AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमची बायको तुम्हाला आवरत नाही आणि तुम्ही… ठाकरेंच्या उपनेत्याची रवी राणांवर खोचक टीका

Sharad Koli vs Ravi Rana : ठाकरे गटातील 6 खासदारांच्या फुटीनंतर रवी राणा यांनी दिलेल्या ऑफरवर शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. नवनीत राणा आणि युवा स्वाभिमान पार्टीचा उल्लेख करत त्यांनी रवी राणांवर खोचक टीका केली.

तुमची बायको तुम्हाला आवरत नाही आणि तुम्ही... ठाकरेंच्या उपनेत्याची रवी राणांवर खोचक टीका
Sharad Koli Criticize on Ravi RanaImage Credit source: Google
| Updated on: Jun 17, 2026 | 7:20 PM
Share

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार फुटले आहेत. हे खासदार लवकरच वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. खासदारांचा हा गट एखाद्या पक्षात सामील होणार की शिवसेनेत सामील होणार याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. अशातच ठाकरेंच्या फुटलेल्या सहा खासदारांनी गट स्थापन करून माझ्या युवा स्वाभिमान पार्टीत यावं असं आमदार रवी राणा यांनी म्हटलं होतं. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

काय म्हणाले होते रवी राणा?

ऑपरेशन टायगरवर बोलताना रवी राणा यांनी, ‘जैसी करणी वैसी भरणी’. ठाकरेंच्या फुटलेल्या सहा खासदारांनी गट स्थापन करून माझ्या युवा स्वाभिमान पार्टी यावं अशी खुली ऑफर देताना ठाकरेंचे आणखी दोन खासदार माझ्या संपर्कात असल्याचे विधान केले होते. पुढे बोलताना त्यांनी ठाकरे गट पूर्ण खाली होणार आहे, ठाकरे गटात फक्त उद्धव ठाकरे आणि संजय राऊत राहणार आहेत. मुख्यमंत्री असताना हनुमान चालीसा वाचली म्हणून नवनीत राणा आणि मला 14 दिवस दिवस उद्धव ठाकरे यांनी जेल मध्ये टाकलं होतं असंही राणा म्हणाले.

रवी राणा यांच्या ऑफरवर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी म्हटले की, रवी राणा तुमची बायको तुम्हाला आवरत नाही आणि तुम्ही दुसऱ्यांच्या खासदारांना पक्षात येण्याचे निमंत्रण देत आहात. तुमची बायको तुमच्या पक्षाचा तमाशा करून दुसऱ्या पक्षात गेली आधी ते बघा आणि तुम्ही दुसऱ्या पक्षातील खासदारांना स्वतःच्या पक्षात येण्याचं आमंत्रण देत आहात. तुमच्या बायकोला तुमच्याशी एकनिष्ठ राहायला सांगा. तुमच्या बायकोने तुमच्या पक्षाचा तमाशा मांडलाय ते आधी बघा, दुसऱ्याच्या पक्षात नाक खूपसायला जाऊ नका.

ठाकरेंचे कोणते खासदार फुटले?

हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे, उत्तर पूर्व मुंबईचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील, वाशिमचे खासदार संजय देशमुख, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि परभणीचे खासदार संजय जाधव यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे.

Follow Us
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच...
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच मोठी खळबळ; महापालिकेत काय घडलं?
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड संताप; नाव न घेता राऊतांना थेट इशारा?
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा इशारा, काय म्हणाले?
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ, खासदर फुट
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने  खळबळ, खासदर फुटीनंतर आणखी मोठा धक्का!
अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ
मोठी बातमी! अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ; सोलापुरात नेमकं काय घडतंय?
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं;
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं; थेट इशाराच दिला!
मुंबईत पोलीस तैनात! दिना पाटील यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त!
Operation Tiger | दिल्लीत बंड, मुंबईत पोलीस तैनात! संजय दिना पाटील यांच्या घराबाहेर अचानक वाढवला पोलिस बंदोबस्त!
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या...
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या... नेमकं कारण काय?
ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
Sushma Andhare | ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
6 खासदार कुठे गेले?; सामंतांच्या एका वक्तव्याने राजकारणत खळबळ!
Uday Samant | 6 खासदार कुठे गेले?; उदय सामंतांच्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ!