AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्रीपदासाठी रश्मी ठाकरेंच्या नावाची चर्चा, उद्धव ठाकरे राहणार की जाणार? संजय राऊत म्हणतात…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे मुख्यंत्रीपदी विराजमान होतील की काय, अशा चर्चांना उधाण आलंय. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याविषयी सविस्तर प्रतिक्रिया नोंदवली.

मुख्यमंत्रीपदासाठी रश्मी ठाकरेंच्या नावाची चर्चा, उद्धव ठाकरे राहणार की जाणार? संजय राऊत म्हणतात...
| Edited By: | Updated on: Jan 05, 2022 | 3:24 PM
Share

पणजीः  गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांनी अनेक ठिकाणी जाहीर उपस्थिती लावलेली नाही. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनातही ते गैरहजर होते. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) मुख्यंत्रीपदी विराजमान होतील की काय, अशा चर्चांना उधाण आलंय. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी याविषयी प्रतिक्रिया नोंदवली.

रश्मी ठाकरे मुख्यमंत्री पदी? काय म्हणाले संजय राऊत?

शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनीदेखील काल जाहीरपणे वक्तव्य केले. रश्मी ठाकरे मुख्यमंत्री पदी विराजमान होऊ शकतील, अशी शक्यता त्यांनी वर्तवली. याविषयी संजय राऊत यांनी थेट वक्तव्य केले. ते म्हणाले, ‘ उद्धव ठाकरे यांची प्रकृती उत्तम आहे. मी सध्या गोव्यात आहे. पण मला त्यांची माहिती आहे. कालही त्यांनी शिवसेनेचे विभागप्रमुख, शाखाप्रमुखांशी संवाद साधला. सध्या प्रत्यक्ष संवादापेक्षा सगळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच संवाद साधत आहेत. सगळ्यांना दिसतायत ते संवाद साधताना. पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील तसाच संवाद साधत आहेत. शेवटी व्यक्ती समोर दिसते, सूचना देते, फायलींवर सह्या होतायत. प्रशासनाला सूचना दिल्या जातायत. राज्यावर लक्ष ठेवलं जातंय,हे सगळं सुरु आहे. मुख्यमंत्र्यांचा राज्यकारभार सुरु आहे. तेच मुख्यमंत्री राहतील आणि त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील. यात मला कोणतीही शंका वाटत नाही.’

अब्दुल सत्तारांची हळद आणखी उतरायचीय- संजय राऊत

अब्दुल सत्तार यांनी रश्मी ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाविषयीचे वक्तव्य केल्याने चर्चांना उधाण आले आहे. त्याविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले, ‘ हे जे मंत्री आहेत त्यांनी पक्षात 25 वर्ष पूर्ण केली तर त्यांच्या विधानाला काही अर्थ राहील, अजून त्यांच्या अंगावरची हळद उतरायची आहे बरीचशी. अजून त्यांना शिवसेनेची हळद पूर्णपणे लागायची आहे. बोलू द्या त्यांना, दुसरं कोण बोलतंय का? प्रमुख लोकांपैकी? असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

इतर बातम्या-

ज्येष्ठ नागरिकाच्या अंगावर खुजलीची पावडर ओतली, हातात होती दोन लाखांची बॅग… परळीत धक्कादायक प्रकार

Nashik|नाशिकमध्ये उद्यापासून रंगणार हॉकी लीगचे सामने…!

... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं
... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं.
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान.
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा.
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी.
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका.
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!.
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक.
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका.
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका.
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक.