AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut | नितीश कुमारांनी लव्ह जिहादबाबत कायदा करावा, संजय राऊतांचं चॅलेंज

बिहारमध्ये नितीशकुमारांनी लव्ह जिहादवर कायदा करावा, आम्ही त्यानंतर पाहू, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले आहेत | Sanjay Raut

Sanjay Raut | नितीश कुमारांनी लव्ह जिहादबाबत कायदा करावा, संजय राऊतांचं चॅलेंज
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Nov 23, 2020 | 5:58 PM
Share

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बिहारमध्ये नितीश कुमारांनी लव्ह जिहादवर कायदा करावा, आम्ही त्यानंतर पाहू, असं चॅलेंज दिलं आहे. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी लव्ह जिहादबाबत कायदा करण्याबद्दल केलेल्या मागणीविषयी संजय राऊत बोलत होते. “काही लोक लव्ह जिहादबाबत कायदा करण्यास सांगत आहेत. या विषयावर माझं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं आहे”, असं राऊत यांनी स्पष्ट केले. (Sanjay Raut comment on demand of Love Jihad  Act)

भाजप लव्ह जिहादच्या कायद्याची मागणी करत आहे.उत्तर प्रदेशमध्ये करत आहेत, इतर राज्यांमध्ये करत आहेत. तर, माझी सूचना अशी आहे की इतर राज्यात कोण काय कायदा करतं ते पाहायचं आहे. खासकरुन बिहारमध्ये नितीश कुमार कुठल्या प्रकारचा कायदा करतात ते पाहायचं आहे. त्या कायद्याचा आम्ही अभ्यास करु, असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना दिले.

बिहारमध्ये नितीश कुमार भाजपच्या सहकार्याने तिथे मुख्यमंत्री झाले आहेत. ते सरकार भाजप चालवत आहेत. त्यांचं सरकार लव्ह जिहाद बाबत जो कायदा करतील त्या कायद्याचा आम्ही अभ्यास करु आणि त्यानंतर काय करायचं ते पाहू. भाजपने त्याबाबत बिहारमध्ये एक आदर्श कायदा बनवावा. त्यानंतर महाराष्ट्राला यासंदर्भातील प्रश्न विचारावे.

पश्चिम बंगालच्या निवडणुका पार पडल्या म्हणजे या विषयातील राजकारण संपलं. तरीही त्यामध्ये आम्हाला काही वाटलं तर नितीश कुमार जो कायदा बनवतील त्याकायद्याचा आम्ही अभ्यास करु, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केले. (Sanjay Raut comment on demand of Love Jihad  Act)

महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकांचे राज्य बनवणार

भाजपकडे विकासाचे मुद्दे नाहीत. महाराष्ट्रामध्ये विकासासंदर्भात मुख्यमंत्री जे काम करत आहेत. ते डिस्टर्ब करायचं अशा प्रकारचं एक धोरणात्मक निर्णय भाजपचा असेल, तरी या अडथळ्यांच्या शर्यतीत सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विकासाच्या मार्गाने जातील आणि महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर पोहोचवू, राज्याला पुढील तीन वर्षातच पहिल्या क्रमांकावर नेऊ, असा विश्वास आणि आत्मविश्वास आम्हाला आहे, असं राऊत म्हणाले.

जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्या आहेत त्यावर कोणीही बोलत नाही. त्यातुलनेत पेट्रोल, डिझेल आणि रॉकेलचे भाव कमी व्हायला हवेत. त्यावर कोणीही बोलत नाही, असं संजय राऊत यांनी वीजबिल प्रश्नी बोलताना सांगितले.

महाराष्ट्रातील भाजप नेत्यांवर टीकास्त्र

महाराष्ट्रातील भाजप नेते पातळी सोडून टीका करत आहेत. शरद पवार हे छोटे नेते आहेत असं भाजप नेते म्हणाले, मग नरेंद्र मोदी यांच्या सरकारने शरद पवारांना पद्मविभूषण पुरस्कार दिला मग मोदी सरकारला कळत नाही का?, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. महाराष्ट्रातील भाजपच्या पुढाऱ्यांचे ताळतंत्र सुटलेय, पहाटेच्या शपथविधीला एक वर्ष झालं आहे. भाजप नेते भ्रमिष्ट झाले आहेत. महाराष्ट्रातील जनतेने त्यांच्याकडे लक्ष देऊ नये, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. (Sanjay Raut comment on demand of Love Jihad  Act)

“शरद पवार यांच्यासारख्या नेत्यावर अशा प्रकारची टीका करणे म्हणजे तुमचे मानसिक संतुलन बिघडलं आहे. सत्ता येते जाते. बाळासाहेब ठाकरे, शरद पवार आणि वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक यांच्या सारख्या नेत्यांची उंची कोणी काही बोललं म्हणून कमी होत नाही”, असं संजय राऊत म्हणाले.

संबंधित बातम्या:

Sanjay Raut | महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात, नियमांचं पालन होत आहे:संजय राऊत

तुम्हाला भगवा फडकवायचा असेल तर बेळगाव-काश्मिरात फडकवा, संजय राऊतांचा भाजपवर हल्ला

(Sanjay Raut comment on demand of Love Jihad  Act)

Follow Us
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या….

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या…

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?.

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र.

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी.

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!.

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!