AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे आणि मोदींना एका व्यासपीठावर आणण्यासाठी हालचाली

मुंबई : प्रस्तावित मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलं जाण्याची शक्यता आहे. समृद्धी महामार्गाच्या माध्यमातूनच युतीचा मार्ग तयार होणार असल्याचं बोललं जातंय. समृद्धी महामार्गाच्या भूमीपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एका व्यासपीठावर आणण्याचे जोरदार प्रयत्न सुरु असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उद्धव ठाकरे आणि […]

उद्धव ठाकरे आणि मोदींना एका व्यासपीठावर आणण्यासाठी हालचाली
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM
Share

मुंबई : प्रस्तावित मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलं जाण्याची शक्यता आहे. समृद्धी महामार्गाच्या माध्यमातूनच युतीचा मार्ग तयार होणार असल्याचं बोललं जातंय. समृद्धी महामार्गाच्या भूमीपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एका व्यासपीठावर आणण्याचे जोरदार प्रयत्न सुरु असल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदींना एका व्यासपीठावर आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या महामार्गाचे भूमीपूजन नागपूर येथे होणार असून त्यासाठी उपस्थित राहण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मान्य केल्याची माहिती आहे.

उद्धव ठाकरे यांच्याशी अजून तरी सरकार किंवा भाजपाकडून संपर्क झाला नसला, तरी लवकरच त्यांनाही निमंत्रण दिले जाईल, असंही सांगण्यात येतंय. या महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचंच नाव देण्याची मागणी शिवसेनेकडून आधीच करण्यात आली आहे. त्यामुळे आता शासकीय पातळीवरही हालचाली सुरु आहेत.

शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला असला तरी भाजपकडून मात्र युतीसाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी भाजपाध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान मोदी यांची दिल्लीत भेट घेऊन युती करण्याबाबत सकारात्मक चर्चा केल्याची माहिती आहे. त्यामुळे यापुढे आणखी एक पाऊल टाकत उद्धव ठाकरे आणि मोदींना एका व्यासपीठावर आणण्याबाबत हालचाली सुरु आहेत.

2014 च्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपने एकत्र निवडणूक लढत राज्यातील लोकसभेच्या 48 पैकी 42 जागा जिंकल्या. पण यावेळी युतीचा मार्ग खडतर असल्याचं दिसतंय. युतीची चर्चा थांबल्याची माहितीही यापूर्वीच समोर आली होती. शिवसेना युतीसाठी अनुकूल नसल्याचं बोललं जातंय. पण आता वरिष्ठ पातळीवर यासाठी हालचाल सुरु झाली आहे.

Follow Us
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट.
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.