AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी राहुल गांधींच्या जागी असतो तर ‘तो’ निर्णय घेतला असता : रोहित पवार

कोल्हापूर :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातील चर्चेचा एक भाग आहेत. सध्या रोहित पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी विविध विषयावर भाष्य केलं. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तरुणांना अधिक संधी देण्यावर भर दिला जाणार असल्याची शक्यता आहे.  रोहित पवार यांनी […]

मी राहुल गांधींच्या जागी असतो तर 'तो' निर्णय घेतला असता : रोहित पवार
(फाईल फोटो)
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: May 29, 2019 | 6:45 PM
Share

कोल्हापूर :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातील चर्चेचा एक भाग आहेत. सध्या रोहित पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी विविध विषयावर भाष्य केलं. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तरुणांना अधिक संधी देण्यावर भर दिला जाणार असल्याची शक्यता आहे.  रोहित पवार यांनी तसे संकेत दिले आहेत.

यावेळी रोहित पवार यांनी चुलत भाऊ पार्थ पवार यांच्या पराभवावरही भाष्य केलं. पार्थ हा खूपच नवखा होता, खूप अनुभवी लोक पडले, त्यांचा पराभव झाला. पार्थच्या पराभवाचा अभ्यास केला जाईल, असं रोहित पवार म्हणाले.

त्याचबरोबर मी जर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या जागी असतो तर राजीनामा स्वीकारण्याची विनंती केली असती. त्यानंतर संपूर्ण देशभर पक्षाचं काय चुकलं आहे याचा अभ्यास केला असता. त्या पद्धतीनं काम केलं असतं, असं रोहित पवार यांनी सांगितलं.

विधानसभा निवडणुकीबाबत काय?

विधानसभा लढवणार आणि कोणत्या मतदार संघातून लढवणार हे अजून निश्चित झालं नाही. पण पक्ष जी जबाबदारी देईल ती पूर्ण क्षमतेनं पार पाडणार, असं रोहित पवार यांनी यावेळी नमूद केलं.

बारामतीत चंद्रकांत पाटलांनी आम्हाला कोणतीही हूरहूर लावली नाही. तसं असतं तर सुप्रिया सुळे यांचं मताधिक्य वाढलं नसतं असंही रोहित पवार म्हणाले.

पार्थ पवारांची पहिली प्रतिक्रिया

दरम्यान, पार्थ पवार यांनी मावळ लोकसभा मतदारसंघात झालेल्या पराभवाबाबत निकालाच्या 5 दिवसांनी भाष्य केलं. “फक्त एका निवडणुकीसाठी नाही, तर सदैव मी लोकांबरोबर आणि लोकांसाठी कार्यरत राहीन”, अशी प्रतिक्रिया पार्थ यांनी ट्विटरवर दिली आहे.

संबंधित बातम्या  

पराभवानंतर पाच दिवसांनी पहिली प्रतिक्रिया, पार्थ पवार म्हणतात…. 

राष्ट्रवादीला झटका बसण्याची चिन्हं, धनंजय महाडिक-मुख्यमंत्र्यांची भेट  

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली