AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी, श्रीकांत शिंदे यांच्याकडून पाठराखण, विरोधकांना सडेतोड प्रत्युत्तर

उद्धव ठाकरेंवर टीका, शिंदे सरकारचं कौतुक, श्रीकांत शिंदे नेमकं काय म्हणाले?

अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी, श्रीकांत शिंदे यांच्याकडून पाठराखण, विरोधकांना सडेतोड प्रत्युत्तर
| Updated on: Dec 26, 2022 | 4:58 PM
Share

मुंबई : कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. त्यावर श्रीकांत शिंदे यांनी भाष्य केलंय. विरोधकांकडे काही प्रश्नच उरले नाहीत. सरकार आल्यापासून लोकहिताचे अनेक निर्णय घेतले जातायत. बाळासाहेबांच्या शिवसेनेत येण्याचा लोकांचा ओढा वाढत चाललाय. त्यामुळे विरोधकांकडे प्रश्नच उरलेले नसल्यानं काहीतरी मुद्दे काढले जात आहेत. अभ्यास करायचा नाही, फक्त बेछूट आरोप करत सुटायचे इतकचं सध्या त्यांचं काम आहे. आरोप करण्यापलीकडे विरोधकांकडे काहीच काम नाहीये, असं श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) म्हणालेत.

उद्धव ठाकरेंवर निशाणा

आज अधिवेशनात बोलणारे उद्धव ठाकरे मागच्या अडीच-तीन वर्षात पहिल्यांदाच नागपूरला आले असतील. याआधी त्यांना त्याची गरज वाटली नाही. पण आता ते येत आहेत. हा बदल आधीच केला असता तर ही वेळच आली नसती, असं श्रीकांत शिंदे म्हणालेत.

सीमावादावरही श्रीकांत शिंदे यांनी आपलं मत मांडलं. सीमाप्रश्नाबाबत सरकार गंभीर आहे. लवकरच याबाबत ठोस पावलं उचलली जातील, असं श्रीकांत शिंदे म्हणालेत.

संजय राऊत यांच्यासोबत लोक होते. तेव्हा चांगले होते आणि आता सोडून गेल्यानंतर त्रुटी दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे योग्य नाही. तुमचं नेतृत्व त्यांना मान्य नाही. तुम्ही रोज मनोरंजन नाही तर लोकांची सकाळ खराब करत आहात. तुमची सकाळ खराब आहे, पण लोकांची पण सकाळ खराब करत आहात. लोकांना हे चालणारं नाही, लोकांना विकास हवा आहे. तो विकास आमचं सरकार करतंय, त्यामुळे जनतेचा आम्हाला पाठिंबा आहे, असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलंय.

Follow Us
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...