AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | सत्यजित तांबे यांचं सभागृहात पहिलंच भाषण, म्हणाले… याचं श्रेय फडणवीसांचं! नेमके मुद्दे काय?

Satyajeet Tambe News | विधान परिषदेत आज नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे यांचं पहिलं भाषण झालं. अत्यंत नाट्यमय निवडणुकीनंतर सत्यजित तांबे यांचा नाशिक पदवीधर मतदार संघात विजय झाला. त्यामुळे त्यांच्या आमदारकीच्या पहिल्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष होतं.

Video | सत्यजित तांबे यांचं सभागृहात पहिलंच भाषण, म्हणाले... याचं श्रेय फडणवीसांचं! नेमके मुद्दे काय?
Image Credit source: social media
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Mar 03, 2023 | 3:26 PM
Share

मुंबई : महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु आहे. या अधिवेशनात नव निर्वाचित आमदार सत्यजित तांबे (Satyajeet tambe) यांनी प्रथमच हजेरी लावली. नाशिक पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून आलेले सत्यजित तांबे यांनी सभागृहात आज पहिलं भाषण केलं. एरवी फार गाजावाजा न होणारी पदवीधरची निवडणूक यंदा गाजली ती सत्यजित तांबे यांच्यामुळे. तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापासून मतदान आणि निकाल लागेपर्यंतही महाराष्ट्रात मोठ्या नाट्यमय घडामोडी झाल्या. काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे कधी भाजपात जातील आणि काँग्रेसमध्ये मोठा भूकंप होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र असं काही घडलं नाही आणि सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आणि ते निवडून आले. आज विधान परिषदेत बोलताना त्यांनी या राजकीय नाट्याचा धावता उल्लेख केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांचं नाव आवर्जून घेतलं.

काय म्हणाले सत्यजित तांबे?

सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेची निवडणूक आपण कशी लढवली आणि इथपर्यंत कसे आलो, याचा उल्लेख भाषणादरम्यान केला. ते म्हणाले, माझी संपूर्ण निवडणूक कशी झाली, ते तुम्ही पाहिलं. माझ्या यशाचं श्रेय माझ्या वडिलांच्या कामाचं आहे. पण हे सर्व घडत असताना मला निवडणूक लढण्याची परिस्थिती निर्माण झाली, त्याचं श्रेय देवेंद्रजींना आहे. राजकीय जीवनात मी एक वाक्य कायम लक्षात ठेवतो. वारसाने संधी मिळते, पण कर्तृत्व कायम सिद्ध करावं लागतं…

सत्यजित तांबे यांच्या भाषणातील मुद्दे

  • – विधान परिषद आणि विधानसभेचं लाइव्ह प्रक्षेपण सर्वत्र दिसत असतं. जनतेच्याही याकडून मोठ्या अपेक्षा असतात. त्यामुळे सभागृहाचं कामकाज वारंवार स्थगित होऊ न देण्याचा प्रयत्न केला जावा, अशी विनंती सत्यजित तांबे यांनी भाषणादरम्यान केली.
  •  राज्यपालांनी अभिभाषणात ७५ हजार नोकर भरतीचा निर्णय जाहीर केला. मात्र ती नोकरभरती, कुठे, कधी, कशी होणार याचा उल्लेख नव्हता. असं तांबे यांनी सांगितलं.
  •  अनेक सुशिक्षित तरुणांना परीक्षा पास होऊनही नोकरी मिळत नाही. नियुक्ती मिळत नाही. ही वस्तुस्थिती आहे. परवा हायकोर्टाने परीक्षा घेतलेल्या १४०० विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी मला भेटले.
  •  जलसंपदा विभागातही अनेक जागा रिक्त आहेत. मतदार संघात फिरताना शिक्षण अवस्था वाइट आहे. शिक्षक, इतर कर्मचारी, प्राध्यापक, प्राचार्य, शिपायांची भरती रखडलेली आहे. २ लाखांपेक्षा जास्त आज रिक्त आहेत. ७५ हजारांच्या भरतीने किती न्याय मिळणार, असा प्रश्न सत्यजित तांबे यांनी केली.
  •  मध्य प्रदेशने वयाच्या अटीत ३ वर्षांची शिथिलता आणली. इतर राज्यांनीही अशी शिथिलता आणली. महाराष्ट्रातही अशी व्यवस्था करावी, अशी मागणी सत्यजित तांबे यांनी केली.
  •  जुन्या पेंशन योजनेमुळे हिमाचलचे निकाल बदलले. यामुळे आर्थिक भार पडेल. पण कर्मचाऱ्यांना न्याय मिळण्यासाठी शासनाने याचा विचार करावा.
  •  दावोसमध्ये झालेले एमओयू होत असताना कंपन्या येतात. फोटोसेशन होतात. पण प्रत्यक्षात किती उद्योगधंदे येतात, हा संशोधनाचा विषय आहे.
  •  आपला दवाखाना सारखे नवे प्रकल्प येत आहेत. मात्र सध्या अस्तित्वात असलेल्या दवाखान्यात सुविधा आहेत का, याकडे लक्ष द्यावं.
  •  एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस सरकारचं विशेष अभिनंदन करतो. समृद्धी महामार्ग पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन करतो. यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचा विकास होणार आहे.
  •  दिव्यांग विभाग काढल्याबद्दल सरकारचे अभिनंदन.
  •  नवीन शैक्षणिक धोरणाचा उल्लेख अभिभाषणात केला गेला. मात्र त्यासाठीची तयारी अद्याप शासनस्तरावर झालेली नाही. आझाद मैदानावर अनेक संघटना आंदोलनं करतात. त्यांच्याकडे शासनाचं लक्ष असावं, अशी विनंती सत्यजित तांबे यांनी केली.

Follow Us
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने एकच खळबळ
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
Eknath Shinde | चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीचा आदेश!
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
Raj Thackeray | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; मोदींच्या मौनावर गंभीर सवाल
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
Rohit Pawar | 'आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ