AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हक्कासाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांच्या एकजुटीत सरकारला देशद्रोह कसा दिसतो? संजय राऊतांचा सवाल

संजय राऊत यांनी राज्यसभेत बोलताना केंद्र सरकारचे कृषी कायदे, शेतकऱ्यांचं आंदोलन, अर्णव गोस्वामी, कंगना रणौत प्रकरणी भाष्य केले. Sanjay Raut Rajya Sabha

हक्कासाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांच्या एकजुटीत सरकारला देशद्रोह कसा दिसतो? संजय राऊतांचा सवाल
संजय राऊत, शिवसेना खासदार
| Updated on: Feb 05, 2021 | 10:20 AM
Share

नवी दिल्ली: शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत बोलताना केंद्र सरकारचे कृषी कायदे, शेतकऱ्यांचं आंदोलन, अर्णव गोस्वामी, कंगना रणौत प्रकरणी भाष्य केले. देशात सध्या जे लोक सरकारला प्रश्न विचारतात त्यांना देशद्रोही ठरवलं जातेय. अनेक पत्रकारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व गोष्टींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायचा असेल तर आयपीसीमधील इतर कलमांचा उपयोग काय?, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा कट करण्यात येत आहोत. दिल्लीच्या सीमांवर सुरु असणारं आंदोलन फक्त तीन राज्यांचं राहिलेलं नाही देशातील सर्व शेतकऱ्यांचं आंदोलन झालं आहे, अशी आक्रमक भूमिका संजय राऊत यांनी राज्यसभेत मांडली. (Sanjay Raut raised question over farmer protest against farm laws at Rajya Sabha)

बहुमत अहंकारानं चालत नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत.त्यांच्याबद्दल आमच्या सर्वांनी आदर आहे. केंद्र सरकारला देशानं बहुमत दिलं आहे. पण,बहुमत अहंकारानं चालत नाही, असंही संजय राऊत म्हणाले. शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा कट केला जातोय. ही बाब देशासाठी चांगली बाब नाही. 26 जानेवारीला लाल किल्ल्यावर तिरंग्याचा अपमान झाला. पंतप्रधानांसह सर्वांना दु:ख झालं आहे. लाल किल्ल्यावर अपमान करणारा दिप सिद्धू कोण आहे, तो कोणाचा माणूस आहे. तो सिद्धू आतापर्यंत पकडला गेला नाही. मात्र, 200 पेक्षा जास्त शेतकरी आंदोलक पकडले गेले आहेत. त्यांना तिहार तुरुंगात ठेवण्यात आलं आहे. 100 युवा शेतकरी आंदोलक कुठं आहेत.पोलिसांनी त्यांच्यासोबत काय केलय हे सांगावं, असा सवाल संजय राऊत यांनी केला.

देशप्रेमी कोण?

हक्कासाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांना देशद्रोही म्हटलं जात आहे. भारतात देशप्रेमी कोण आहे? अर्णव गोस्वामी देशप्रेमी आहेत का? त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या गोष्टी जाहीर केल्या, अशा गोष्टींना बळ देणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. टीव्ही अँकर एका कॅबिनेट मंत्र्याबद्दल असं बोलतो हे योग्य नाही, असं संजय राऊत म्हणाले.

शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी गेल्या 3 महिन्यापासून आंदोलन सुरु आहेत. ते तीन राज्यांचं आंदोलन नसून देशातील शेतकऱ्यांचं आंदोलन आहे. पंजाब जे शेतकरी मुघलांविरोधात लढतात. कोरोना काळात लंगर चालवतात ते तेव्हा ते देशप्रेमी असतात. पंजाबच्या शेतकऱ्यांनी त्यांच्या हक्कासाठी आंदोलन केलं तर देशद्रोही कसे झाले, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलाय. आंदोलनही देशाची ताकद आहे, असं संजय राऊत म्हणाले.

संबंधित बातम्या:

संजय राऊतांच्या लेकीच्या साखरपुड्यात फडणवीस-राऊत गळाभेट! अनेकांच्या भुवया उंचावल्या

संजय राऊतांच्या घरी वाजणार सनई-चौघडे; 31 जानेवारीला मुलीचा साखरपुडा

(Sanjay Raut raised question over farmer protest against farm laws at Rajya Sabha)

जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.
विलिनीकरणावरून पुन्हा खळबळ; शिंदे यांच्या लेखानंतर तटकरेंचा थेट इशारा
विलिनीकरणावरून पुन्हा खळबळ; शिंदे यांच्या लेखानंतर तटकरेंचा थेट इशारा.
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून संजय राऊत यांचं खळबळजनक विधान
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून संजय राऊत यांचं खळबळजनक विधान.