AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“चंद्रकांतदादा म्हणतात पहाटे पुन्हा भूकंप होणार, त्यांनी गजर लावलाय का?” संजय राऊतांचा टोला

सरकारमागे राज्यातल्या 11 कोटी जनतेच्या भावना आहेत. ठाकरेंच्या नेतृत्वातलं हे सरकार पूर्ण पाच वर्षे टिकणार असल्याची ग्वाही संजय राऊत यांनी दिली. (MP Sanjay Raut criticizes BJP state president Chandrakant Patil)

चंद्रकांतदादा म्हणतात पहाटे पुन्हा भूकंप होणार, त्यांनी गजर लावलाय का? संजय राऊतांचा टोला
| Updated on: Sep 29, 2020 | 5:49 PM
Share

मुंबई : “चंद्रकांतदादा पहाटे पुन्हा भूकंप होणार असल्याचं म्हणाले. त्यांनी गजर लावला आहे का?, असे म्हणत शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली. (MP Sanjay Raut criticizes BJP state president Chandrakant Patil)

राज्यात सध्या मध्यावधी निवडणुका होणार नाहीत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यावर बोलताना, “चंद्रकांत पाटील यांच्या विधानाकडं मी सकारात्मक दृष्टीने पाहतो. राज्यात निवडणुका होणार, की नाही होणार? हे सांगण्याची जबाबदारी निवडणूत आयोगाची असते. निवडणुका कधी होणार हे जर चंद्रकांत पाटील यांना माहित असेल आणि निवडणूक आयोगाची जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्याकडं आली असेल, तर त्याचं स्वागत केलं पाहीजे.” असं म्हणत चंद्रकांत पाटलांवर शेलक्या शब्दात टीका केली.

राजकीय पक्षांमध्ये संवाद हवाच

संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर राज्यात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं. या भेटीबाबत विचारले असता, “त्यांना भेटलो तर एवढं वादळ निर्माण झालं. यापुढेही आम्ही अधूनमधून भेटत राहू. आमच्या भेटीमुळे कुणी नाराज असेल असं मला वाटत नाही, असं ते म्हणाले. तसेच बाळासाहेबांच्या विरोधक आणि टीकाकारांशी सर्वाधिक संवाद असावा, या शिकवणीचा दाखला देत, राजकीय विचार सारखे नसतील तर त्यांना भेटू नये, असं संविधानात लिहलंय का?” असा प्रतिप्रश्नही त्यांनी विचारला.

सुशांतसिंह प्रकरणावर दात उचकणाऱ्यांचे दात घशात जातील

सुशांतसिंह प्रकरणावर अनेकांनी महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांवर टीका केली होती. बिहारचे तत्कालीन पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनीही मुंबई पोलिसांनी बोटचेपी भूमिका घेतली, असा आरोप केला होता. त्याबाबत राऊत यांनी विचारले आसता, गुप्तेश्वर पांडेंसारखे अनेक अधिकारी राजीनामा देऊन निवडणूक लढवतात. त्यांनी कोणत्या पक्षात जावे?, निवडणूक लढवावी की नाही?, हा त्यांचा प्रश्न आहे. पण सुशांतसिंह प्रकरणात राज्य सरकारवर आणि आमच्या प्रमुख नेत्यांवर जी चिखलफेक झाली, ती चुकीची असल्याचं ते म्हणाले. त्याचबरोबर महाराष्ट्र पोलिसांच्या बदनामीवर आक्षेप नोंदवत ‘ज्यांनी या प्रकरणात दात उचकटले, त्यांचे दात घशात जातील’ असाही त्यांच्यावर पलटवार केला.

दरम्यान, संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमागे त्यांची मुलाखत घ्यायची असल्याचं कारण दाखवल्याने तुर्तास चर्चांना पूर्णविराम लागला आहे.

संबंधित बातम्या:

EXCLUSIVE : संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ?

संजय राऊत- देवेंद्र फडणवीस भेटीने आनंद : प्रवीण दरेकर

संजय राऊतांची आधी दानवेंसोबत चर्चा, आता फडणवीसांसोबत गुप्त भेट

(MP Sanjay Raut criticizes BJP state president Chandrakant Patil)

Follow Us
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा