AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रातील संकटात केंद्रीय हात नाही, पण सरकारे पाडण्यासाठी निधी वेळेत : सामना

ज्या पद्धतीने मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार पाडले, त्याच प्रकारे राजस्थानमधील गेहलोत सरकार पाडण्यासाठी भाजप सुरुंग लावत असल्याचे धक्के आता जाणवू लागले आहेत, असा घणाघात 'सामना'तून करण्यात आला आहे. (Saamana Editorial Criticises BJP for destabilizing opposition governments)

महाराष्ट्रातील संकटात केंद्रीय हात नाही, पण सरकारे पाडण्यासाठी निधी वेळेत : सामना
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Jun 13, 2020 | 8:37 AM
Share

मुंबई : महाराष्ट्रातील संकटात केंद्रीय हात अजून पोहोचलेला नाही, परंतु सरकारे पाडण्यासाठी पथके आणि निधी मात्र पोहोचत आहे, अशा शब्दात ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपवर टीकास्त्र सोडण्यात आले आहे. (Saamana Editorial Criticises BJP for destabilizing opposition governments)

“देशात सध्या कोरोनाचे संकट मानवी जीवनाचा घास गिळत असताना दिल्लीतील राज्यकर्ते पक्षाला विरोधकांची सरकार पाडण्याची थेरं सुचणे हे धक्कादायक आहे. देशात एकाच दिवशी 10 हजार रुग्ण व्हावेत, यावर केंद्र सरकार चिंता करायला तयार नाही. महाराष्ट्रात तुफानी वादळाने कोकण किनारपट्टीवर लोकांचे अतोनात नुकसान झाले. या संकटात केंद्रीय मदतीचा हात अजून पोहोचलेला नाही, पण विरोधकांची सरकारे पाडण्यासाठी पथके व निधी मात्र पोहोचत आहे. पंतप्रधान मोदी यांनी संकटाचे रुपांतर संधीत करण्याची हीच ‘योग्य’ वेळ असल्याचे मत व्यक्त केले. त्यांच्या भक्तांनी ‘मोदी उवाच’चा अनर्थ केला. मोदींनी संधीसाधूची एकदा शाळा घ्यावी हेच बरे” अशी टीका ‘सामना’च्या अग्रलेखात करण्यात आली आहे.

“कोरोनाचे संकट हीच संधी मानून ज्या पद्धतीने राजस्थानमधील स्थिर सरकारचे पाय ओढायला सुरुवात केली आहे. ज्या पद्धतीने मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार पाडले, त्याच प्रकारे राजस्थानमधील गेहलोत सरकार पाडण्यासाठी तिथे भाजप सुरुंग लावत असल्याचे धक्के आता जाणवू लागले आहेत.” असा घणाघातही करण्यात आला आहे.

“कोरोनाशी युद्ध सुरु झाले असतानाच भाजपने ज्योतिरादित्य शिंदे यांच्या गटाचे बावीस आमदार फोडले आणि संकटातील संधीचे सोने करुन दाखवले. या बदल्यात शिंदे समर्थकांना काही फुटकळ मंत्रिपदे मिळाली. स्वतः शिंदे यांना केंद्रात मंत्रिपदाचे गाजर दाखवण्यात आले, पण कोरोना संकटामुळे ही गाजराची शेती सुकली आहे. आता या गाजरांचा साठा राजस्थानात पाठवला आहे आणि तिथे संधीचे सोने करण्याचे पिक निघेल काय, यासाठी पेरणी आणि खतांची फवारणीही सुरु झाली आहे” असंही ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलं आहे.

(Saamana Editorial Criticises BJP for destabilizing opposition governments)

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक