AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवारांचा सल्ला घेतला तर कुणाला पोटदुखी का होते?, संजय राऊतांचा विरोधकांना जमालगोटा

सरकार जर शरद पवारांचा सल्ला घेत असतील तर कुणाला पोटदुखी का होते? असे संजय राऊत म्हणाले.  (Sanjay Raut on NCP Sharad Pawar Maha Vikas Aaghadi Government)  

शरद पवारांचा सल्ला घेतला तर कुणाला पोटदुखी का होते?, संजय राऊतांचा विरोधकांना जमालगोटा
| Updated on: Oct 31, 2020 | 12:55 PM
Share

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सरकारमधील ज्येष्ठ नेते आहेतत. त्यामुळे ते सर्वांना मार्गदर्शन करतात. जर सरकार शरद पवारांचा सल्ला घेतला तर कुणाला पोटदुखी का होते? असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. (Sanjay Raut on NCP Sharad Pawar Maha Vikas Aaghadi Government)

शिवसेना- भाजप युतीचे सरकार होते, तेव्हा पण बाळासाहेब ठाकरे हे सरकार चालवतात असाच आरोप केला जात होता. जेव्हा तीन पक्षांचे सरकार असते, तेव्हा सरकारमधील ज्येष्ठ नेते शरद पवार मार्गदर्शन करतात. तिकडे मोदी पण इतर राज्यांना मार्गदर्शन, सल्ला देतात. सरकार जर शरद पवारांचा सल्ला घेत असतील तर कुणाला पोटदुखी का होते? असे संजय राऊत म्हणाले.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे सरकार राहिले नाही. तर त्यांना पण अभ्यास करता आला असता. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही लक्ष घालावं. यामध्ये उदयनराजे आणि संभाजीराजे यांनी मोदींकडे या प्रश्न घेऊन जावा आम्ही त्यांच्या नेतृत्वात जाऊ, असेही संजय राऊत म्हणाले.

मुळात महाराष्ट्राच्या प्रश्नावर राज्यपालांना भेटणे हा राज्याचा अपमान आहे. दुर्देवाने आज जे आपल्या विचारांचे नाहीत त्यांच्या राजकारणात राहण्याचा अधिकार नाही, अशी मनोवृत्ती सध्या देशात तयार होते आहे, अशी टीका संजय राऊत यांनी मोदी सरकारवर केली.

बिहारच्या निवडणुकांकडे राज्याचे लक्ष लागलं आहे. बिहार निवडणुकीत जर काही गडबड झाली नाही. तर तेजस्वी यादव मुख्यमंत्री झाले तर नवल वाटायला नको, असेही संजय राऊत म्हणाले.

महाराष्ट्रात जे तीन पक्षांचे सरकार आहे. त्यापुढे फार मोठे आव्हान आहे. विरोधी पक्षाचे ते काम आहे. महाराष्ट्रात मजबूत विरोधी पक्ष आहे आणि चांगल्या विरोधी पक्षाचे स्वागत केलं पाहिजे. एक उत्तम विरोधी पक्ष राहिला पाहिजे. त्याशिवाय राज्य आणि देश पुढे जाऊ शकत नाही, असेही संजय राऊतांनी म्हणाले.

“मुख्यमंत्र्यांनी आरोग्यविषयक संकटाशी लढताना स्वत: नेतृत्व केलं”

मधला काळ हा संकटाचा होता. कोरोनाची लढाई मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगली लढली होती. इतर राज्यांमध्ये व्यवस्था त्यांच्या खिजगणतीसही नाही. या मुख्यमंत्र्यांनी आरोग्यविषयक संकटाशी लढताना स्वत:  नेतृत्व केलं, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

एकेकाळ वर्षाभरापूर्वी पत्रकारांना रोज 10 वाजता भेटायचो.  महाराष्ट्राचा राजकारणाचा केंद्रबिंदू पुणे आहे. हे सरकार होणारच होतं. हे सरकार होणार नाही असं जरी काही लोकांना वाटत होतं पण ते कसं शक्य आहे. निवडणुकीआधी मला हे सरकार असचं येईल असच वाटत होतं. सरकार पूर्ण ताकदीने चालेल, असे संजय राऊत म्हणाले. (Sanjay Raut on NCP Sharad Pawar Maha Vikas Aaghadi Government)

संबंधित बातम्या : 

ठाकरे सरकार कोसळेल अशा पैजा लागल्या होत्या; पुढच्या महिन्यात वर्ष पूर्ण करतोय; राऊतांचा विरोधकांना चिमटा

बिहारचे मुख्यमंत्री तेजस्वी यादव झाले तर मला आश्चर्य वाटणार नाही, शेवटी जनभावना महत्त्वाची : संजय राऊत

Follow Us
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता.
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान.
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड.
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती.
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?.
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही.....
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही......
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?.
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके...
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके....
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं.