AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

35 वर्ष घरावर तुळशीपात्र ठेवले की घरावर सोन्याचे पत्रे बसवता येतील एवढा मलिदा खाल्ला? ; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा शिंदे गटावर घणाघात

त्यांनी गेले 35 वर्ष शिवसेनेची सेवा करत, आंदोलनात सहभागी होत घरावर तुळशीपात्र ठेवले की, घरावर सोन्याचे पत्रे बसवता येतील एवढा मलिदा खाल्ला असा सवाल करत शिवसेनेच्या वतीने पुन्हा एकदा शिंदे गटावर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे.

35 वर्ष घरावर तुळशीपात्र ठेवले की घरावर सोन्याचे पत्रे बसवता येतील एवढा मलिदा खाल्ला? ; शिवसेनेच्या 'या' नेत्याचा शिंदे गटावर घणाघात
| Updated on: Oct 07, 2022 | 8:43 AM
Share

मुंबई : शिवसेनेच्या (Shiv Sena) नेत्या संजना घाडी यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील (Gulabrao Patil), दादा भुसे, रामदास कदम यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. गुलाबराव पाटील, दादा भुसे, रामदास कदम यांनी गेले 35 वर्ष शिवसेनेची सेवा करत, आंदोलनात सहभागी होत घरावर तुळशीपात्र ठेवले की, घरावर सोन्याचे पत्रे बसवता येतील एवढा मलिदा खाल्ला असा सवाल संजना घाडी यांनी केला आहे. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की,  सत्तेत असताना शिवसेनेसोबत होते. मात्र शिवसेनेची आता सत्ता जाणार आहे, असे  दिसताच ते गद्दारांना जाऊन मिळाले असा घणाघात संजना घाडी यांनी केला आहे.

नेमकं काय म्हणाल्या घाडी?

संजना घाडी यांनी शिंदे गटाच्या नेत्यांवर जोरदार टीका केली आहे.  त्यांनी 35 वर्ष शिवसेनेची सेवा करत, आंदोलनात सहभागी होत घरावर तुळशीपात्र ठेवले की, घरावर सोन्याचे पत्रे बसवता येतील एवढा मलिदा खाल्ला असा सवाल संजना घाडी यांनी केला आहे. सतत्ते असताना शिवसेनेसोबत होते. अनेक पदे उपभोगली, मात्र आता सत्ता जाणार आहे असे दिसताच त्यांनी शिवसेनेला सोडले, गद्दारांना जाऊन मिळाले असं घाडी यांनी म्हटलं आहे.

सुषमा अंधारेंचं कौतुक

दरम्यान यावेळी संजना घाडी यांनी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांचं देखील कौतुक केलं आहे. शिवसेनेची सत्ता गेली तेव्हा अनेक नेते बाहेर पडले. मात्र आता शिवसेनेची सत्ता नाही, त्यामुळे आपल्याला कोणतंही पद मिळणार नाही, हे माहित असूनही सुषमा अंधारे या शिवसेनेत आल्या. त्यांनी केवळ शिवसेना वाचवण्यासाठी शिवसेनेत प्रवेश केला. त्या आपल्यावरील टीकेला चोख प्रत्युत्तर देत आहेत, त्यामुळे आम्हाला अशा वाघिणीचा अभिमान वाटतो, असे घाडी यांनी म्हटलं आहे.

Follow Us
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण..
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण...
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती....
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती.....
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी.
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा.
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं.
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर.
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त...
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त....