AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवारांकडून तेलंगणा सरकारचं कौतुक, दीड तासाच्या बैठकीत पवार आणि केसीआर यांच्यात कोणत्या विषयांवर चर्चा?

पवार आणि केसीआर यांच्यात जवळपास दीड तास बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, खासदार सुप्रिया सुळे, तेलंगणातील काही आमदार, खासदार आणि अभिनेते प्रकाश राजही उपस्थित होते. बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना पवार यांनी तेलंगणा सरकारचं कौतुक केलं. तसंच बेरोजगारी आणि गरिबी यासह अनेक समय्यांवर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती पवारांनी दिली.

शरद पवारांकडून तेलंगणा सरकारचं कौतुक, दीड तासाच्या बैठकीत पवार आणि केसीआर यांच्यात कोणत्या विषयांवर चर्चा?
के. चंद्रशेखर राव, शरद पवार
| Edited By: | Updated on: Feb 20, 2022 | 7:18 PM
Share

मुंबई : भाजपविरोधात तिसऱ्या आघाडीच्या निर्मितीसाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. त्याच पार्श्वभूमीवर केसीआर यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर केसीआर पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी दाखल झाले. त्यावेळी पवार आणि केसीआर यांच्यात जवळपास दीड तास बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, खासदार सुप्रिया सुळे, तेलंगणातील काही आमदार, खासदार आणि अभिनेते प्रकाश राजही उपस्थित होते. बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना पवार यांनी तेलंगना सरकारचं कौतुक केलं. तसंच बेरोजगारी आणि गरिबी यासह अनेक समय्यांवर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती पवारांनी दिली.

तेलंगणा सरकारचे पवारांकडून कौतुक

शरद पवार म्हणाले की, आम्ही राष्ट्रीय पातळीवरील पक्षांचे नेते एकत्र येतो तेव्हा नेहमी राजकीय विषयांवर चर्चा होते. मात्र आजची बैठक वेगळी होती. आजची बैठक यासाठी वेगळी होती की आज देशासमोर ज्या समस्या आहेत, मग ती बेरोजगारी, गरिबी, भूकबळी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या अशा समस्यांवर सगळ्यांनी मिळून काय करायला हवं? आज आपली सगळ्यात महत्वाची जबाबदारी ही आहे, या महत्वाच्या विषयावर आज चर्चा झाली. आज विकासाचा मुद्दा महत्वाचा असल्यानं जास्त राजकीय चर्चा केली नाही. खास करुन देशात कुठेही नाही असे पाऊल तेलंगणात शेतकऱ्यांसाठी उचलण्यात आले आहे, तो एक रस्ता तेलंगनाने देशाला दाखवला आहे, अशा शब्दात पवार यांनी तेलंगणा सरकारचं कौतुक केलं आहे.

बेरोजगारी आणि गरिबी या समस्यांवर उपाययोजना करण्याची गरज

‘आज तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि त्यांचे सर्व खासदार, नेते आज आले होते. त्यांच्याशी केवळ विकासाच्या मुद्यावरच चर्चा झाली. आज गरिबी आणि बेरोजगारी या मोठ्या समस्येवर उपाययोजना करण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वांनी बसून मार्ग शोधायला हवा. अशा विकासाच्या मुद्द्यावर एक वेगळं वातावरण तयार करण्यासाठी प्रयत्न करायला हवे. त्यासाठी आम्ही सर्व मिळून पुन्हा कुठे बसायचं, कधी बसायचं याबाबत ठरवू’, असंही शरद पवार यांनी यावेळी सांगितलं.

इतर बातम्या : 

‘देशात सुडाचं राजकारण वाढतंय, मग देशाला भविष्य काय?’, के. चंद्रशेखर राव यांच्यासोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांचा सवाल

Video | कानगोष्ट माईकने ऐकली! ‘नो क्वेशन आन्सर’ म्हणण्याची दुसऱ्यांदा वेळ का आली? लोकांचा राऊतांना सवाल

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.