AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्या झाडावर वाढलात, तेच खायला निघालात, नियती सोडणार नाही, भास्कर जाधवांचा भाजपला इशारा

भाजपला नैतिकतेच्या गोष्टी तोंडातून बोलता येतात पण प्रत्यक्ष नैतिकता भाजपने कधीच पाळली नाही, असा टोला भास्कर जाधव यांनी भाजपला लगावला. (Bhaskar Jadhav Param bir Singh)

ज्या झाडावर वाढलात, तेच खायला निघालात, नियती सोडणार नाही, भास्कर जाधवांचा भाजपला इशारा
शिवसेना आमदार भास्कर जाधव
| Updated on: Mar 22, 2021 | 4:36 PM
Share

रत्नागिरी : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाच्या संजीवनीने भाजप मोठी झाली. ज्या झाडावर तुम्ही वाढलात, ते झाडच तुम्ही खायला निघालात. त्यामुळे नियती कुणालाच सोडत नसते अला टोला शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी लगावलाय. (Shivsena MLA Bhaskar Jadhav warns BJP over Param bir Singh Letter bomb)

“मुख्यमंत्री झाला नाही, ही भाजपची खदखद”

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्ब प्रकरणावरुन शिवसेना आमदार आणि माजी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी विरोधकांवर घणाघाती टीका केली. भारतीय जनता पक्षाची दुखरी नस म्हणजे त्यांचा मुख्यमंत्री झाला नाही, ही खदखद आहे. भाजपला माहिती आहे की महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष चाललं, तर 2024 मध्ये देशात भाजप सरकार दिसणार नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाच्या संजीवनीने भाजप मोठी झाली. ज्या झाडावर तुम्ही वाढलात ते झाडच तुम्ही खायला निघालात, त्यामुळे नियती कुणालाच सोडत नसते, अला इशारा आमदार भास्कर जाधव यांनी दिला.

“प्रत्यक्ष नैतिकता भाजपने कधीच पाळली नाही”

छोट्या छोट्या गोष्टीत केंद्र सरकार राज्य सरकाच्या गोष्टीत हस्तक्षेप करतंय. एटीएसचा तपास पूर्ण होत आला असताना तो तपास एनआयएकडे जाणं हेच यातून स्पष्ट होत असल्याचं मत भास्कर जाधव यांनी व्यक्त केलं. नैतिकतेचे धडे भाजपने आम्हाला शिकवू नयेत. गुजरातचे गृहमंत्री अमित शाह होते त्यावेळी पोलिस मुख्य डी. जी वंजारी यांनी आरोप केले होते, त्यावेळी अमित शहा यांनी राजीनामा दिला का? मोहन डेलकरांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नावं दिली, त्यांचं काय झालं? त्यामुळे भाजपला नैतिकतेच्या गोष्टी तोंडातून बोलता येतात पण प्रत्यक्ष नैतिकता भाजपने कधीच पाळली नाही, असा टोला भास्कर जाधव यांनी भाजपला लगावला.

“फडणवीस दिल्लीतून आल्यावर पत्र कसं काय पुढे आलं?”

नैतिकता दाखवण्याचं काम महाविकास आघाडीनं केलं. तुम्ही बोट दाखवाल त्याला बाहेर काढायचं ही तुमची नैतिकता आम्हाला मान्य नाही. परमबीर सिंहांच्या पत्रावर शंका उपस्थित करत त्यांनी अजून या साऱ्या प्रकरणाचा खुलासा का केला नाही? असा सवाल आमदार भास्कर जाधवांनी उपस्थित केलाय. देवेंद्र फडणवीस दिल्लीतून आल्यावर हे पत्र कसं काय पुढे आलं, यावर लवकरत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलतील, असंही भास्कर जाधव म्हणाले.

नारायण राणेंवर अप्रत्यक्ष हल्लाबोल

लेटर बॉम्बवरुन हल्लबोल करणाऱ्या भाजप खासदार नारायण राणेंवर भास्कर जाधवांनी अप्रत्यक्ष हल्लाबोल केलाय. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे अलगद मुख्यमंत्री झाले, ते मुख्यमंत्री झाले हे पचनी पडत नाही. त्यामुळे झोपेतसुद्धा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेले त्यांना दिसतात. मी मुख्यमंत्री झालो नाही आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, असं दिसतं. त्यामुळे वाचाळवीरांच्या बोलण्याकडे महाराष्ट्र लक्ष्य देत नाही, आम्हीही देत नाही असं सांगत भास्कर जाधव यांनी नारायण राणेंना चिमटा काढलाय.

संबंधित बातम्या :

देवेंद्र फडणवीस यांचे मानसिक संतुलन बिघडले, काँग्रेसचा हल्लाबोल

खंडणीप्रकरणी देशमुखांची चौकशी करून गुन्हा दाखल करा; भातखळकरांची पोलीस ठाण्यात तक्रार

(Shivsena MLA Bhaskar Jadhav warns BJP over Param bir Singh Letter bomb)

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.