AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंजाबच्या शेतकऱ्यांना दहशतवाद्यांसारखी वागणूक, शेतकऱ्यांना खलिस्तानची आठवण करुन देणं दुर्दैवी: संजय राऊत

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंजाबच्या शेतकऱ्यांवर पोलिसी बळाचा वापर करणाऱ्या केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. Sanjay Raut Farmer Protest

पंजाबच्या शेतकऱ्यांना दहशतवाद्यांसारखी वागणूक, शेतकऱ्यांना खलिस्तानची आठवण करुन देणं दुर्दैवी: संजय राऊत
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Nov 29, 2020 | 11:07 AM
Share

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंजाबच्या शेतकऱ्यांवर पोलिसी बळाचा वापर करणाऱ्या केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. देशातील फक्त पंजाब आणि हरियाणा नाही तर देशभरातील सर्व शेतकऱ्यांच्या मागण्यांवर केंद्र सरकारनं सहानुभूतिपूर्वक विचार करावा. आज देशातील राज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. सरकारनं शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, कृषी कायद्यांचा एक विषय आहे, इतरही मागण्या आहेत, त्याचा केंद्र सरकारनं विचार करण्याची गरज आहे, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. (Sanjay Raut criticize BJP and Central Government on Farmer Protest)

महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना टीका केली तर वाईट वाटते. पंजाबमधून आलेला शेतकरी अन्नदाता आहे. शेतकऱ्यांना पुन्हा एकदा खलिस्तानची आठवण करुन देणार असाल तर ते दुर्दैवी आहे. पंजाबमध्ये ठिणगी टाकायची आहे का?, अस्थिरता, अशांतता निर्माण करायची आहे का? हे पाहावे लागेल, असा सवाल संजय राऊत यांनी केंद्र सरकारला विचारला आहे.

शेतकऱ्यांना दिल्लीत येण्यापासून रोखताना ते देशाबाहेरचे असल्यासारखा व्यवहार केला गेला. शेतकऱ्यांशी ते दहशतवादी असल्यासारखा व्यवहार केला गेला. पंजाब आणि हरियाणातून आलेल्या शेतकऱ्यांना खलिस्तानवादी म्हणणे देशातील शेतकऱ्यांचा अपमान आहे. पंजाबला पुन्हा एका अस्थिरतेकडे नेण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला. (Sanjay Raut criticize BJP and Central Government on Farmer Protest)

संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेविषयी भाष्य केले. सरकारस्थापनेविषयीच्या अनेक गोष्टी समोर आलेल्या नाहीत. शरद पवार यांना लपून छपून भेटत नाही. त्यांना खुलेआम रोज भेटतो. ते महाराष्ट्राचे,देशाचे नेते आहेत त्यांना रोज भेटतो यात रहस्य काय?,असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सामनाच्या रोखठोकमधून सरकार स्थापनेविषयी गौप्यस्फोट

मुंबईत नेहरू सेंटरमध्ये झालेल्या महाविकासआघाडीच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि तत्कालीन काँग्रेस प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती. विधानसभेचे अध्यक्ष पद कुणाकडे? हा यातील शाब्दिक चकमकीचा मुद्दा होता, असा मोठा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केला आहे.

मल्लिकार्जुन खर्गे, पृथ्वीराज चव्हाण यांचे लक्ष सत्तेच्या वाटणीत राष्ट्रवादीला काय मिळत आहे यावरच होते. नेहरू सेंटरमधल्या 22 नोव्हेंबरच्या वाटाघाटीत मल्लिकार्जुन खर्गे यांच्या एका वक्तव्याने ठिणगी पडली. विधानसभेचे अध्यक्षपद कोणाकडे? अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे जाता कामा नये अशी भूमिका खर्गे वगैरे मंडळींनी घेतली. तेथे खर्गे आणि शरद पवार यांच्यात शाब्दिक चकमक झाली, असा मोठा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला आहे. (Sanjay Raut criticize BJP and Central Government on Farmer Protest)

संबंधित बातम्या : 

विधानसभेचे अध्यक्षपद कोणाकडे? सत्तास्थापनेपूर्वीच्या बैठकीत शरद पवार आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात शाब्दिक चकमक, संजय राऊतांचा गौप्यस्फोट

…तेव्हा पोपट घेऊन चंद्रकांत पाटील चिठ्ठ्या काढत होते; नवाब मलिक यांचं टीकास्र

(Sanjay Raut criticize BJP and Central Government on Farmer Protest)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा.

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

इंग्लंड दौऱ्यात छोट्या भावाकडून पराभव, झिम्बाब्वेत मोठ्या भावाची भीती! श्रेयसचं टेन्शन वाढलं.

इंग्लंड दौऱ्यात छोट्या भावाकडून पराभव, झिम्बाब्वेत मोठ्या भावाची भीती! श्रेयसचं टेन्शन वाढलं

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ.

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा