AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhaskar Jadhav: नियती कुणालाही सोडत नाही, भास्कर जाधवांचा हल्लाबोल, बोला संजय राठोड, सरनाईकांचं काय करताय?

Bhaskar Jadhav: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधासभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यानंतर विधानसभेत अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. त्यावर भाष्य करताना भास्कर जाधव यांनी बंडखोरांना घेरतानाच भाजपवर हल्लाबोल केला.

Bhaskar Jadhav: नियती कुणालाही सोडत नाही, भास्कर जाधवांचा हल्लाबोल, बोला संजय राठोड, सरनाईकांचं काय करताय?
नियती कुणालाही सोडत नाही, भास्कर जाधवांचा हल्लाबोल, बोला संजय राठोड, सरनाईकांचं काय करताय?Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 04, 2022 | 2:11 PM
Share

मुंबई : शिवसेनेविरोधात बंड करणाऱ्या 40 आमदारांना शिवसेना नेते भास्कर जाधव (bhaskar jadhav) यांनी आपल्या आक्रमक शैलीत फटकारले. आज शिवसेनेत काय झालं? एका बाजूला 40 शिलेदार आहेत. तर दुसऱ्या बाजूला शिवसैनिक (shivsena) छातीचा कोट करून शिवसेना वाचवण्यासाठी झटत आहे. कोण कुणाला रक्तबंबाळ करणार आहे? कोण कुणाला धाराशायी करणार आहे? कोण कोणाला पराभूत करणार आहे? त्याचा विचार करा. एकदा हातात तलवार घेतली, रणांगणात उतरला तर जेव्हा हातात तलवार असते तेव्हा कुठं थांबायचं हे ज्याला कळतं तो खरा योद्धा, असं सांगतानाच तुम्ही अनेकांच्या मागे चौकश्या लावल्या. कुणाच्या पाठी ईडी लावली तर कुणाच्या पाठी आणखी काय. राठोडांना मंत्रिपद मिळू नये म्हणून तुम्ही काय काय केलं. आता तुम्ही त्यांनाच बाजूला घेऊन बसला आहात. नियती कुणाला सोडत नाही. बोला संजय राठोड, सरनाईकांचं काय करताय? असा सवाल भास्कर जाधव यांनी केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधासभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यानंतर विधानसभेत अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. त्यावर भाष्य करताना भास्कर जाधव यांनी बंडखोरांना घेरतानाच भाजपवर हल्लाबोल केला. ज्या भाजपच्या हिंदुत्वाच्या गोष्टी, साधनशुचितेच्या गोष्टी तुम्ही करत आहात. संजय राठोड तुमच्या बाजूला बसले आहेत. त्यांचं मंत्रिपद घालवायला तुम्ही काय काय केलं नाही. त्यांना मंत्रिपद दिलं . जाणार होतं, तेव्हा तुम्ही महाराष्ट्रात आंदोलन करण्याचा इशारा दिला. आता ते तुमच्या बाजूने बसले आहेत. प्रताप सरनाईक आणि यामिनी जाधव यांच्यामागे ईडी लावली. नियती कुणाला सोडत नाही, आता तुम्हाला त्यांना वाचवायला लागत आहे, असा टोला जाधव यांनी लगावला.

मी अस्वस्थ होत नाही, विचलीतही नाही

मी अस्वस्थ होत नाही. विचलीत होत नाही. पण मी माझा चेहरा लपवू शकत नाही. शिंदे सांगतात मी शिवसैनिक आहे. शिवसेनाप्रमुखांचा वारस आहे. आनंद दिघेंचा वारस आहे. शिंदेंना सांगायचं आहे, तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे. तुमची आणि माझी कधी उठबस झालेली नाही. मी राष्ट्रवादीत होतो. तुम्हाला जय महाराष्ट्र केला तर तुम्ही मानवर करून जायचा. मी नंदनवनमध्ये दोन वेळा आलो. तुमची भेट झाली. तुमच्या एमसआरडीसीच्या कार्यालयात मी एकदा आलो. कोकणातील पुरात तुम्ही जे काम केलं. त्यामुळे तुम्ही खरे शिवसैनिक आहात हे दाखवून दिलं. तुमचा माझा फार संबंध आला नाही. पण तुम्ही लोकांच्या अडीअडचणीत तुम्ही धावून जाता हे मी ऐकलंय. तुमचं काम मी पाहिलं, अशा शब्दात त्यांनी शिंदे यांचं कौतुकही केलं.

रामायणाची पुनरावृत्ती होणार

यावेळी जाधव यांनी पानीपत, रामायण आणि महाभारताचं उदाहरण देऊन शिंदे यांना सवाल केले. तसेच भाजपवरही टीका केली. या सभागृहात पुन्हा रामायणाची पुनरावृत्ती घडणार आहे. पुन्हा एकदा महाभारत घडणार आहे. पुन्हा एकदा पानीपत होणार आहे. सख्खे भाऊ एकमेकांविरोधात आहेत. लढताहेत कुणासाठी? दिल्लीच्या पातशासाठी लढत आहात. ते पातशहा सही सलामत आहेत. मरताहेत तुम्ही आम्ही, असा हल्लाबोलही त्यांनी केला.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.