AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवनीत राणांसाठी सभा, शरद पवार म्हणाले मोदींनी वाटोळं केलं!

अमरावती : अमरावती लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाघाडीच्या उमेदवार नवनीतकौर राणा यांच्या प्रचारासाठी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा झाली. संत ज्ञानेश्वर संस्कृतिक भवनात झालेल्या प्रचार सभेत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली. गांधी कुटुंबाने देशासाठी काय केले याचा पाढा वाचणाऱ्या मोदींनी गेल्या पाच वर्षात आपण कोणते दिवे लावले, हे जनतेला सांगावे, […]

नवनीत राणांसाठी सभा, शरद पवार म्हणाले मोदींनी वाटोळं केलं!
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM
Share

अमरावती : अमरावती लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाघाडीच्या उमेदवार नवनीतकौर राणा यांच्या प्रचारासाठी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा झाली. संत ज्ञानेश्वर संस्कृतिक भवनात झालेल्या प्रचार सभेत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली.

गांधी कुटुंबाने देशासाठी काय केले याचा पाढा वाचणाऱ्या मोदींनी गेल्या पाच वर्षात आपण कोणते दिवे लावले, हे जनतेला सांगावे, अशी टोलेबाजी पवारांनी केली.

मोदींनी गेल्या पाच वर्षात देशाचे वाटोळे केले. कृषी विकासदर घसरला असून, देशातल्या संवैधानिक संस्था नामशेष करण्याचे काम त्यांनी केले आहे. सैन्याने दाखविलेल्या शौर्यावरही ते आपलाच अधिकार दाखवत आहेत, असा आरोप पवारांनी केला.

विंग कमांडर अभिनंदनच्या सुटकेनंतरही आपल्या 56 इंचाच्या छातीचे वारंवार प्रदर्शन मांडणाऱ्या मोदींनी, गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानी तुरुंगात असलेल्या कुलभूषण यांना भारतात आणण्यासाठी काय प्रयत्न केले हे सांगावे, असा सवाल पवारांनी केला.

मोदी हे देशावर आलेले संकट नसून राष्ट्रीय आपत्ती आहे,ही आपत्ती  घालवणे गरजेचे आहे. देशातील न्यायव्यवस्था, RBI, CBI या संस्था मोदींनी मोडकळीस काढल्या,त्या टीकवून ठेवण्याची गरज आहे, असं पवार म्हणाले.

मोदी म्हणतात माझं बोट धरुन राजकारणात आलो. मात्र तेव्हापासून मी माझे बोट आणि हात लांब ठेवत आहे. माझं बोट धरल्याचं सांगून इतकं वाटोळे करत असेल, तर हात धरल्यावर देशाचं आणखी किती वाटोळे करेल काय माहित, असा टोमणा पवारांनी लगावला.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली