AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान मोदी येतात, रिबीन कापून जातात, उद्योगाचे काय? संजय राऊतांचा संतप्त सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या महाराष्ट्र दौऱ्यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येतात आणि रिबीन कापून जातात, उद्योगाचे काय? असा थेट सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

पंतप्रधान मोदी येतात, रिबीन कापून जातात, उद्योगाचे काय? संजय राऊतांचा संतप्त सवाल
| Updated on: Sep 20, 2024 | 10:55 AM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज वर्ध्यात पी एम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा साजरा होत आहे. या कार्यक्रमाला राज्यपाल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत. वर्ध्याच्या स्वावलंबी मैदानावर हा संपूर्ण कार्यक्रम पार पडणार आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या महाराष्ट्र दौऱ्यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येतात आणि रिबीन कापून जातात, उद्योगाचे काय? असा थेट सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

संजय राऊतांनी नुकतंच मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावर जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी येतात आणि जातात. आपण नक्की कसलं उद्धाटन केलंय हे देखील त्यांना माहिती नसतं, ही महाराष्ट्राची परिस्थिती आहे. खरंतर या राज्याच्या संदर्भात भाजप डळमळीत आणि अस्थिर झाला आहे. औद्योगिकदृष्ट्या कमजोर झालेला आहे. त्याचं सर्वस्वी कारण म्हणजे नरेंद्र मोदी येतात आणि रिबीन कापून जातात. उद्योगाचे काय? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.

“जे काही उद्योग गुजरातला नेला आहात, ते पुन्हा महाराष्ट्राला द्या”

आजही एक मोठा उद्योग गुजरातला नेला आहे. विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी दिलेली माहिती अत्यंत गंभीर आहे. नरेंद्र मोदींनी उद्धाटन करण्यापेक्षा महाराष्ट्रातील जे उद्योग गुजरातला नेताय, ते महाराष्ट्रात थांबवण्यासाठी काही प्रयत्न करा. मोदी काश्मीरला गेले. पूर्ण राज्याचा दर्जा देणार असं म्हटलं आहे. का म्हटलं तर तिथल्या लोकांचा संताप आहे. मग तेव्हा तुम्ही पूर्ण राज्याचा दौरा तुम्ही का काढला. त्याचप्रमाणे तुम्ही महाराष्ट्रातील जे काही उद्योग गुजरातला नेला आहात, ते पुन्हा महाराष्ट्राला द्या, अशी मागणीही संजय राऊत यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करणार विविध कार्यक्रमांचा शुभारंभ

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज पी एम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा साजरा होत आहे. यावेळी ते राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा कार्यक्रमात सहभागी होतील. यानतंर मोदी हे पीएम विश्वकर्मांच्या लाभार्थ्यांना किट वाटप करतील. या कार्यक्रमाला १५ हजार विश्वकर्मा, ५ हजार IT प्रशिक्षणार्थी, २० हजार महिला बचत गटाच्या महिला सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अमरावतीतील पीएम मित्र टेक्सटाईल पार्क आणि अॅरेल पार्कची पायाभरणी करणार आहेत. त्यासोबतच या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान यांच्या नावे एक टपाल तिकीट जारी केले जाणार आहे. तसेच महाराष्ट्र सरकारच्या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजनेचा शुभारंभही यावेळी केला जाणार आहे.

Follow Us
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही घेऊ शकतो- जरांगे
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही... भर मंचावरून मनोज जरांगे कडाडले; आता...
Big Breaking| बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर
Big Breaking | बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर; नेमकं काय घडलं? पहा व्हिडीओ
मी नितीन गडकरी यांना फोन केला अन् म्हणालो... तिसऱ्या मुंबईवरून राज ठाक
मी नितीन गडकरी यांना फोन केला अन् म्हणालो... तिसऱ्या मुंबईवरून राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
NCP शरद पवार गटातील 8 खासदारांची मोदींसोबत बैठक; रोहित पवार म्हणाले...
NCP शरद पवार गटातील 8 खासदारांची मोदींसोबत बैठक; रोहित पवार म्हणाले, 17 तारखेला...
ठाण्याच्या टिकोजीरावांना निवडणूक आयोगाने परस्परच... संजय राऊतांची टीका
ठाण्याच्या टिकोजीरावांना निवडणूक आयोगाने परस्परच... बोलता बोलता संजय राऊत असं काही म्हणाले की.. विधानाची तुफान चर्चा
समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन, सत्यजित तांबे आणि पोलिसात झटापट,
समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन, सत्यजित तांबे आणि पोलिसात झटापट, आंदोलक आक्रमक
आदित्य ठाकरे आणि CJP पदाधिकाऱ्यांच्या भेटीत नेमकं काय घडलं? Inside...
आदित्य ठाकरे आणि CJP पदाधिकाऱ्यांच्या भेटीत नेमकं काय घडलं? अखेर Inside स्टोरी समोर
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्..
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्...हादरवून टाकणारं प्रकरण समोर!
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, 'माझं...
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, “माझं रक्तच तसं नाही जे कोणी...
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; 1.1 कोटींची गुंतवणूक
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; सिंगापूर करणार 1.1 कोटींची गुंतवणूक अन्...