AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : ‘संभाजीराजेंना पुढे करुन महाराष्ट्रात एक डाव खेळण्याचा प्रयत्न होता’, संजय राऊतांचा फडणवीसांवर निशाणा, शाहू महाराजांचे मानले आभार

श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या या भूमिकेनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांचे आभार मानले आहेत. तसंच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. 'संभाजीराजेंना पुढे करुन महाराष्ट्रात एक वेगळा डाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोपच राऊत यांनी केलाय.

Sanjay Raut : 'संभाजीराजेंना पुढे करुन महाराष्ट्रात एक डाव खेळण्याचा प्रयत्न होता', संजय राऊतांचा फडणवीसांवर निशाणा, शाहू महाराजांचे मानले आभार
देवेंद्र फडणवीस, संभाजीराजे छत्रपती, संजय राऊतImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: May 28, 2022 | 6:53 PM
Share

मुंबई : राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chatrapati) यांनी मुख्यमंत्र्यांनी शब्द बदलल्याचा आरोप केला. त्यामुळे राज्यात संभाजीराजे समर्थकांकडून शिवसेनेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात होता. अशावेळी संभाजीराजे यांचे वडील श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय. संभाजीराजेंना उमेदवारी नाकारण्यात आल्याने छत्रपती घराण्याचा अपमान झालेला नाही. ही संभाजीराजेंची राजकीय भूमिका होती. ती त्यांची वैयक्तिक भूमिका होती’, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या या भूमिकेनंतर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांचे आभार मानले आहेत. तसंच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ‘संभाजीराजेंना पुढे करुन महाराष्ट्रात एक वेगळा डाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोपच राऊत यांनी केलाय.

शाहू महाराजांच्या भूमिकेनंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी राऊत यांनी फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केलीय. ‘कुणीतरी संभाजीराजेंना पुढे करुन महाराष्ट्रात एक वेगळ्या प्रकारचा डाव खेळण्याचा प्रयत्न करत होता. तो डाव नाही तर कपट होतं. पण ते कपट काय होतं हे स्वत: छत्रपती शाहू महाराज यांनी स्पष्ट केलंय. म्हणून आजही महाराष्ट्र शाहू घराण्यासमोर झुकतो. त्याचं कारण हेच आहे की सत्याची कास, सचोटी, प्रामाणिकपणा आणि महाराष्ट्रावर जेव्हा जेव्हा संकट आलं तेव्हा शाहू घराण्याचं भूमिका घेतली आहे. मी त्यांना भेटणार आहे आणि त्यांचा आशीर्वाद घेणार आहे’, असं राऊतांनी सांगितलं.

‘कोल्हापूरच्या मातीमध्ये आजही सत्य आणि प्रामाणिकपणा टिकून’

‘एक स्पष्ट झालं की कोल्हापूरच्या मातीमध्ये आजही सत्य आणि प्रामाणिकपणा टिकून आहे. शाहू घराण्यानेही सत्याची कास सोडली नाही, हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालं. शिवसेनेनं कधीही कुणाची फसवणूक केली नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत फडणवीसांनी जी काल विधान केलं की आम्ही ठरवून कोंडी केली. ते विधान किती खोटं होतं हे आज स्वत: श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी स्पष्ट केलं. मी त्यांचे आभार मानतो’, असंही राऊत म्हणाले.

‘शिवसेनेला बदनाम करण्याची भाषा झाली’

तसंच ‘शाहू महाराजांचा अनुभव हा अधिक दांगडा आहे. त्यांना हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा निकटचा स्नेह त्यांना मिळालाय. त्यामुळे ठाकरे घराणं आणि शाहू घराण्याचा जो जुना संबंध आहे तो सुद्धा आज त्यांच्या वक्तव्यातून दिसून आला. काही लोकांनी महाराष्ट्रात यानिमित्तानं पेटवापेटवीची भाषा केली. शिवसेनेला बदनाम करण्याची भाषा केली. शिवसेनेनं या प्रकरणात कधीही खालच्या पातळीचं राजकारण केलं नाही. फक्त आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली होती की सहावी जागा ही शिवसेनेची असेल आणि त्यासाठी आम्ही प्रस्ताव ठेवला होता’, असं राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं.

मी बोललो ते खरंच बोललो- संभाजीराजे छत्रपती

दुसरीकडे संभाजीराजे छत्रपती यांनी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या भूमिकेवर बोलणार नसल्याचं म्हटलंय. तसंच आपण पत्रकार परिषदेत जे बोललो ते खरच बोललो, असंही संभाजीराजे यांनी ट्विटरवर म्हटलंय.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.