AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Avimukteshwaranand : मोहन भागवत तुम्ही लग्न करुन मुलं जन्माला का नाही घालत? शं‍कराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचा सल्ला

Avimukteshwaranand : "युद्धावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका काय होती? यावर मी काही बोलणार नाही असं ते म्हणाले. एक बाजू अन्याय करतेय आणि दुसरी तो अन्याय सहन करतेय हे सांगण विद्धवानाचा कर्तव्य असतं"

Avimukteshwaranand : मोहन भागवत तुम्ही लग्न करुन मुलं जन्माला का नाही घालत? शं‍कराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचा सल्ला
Avimukteshwaranand-Mohan Bhagwat
| Updated on: Apr 06, 2026 | 11:54 AM
Share

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आतापर्यंत अनेकदा तीन मुलं जन्माला घालण्याचा सल्ला दिला आहे. यावर आता स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी त्यांना उत्तर दिलं आहे. “मोहन भागवत आणि त्यांच्या प्रचारकांनी मुलं जन्माला घालून लोकसंख्या वाढवावी” असा स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी सल्ला दिला आहे. “एकाबाजूला सरकार म्हणते लोकसंख्येचा स्फोट होतोय, दुसरीकडे हे लोक लोकसंख्या वाढवण्याबद्दल बोलतात. संख्या इतकीच वाढवायची असेल तर तुम्ही लग्न करुन मुलं जन्माला का नाही घालत?. दुसऱ्यांवर ओझं का लादता?. पहिलं स्वत: करा, मग दुसऱ्यांना सांगा” असं स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले. ते बरेलीमध्ये बोलत होते.

“समाजाला दिशा देणाऱ्या लोकांनी स्वत:च्या व्यक्तीगत आयुष्यात तेच आचरण केलं पाहिजे, जो ते दुसऱ्यांना सल्ला देतात” असं स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती बोलले. “हिंदुंची संख्या वाढवण्याची चिंता असेल तर मोहन भागवत यांनी स्वत: लग्न करुन मुलं जन्माला घातली पाहिजेत. देशात धर्म आणि लोकसंख्येसारख्या संवेदनशील मुद्यांवर बोलण्याआधी नेत्यांनी आपल्या आचरणावर लक्ष दिलं पाहिजे” असं शंकराचार्य म्हणाले. त्यांनी समाजाला संतुलन आणि सदभावना कायम ठेवण्याचं आवाहन केलं. विरोधी पक्षाचं तुम्ही समर्थन करता का? या प्रश्नावर ते म्हणाले की, “सत्ताधारी म्हणतात आम्ही विरोधकांसोबत आहोत. मी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही आमचं ऐका. गो मातेच्या रक्षणासाठी कायदा करा” “आम्ही तुमच्यासोबत उभे राहू. मी सत्ताधारी-विरोधक कोणासोबत नाहीय. जो कोणी आमचं ऐकलं, मी त्याच्यासोबत उभा राहीन” असं स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले.

युद्धात दोन्ही बाजू योग्य असू शकत नाहीत

युद्ध होतं, तेव्हा त्यात दोन बाजू असतात. एक न्यायाची दुसरी अन्यायाची असं स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती रविवारी म्हणाले. “आज एकापक्षात अमेरिका-इस्रायल तर दुसऱ्याबाजूला इराण आहे. आश्चर्य याचं वाटतं जगातील सगळे विद्धान या मुद्यावर मौन धारण करुन आहेत. हा मानवतेविरुद्ध गुन्हा आहे. युद्धावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका काय होती? यावर मी काही बोलणार नाही असं ते म्हणाले. एक बाजू अन्याय करतेय आणि दुसरी तो अन्याय सहन करतेय हे सांगण विद्धवानाचा कर्तव्य असतं. कारण युद्धात दोन्ही बाजू योग्य असू शकत नाहीत” असं स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले.

भारत ज्यूंच्या जाळ्यात फसतोय

“भारत सुरुवातीपासून कुठल्याही गटाचा भाग राहिलेला नाही. भारत युद्ध प्रसंगात कधी कोणाच्या बाजूने उभा राहिलेला नाही. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या मौनामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतोय की, ते कोणाच्यारी बाजूने आहेत. पंतप्रधान इस्रायलच्या बाजूने आहेत. ही बाब चिंता वाढवते. भारत ज्यूंच्या जाळ्यात फसतोय. युद्धामुळे गॅस सिलेंडरची समस्या आहे. पण पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना याची जाणीव नाहीय. कारण त्यांच्या निवासस्थानाची वीज जात नाही किंवा रेशन कमी पडत नाही. त्यांच्यासाठी सर्व चांगलं आहे पण जनता त्रस्त आहे” असं स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले.

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला