध्ये पोलिओ लसीकरणावेळी 12 लहान मुलांना सॅनिटायझर पाजलं गेल्याच्या घटनेचा निषेध केला आहे. राम कदमांनी यवतमाळच्या घटनेवरुन ठाकरे सरकारनं भंडाऱ्याच्या 10 कोवळ्या बाळांची हत्या केली आणि यवतमाळमध्ये सॅनिटायझर पाजल, असा आरोप केला. पोलिओ लसीकरणावेळी सॅनिटायझर पाजल्यामुळे यवतमाळमध्ये 12 चिमुकल्यांची प्रकृती बिघडली होती. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हलगर्जीमुळे पाच वर्षांखालील चिमुरड्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून याप्रकरणी एक जणाचे निलंबन करण्यात आले आहे. (Ram Kadam slams Thackeray Government over Yavatmal Sanitizer giving to child instead of Polio)

महाराष्ट्र सरकारनं निष्काळजीपणाची सीमा ओलांडली

राम कदम यांनी यवतमाळच्या घटनेवर बोलताना महाराष्ट्र सरकार आणि सरकारच्या अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणाची सीमा ओलांडल्याचा आरोप केला. यवतमाळमध्ये 12 लहान बालकांना पोलिओचा डोस म्हणुन सॅनिटायझर पाजलं. आज त्या 12 बालकांचा जीव धोक्यात आहे,.या आधी सरकारच्या निष्काळजीपणामुळे भंडाऱ्यात 10 कोवळ्या मुलांचा जीव गेला. ठाकरे सरकारने त्या कोवळ्या मुलांची हत्या केली, असा आरोप राम कदमांनी केला.

हे सरकार करतय तरी काय ?

भंडाऱ्याच्या घटनेवर अजूनही एफआयआरची नोंद झालेली नाही. हे सरकार करतय तरी काय, असा सवाल राम कदमांनी उपस्थित केला.केवळ बदल्या बदल्या आणि बदल्या एवढेच या सरकारचे सुरु आहे. भंडारा आणि यवतमाळ या दोन्ही घटनांवर एफआयर कधी दाखल करणार, असा सवाल राम कदमांनी ठाकरे सरकारला केला आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे काय म्हणाले?

यवतमाळमध्ये पोलिओऐवजी सॅनिटायझर दिल्याची ही अक्षम्य चूक‌ आहे. संबंधित अंगणवाडी सेविकेवर कारवाई करण्यात आली आहे. त्याविषयीचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. यवतमाळमधील घाटंजी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कापसी कोपरी येथे पोलिओ लसीकरणावेळी हा प्रकार घडला. लहान मुलांना पोलिओच्या डोसऐवजी सॅनिटायजर पाजले. 12 लहान बालकांना यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या:

यवतमाळमध्ये पोलिओऐवजी 12 चिमुकल्यांना सॅनिटायजर्स पाजलं, आरोग्यमंत्री टोपेंची कडक कारवाई

पोलिओ लसीकरणावेळी हलगर्जी, सॅनिटायजर पाजल्याने यवतमाळमध्ये 12 चिमुकले रुग्णालयात

(Ram Kadam slams Thackeray Government over Yavatmal Sanitizer giving to child instead of Polio)

Follow Us
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.