AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी पुन्हा येईन म्हणाले, पण न आल्यामुळे ‘ते’ फ्रस्ट्रेट : रामदास कदम

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam slams Devendra Fadnavis) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मी पुन्हा येईन म्हणाले, पण न आल्यामुळे 'ते' फ्रस्ट्रेट : रामदास कदम
| Updated on: Jun 12, 2020 | 11:07 PM
Share

रत्नागरी : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam slams Devendra Fadnavis) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. महाविकास आघाडी सरकार वादळसदृश्य भागात पोहोचत नसल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. याशिवाय राज्य सरकारची नुकसानग्रस्त भागात अजूनही मदत पोहोचलेली नाही, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यांच्या याच दाव्याला रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिलं (Ramdas Kadam slams Devendra Fadnavis).

“महाविकास आघाडी सरकारला बदनाम कसं करता येईल, एव्हढंच देवेंद्र फडणवीस यांना माहिती आहे. खरंतर देवेंद्र फडणवीस ‘मी पुन्हा येईल’ असं म्हणाले आणि न आल्यामुळे फ्रस्ट्रेट झाले आहेत”, असा टोला रामदास कदम यांनी लगावला.

हेही वाचा : अपने तो अपने होते है | पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना फोन, तब्येतीची विचारपूस

निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात प्रचंड नुकसान झालं आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यात जावून नुकसानग्रस्त भागांची पाहणी करुन रायगडला 100 कोटींची मदत जाहीर केली आहे. याशिवाय रत्नागिरी जिल्ह्याला 75 कोटी आणि सिंधुदुर्गला 25 कोटींची मदत जाहीर केली.

मुख्यमंत्र्यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्या पाहणीनंतर देवेंद्र फडणवीसांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.

देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानग्रस्त कोकण भागाची पाहणी करत असताना पत्रकार परिषद घेत राज्य सरकावर टीका केली. “चक्रीवादळाने वाताहात होऊन 10 दिवस होऊन गेले. मात्र, सरकारने केलेल्या घोषणांची कुठेही अंमलबजावणी झालेली नाही”, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

याशिवाय “चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना लोकांना जिथं ठेवलं आहे त्याची अवस्था खुराड्यासारखी आहे. अत्यंत वाईट अवस्थेत लोकांना ठेवण्यात आलं आहे”, अस दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

संबंधित बातम्या :

कोकणाला 9 दिवसात काहीच मदत मिळाली नाही, लोकांना जिथं ठेवलंय ती अवस्था खुराड्यासारखी : फडणवीस

फडणवीसांकडून 10 हजारांच्या मदतीची मागणी, मात्र वादळग्रस्तांच्या खात्यात सोमवारपासून 20 हजार जमा होणार : वडेट्टीवार

चक्रीवादळग्रस्तांसाठी नियमापेक्षा जास्त मदत, घरासाठी 95 हजारांऐवजी दीड लाख, दोन महिने मोफत धान्य   

चक्रीवादळबाधितांसाठी मुख्यमंत्री वाढीव मदतीची घोषणा करण्याची शक्यता 

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.