AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्या झाडावर वाढलात, तेच खायला निघालात, नियती सोडणार नाही, भास्कर जाधवांचा भाजपला इशारा

भाजपला नैतिकतेच्या गोष्टी तोंडातून बोलता येतात पण प्रत्यक्ष नैतिकता भाजपने कधीच पाळली नाही, असा टोला भास्कर जाधव यांनी भाजपला लगावला. (Bhaskar Jadhav Param bir Singh)

ज्या झाडावर वाढलात, तेच खायला निघालात, नियती सोडणार नाही, भास्कर जाधवांचा भाजपला इशारा
शिवसेना आमदार भास्कर जाधव
| Updated on: Mar 22, 2021 | 4:36 PM
Share

रत्नागिरी : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाच्या संजीवनीने भाजप मोठी झाली. ज्या झाडावर तुम्ही वाढलात, ते झाडच तुम्ही खायला निघालात. त्यामुळे नियती कुणालाच सोडत नसते अला टोला शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी लगावलाय. (Shivsena MLA Bhaskar Jadhav warns BJP over Param bir Singh Letter bomb)

“मुख्यमंत्री झाला नाही, ही भाजपची खदखद”

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्ब प्रकरणावरुन शिवसेना आमदार आणि माजी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी विरोधकांवर घणाघाती टीका केली. भारतीय जनता पक्षाची दुखरी नस म्हणजे त्यांचा मुख्यमंत्री झाला नाही, ही खदखद आहे. भाजपला माहिती आहे की महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष चाललं, तर 2024 मध्ये देशात भाजप सरकार दिसणार नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाच्या संजीवनीने भाजप मोठी झाली. ज्या झाडावर तुम्ही वाढलात ते झाडच तुम्ही खायला निघालात, त्यामुळे नियती कुणालाच सोडत नसते, अला इशारा आमदार भास्कर जाधव यांनी दिला.

“प्रत्यक्ष नैतिकता भाजपने कधीच पाळली नाही”

छोट्या छोट्या गोष्टीत केंद्र सरकार राज्य सरकाच्या गोष्टीत हस्तक्षेप करतंय. एटीएसचा तपास पूर्ण होत आला असताना तो तपास एनआयएकडे जाणं हेच यातून स्पष्ट होत असल्याचं मत भास्कर जाधव यांनी व्यक्त केलं. नैतिकतेचे धडे भाजपने आम्हाला शिकवू नयेत. गुजरातचे गृहमंत्री अमित शाह होते त्यावेळी पोलिस मुख्य डी. जी वंजारी यांनी आरोप केले होते, त्यावेळी अमित शहा यांनी राजीनामा दिला का? मोहन डेलकरांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नावं दिली, त्यांचं काय झालं? त्यामुळे भाजपला नैतिकतेच्या गोष्टी तोंडातून बोलता येतात पण प्रत्यक्ष नैतिकता भाजपने कधीच पाळली नाही, असा टोला भास्कर जाधव यांनी भाजपला लगावला.

“फडणवीस दिल्लीतून आल्यावर पत्र कसं काय पुढे आलं?”

नैतिकता दाखवण्याचं काम महाविकास आघाडीनं केलं. तुम्ही बोट दाखवाल त्याला बाहेर काढायचं ही तुमची नैतिकता आम्हाला मान्य नाही. परमबीर सिंहांच्या पत्रावर शंका उपस्थित करत त्यांनी अजून या साऱ्या प्रकरणाचा खुलासा का केला नाही? असा सवाल आमदार भास्कर जाधवांनी उपस्थित केलाय. देवेंद्र फडणवीस दिल्लीतून आल्यावर हे पत्र कसं काय पुढे आलं, यावर लवकरत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलतील, असंही भास्कर जाधव म्हणाले.

नारायण राणेंवर अप्रत्यक्ष हल्लाबोल

लेटर बॉम्बवरुन हल्लबोल करणाऱ्या भाजप खासदार नारायण राणेंवर भास्कर जाधवांनी अप्रत्यक्ष हल्लाबोल केलाय. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे अलगद मुख्यमंत्री झाले, ते मुख्यमंत्री झाले हे पचनी पडत नाही. त्यामुळे झोपेतसुद्धा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेले त्यांना दिसतात. मी मुख्यमंत्री झालो नाही आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, असं दिसतं. त्यामुळे वाचाळवीरांच्या बोलण्याकडे महाराष्ट्र लक्ष्य देत नाही, आम्हीही देत नाही असं सांगत भास्कर जाधव यांनी नारायण राणेंना चिमटा काढलाय.

संबंधित बातम्या :

देवेंद्र फडणवीस यांचे मानसिक संतुलन बिघडले, काँग्रेसचा हल्लाबोल

खंडणीप्रकरणी देशमुखांची चौकशी करून गुन्हा दाखल करा; भातखळकरांची पोलीस ठाण्यात तक्रार

(Shivsena MLA Bhaskar Jadhav warns BJP over Param bir Singh Letter bomb)

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.