AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई, ठाणे वगळता इतर ठिकाणी युती होणं अवघड, नीलम गोऱ्हेंचं मोठं विधान!

राज्यातील राजकीय पक्षांना आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहे. नाशिक, पुणे, मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी राजकीय पक्ष रणनीती आखत आहेत.

मुंबई, ठाणे वगळता इतर ठिकाणी युती होणं अवघड, नीलम गोऱ्हेंचं मोठं विधान!
neelam gorhe
| Updated on: Apr 17, 2025 | 3:56 PM
Share

 Neelam Gorhe : राज्यातील राजकीय पक्षांना आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहे. नाशिक, पुणे, मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी राजकीय पक्ष रणनीती आखत आहेत. पुन्हा एकदा युती आणि आघाड्यांचा खेळ चालू झाला आहे. असे असतानाच आता शिवसेना पक्षाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या युतीबाबत मोठं विधान केलं आहे. मुंबई, ठाणे वगळता इतर ठिकाणी युती होणे अवघड आहे, असं त्या म्हणाल्या आहेत. त्या पुण्यात शिवसेनेच्या सभासद नोंदणी अभियानाच्या कार्यक्रमात बोलत होत्या.

पण अवलंबून राहू नका…

मुंबई, ठाणे वगळता इतर ठिकाणी युती होणे अवघड आहे. झाली तर आनंद आहे. पण अवलंबून राहू नका, असा संदेशच नीलम गोऱ्हे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे. तसेच कार्यक्रमानंतर माध्यम प्रतिनिधींशी बातचित करताना “आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी सभासद नोंदणी करण्यास सांगितलेलं आहे. पुण्यातील काही विधानसभा मतदारसंघांमध्ये आता आम्ही सभासद नोंदणी सुरू करणार आहोत,” अशी माहिती त्यांनी दिली.

सर्वस्वी निर्णय आमचे वरिष्ठ नेते घेतील

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची नुकतीच भेट झाली आहे. या भेटीनंतर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी या दोन्ही पक्षांची युती होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “युती होईल का नाही हे माहिती नाही. याचा सर्वस्वी निर्णय आमचे वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे, देवेंद्रजी फडवणीस आणि अजित पवार घेतील. आपण आपलं काम करत राहतो आणि चांगल्या प्रमाणात पक्ष वाढवावा तेवढेच मला वाटतं. योग्य निर्णय वरिष्ठ घेतील,” अशी सावध प्रतिक्रिया गोऱ्हे यांनी दिली.

बाळासाहेबांनी काँग्रेसवर टीका केली, त्याचबरोबर…

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा नाशिकमध्ये 16 एप्रिल रोजी मेळावा पार पडला. या मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे यांचे एआय आवाजातील भाषण कार्यकर्त्यांना ऐकवण्यात आले. यावरही गोऱ्हे यांनी ठाकरे गटावर टीका केली. “ते संपूर्ण भाषण मी पाहिलेला आहे. शेवटी ही टेक्नॉलॉजी आहे. जे आपण सांगू तेच त्यामध्ये येतं. बाळासाहेबांनी काँग्रेसवर टीका केली होती. त्याचबरोबर मी पंतप्रधान असतो, तर लाल चौकात जाऊन ध्वजवंदन केलं असतं, असं म्हटलं होतं. हेच काम पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी केलं. 370 कलम हटवलं, तीन तलाक कायदा आणला. त्याचबरोबर लाल चौकात ध्वजवंदन झालं. त्यामुळे खरा विचार आणि खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वाखाली पुढे जात आहे,” असे म्हणत बाळासाहेबांचे विचार आम्हीच पुढे नेत आहोत, असा अप्रत्यक्ष दावा गोऱ्हे यांनी केला.

Follow Us
भाजपमध्ये आतल्याआतच मोठं घडतंय? बड्या नेत्याचं पद जाईल म्हणून...
भाजपमध्ये आतल्याआतच मोठं घडतंय? बड्या नेत्याचं पद जाईल म्हणून... उद्धव ठाकरेंनी सांगितली इनसाईड स्टोरी
इतिहास आहे, इकडचे खासदार काही वर्षांनी.. संजय जाधवांच्या मतदारसंघातील
इतिहास आहे, इकडचे खासदार काही वर्षांनी.. संजय जाधवांच्या मतदारसंघातील दौऱ्यापूर्वीच उद्धव ठाकरेंचे विधान
अजित पवारांच्या आठवणीत सुप्रिया सुळे झाल्या भावूक! शेअर केला तो खास फो
Supriya Sule | अजित पवारांच्या आठवणीत सुप्रिया सुळे झाल्या भावूक! शेअर केला तो खास फोटो
धक्कादायक! आठवड्याभरातच मुंबई लोकलमध्ये तिसरा चाकू हल्ला; माहिममध्ये..
धक्कादायक! आठवड्याभरातच मुंबई लोकलमध्ये तिसरा चाकू हल्ला; माहिममध्ये...
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
एक-एक टक्का देतो, आधी 40...  शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; एकच खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
Omraje Nimbalkar | श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले....
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
Omraje Nimbalakar | ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस... मोठा गोंधळ
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना...
तर नोकरी सोडून राजकारणात या, विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर
तर नोकरी सोडून राजकारणात या, IPS विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर राज ठाकरेंचा थेट हल्लबोल!