AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aaditya Thackeray :… तर आदित्य ठाकरेंची शिवसेनेतून हकालपट्टी होणार? होय, पण एकाच शक्यतेवर सर्व काही ठरणार

बंडखोर गटाकडून आम्हीच शिवसेना असं ठासून सांगितलं जातंय. त्यामुळे मुळ शिवसेनेला धोका निर्माण झाल्याचं मत जाणकार सांगतात. यामुळे काही शक्यता निर्माण झाल्या असून यामुळे ठाकरेंवर देखील याचा प्रभाव पडू शकतो, असं मत एका मोठ्या वेबसाईटला प्रतिक्रिया देताना काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्यानं व्यक्त केलंय.

Aaditya Thackeray :... तर आदित्य ठाकरेंची शिवसेनेतून हकालपट्टी होणार? होय, पण एकाच शक्यतेवर सर्व काही ठरणार
आदित्य ठाकरेImage Credit source: tv9
| Edited By: Shubham Kulkarni | Updated on: Jun 30, 2022 | 12:57 PM
Share

मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या अस्थिर परिस्थिती असून अवघ्या महाराष्ट्रानं पुन्हा एकदा सत्तासंघर्ष पाहिलाय. आधी देवेंद्र फडणवीस -अजित पवारांचा (Devendra Fadnavis-Ajit Pawar) पहाटेचा शपथविधी, त्यानंतर सकाळीच शिळ्या झालेल्या बातम्या आणि आता शिवसेनेतील बंडखोरीमुळे पडलेलं महाविकास आघाडी सरकार. या सत्तांतराच्या घडामोडींमध्ये सर्वाधिक नुकसान हे शिवसेनेला झाल्याचं जाणकार सांगतात. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटामुळे शिवसेनेत पडलेली फूट आणि त्यामुळे गेलेली सत्ता उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) चांगलीच जिव्हारी लागली आहे. तरीही त्यांच्या स्वभावातला संयम आणि सगळं काही गमावलेलं असताना काल फेसबूक लाईव्हमधून दिसून आलेली इच्छाशक्ती खूप काही सांगून जाते. हा झाला एक भाग.

आता एकनाथ शिंदे गटाचं बोलायचं झाल्यास. त्यांनी केलेला बंड इथेच थांबत नाही. बंडखोर गटाकडून आम्हीच शिवसेना असं ठासून सांगितलं जातंय. त्यामुळे मुळ शिवसेनेला धोका निर्माण झाल्याचं मत जाणकार सांगतात. यामुळे काही शक्यता निर्माण झाल्या असून यामुळे ठाकरेंवर देखील याचा प्रभाव पडू शकतो, असं मत एका मोठ्या वेबसाईटला प्रतिक्रिया देताना काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्यानं व्यक्त केलंय. नवं सरकार आणि एकनाथ शिंदे गट भविष्यात नेमकं काय करू शकतो, याच्या काही शक्यता तज्ज्ञ, जाणकार आणि राजकीय पक्षांचे नेते मांडताना दिसतायत. कोणत्या शक्यता आहे पाहुया…

  1. नवं सरकार आल्यास काय होईल? – 1 जुलैला देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदे सरकारचा शपथविधी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. नवं सरकार आल्यास शिवसेनेचे अनेक निर्णय बदलू शकतात. यामुळे शिंदे गट अधिक सक्रिय होईल. यामुळे मुळ शिवसेनेला नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
  2. पहिले काम-सभापतींची नियुक्ती?- देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदे सरकारचा शपथविधी झाल्यानंतर ते पहिलं काम विधानसभेच्या सभापतींची निवड हे करतील. यामुळे अनेक गोष्टींवर तातडीनं निर्णय घेता येईल. नव्या सभापतींची निवड करणं हे देवेंद्र फडणवीस-शिंदे सरकारचा प्राधान्यक्रम असेल.
  3. शिंदे गटाला खरी शिवसेना मानलं जाईल?- नव्या सभापतींची निवड झाल्यानंतर एकनाथ शिंदे गटाला खरी शिवसेना मानलं जाईल, असं जाणकार सांगतात. यासाठी शिंदे गटाकडून नवे सभापती निर्णय देऊ शकतात. यामुळे मुळ शिवसेनेला धक्का बसेल. तशी मान्यता मिळाल्यास मुळ शिवसेनेचं मोठं नुकसान होऊ शकतं
  4. शिंदे गटाची विलीन होण्याची अडचण दूर होईल?– नव्या सभापतींना एकनाथ शिंदे गटाला खऱ्या शिवसेनेची मान्यता दिल्यास छोट्या पक्षात विलीन होण्याची गरज नाही, असं काँग्रेसच्या एका नेत्यानं एका वेबसाईटला सांगतिलं. यामुळे मुळ शिवेसेनेला धक्का बसेल असंही ते म्हणालेत.
  5. शिवसेना पुन्हा कोर्टात जाईल?- नव्या सभापतींनी एकनाथ शिंदे गटाला खरी  शिवसेना असल्याचं मानल्यास मुळ शिवसेना कोर्टात जाईल. यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेतील वाद उफाळून येऊ शकतो, असंही काँग्रेसच्या त्या ज्येष्ठ नेत्यानं सांगितलंय.
  6. …तर आदित्य ठाकरेंनाही शिवसेनेतून काढतील- शिंदे गट नव्या सरकारच्या काळात शिवसेना म्हणून ओळखला गेला तर ते आदित्य ठाकरेंनाही पक्षातून काढायला मागेपुढे पाहणार नाही, असं मतही काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्यानं मांडलंय. त्यामुळे पुन्हा एकदा खरी शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष उफाळून येऊ शकतो.

Follow Us
MNS शहराध्यक्षांच्या गाडीची तोडफोड: मनसेचा भाजपवर आरोप
अंबरनाथमधील भाजप-मनसे राड्यावरुन मनसे नेते आक्रमक, गाडी तोडफोड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न
Sharad Pawar | चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न; शरद पवार यांचा दावा
आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य...
Rahul Narwekar | आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य; सुप्रीम कोर्टात निर्णय....
फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची पुन्हा भारताला धमकी
‘सिंधूचं पाणी आमची रेड लाईन’; पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'-दिपके
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'- अभिजीत दिपके
जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन
Chandrashekhar Bawankule | जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन; चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली घोषणा, म्हणाले...
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीक नको’
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; प्रसाद लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीका नको’
मनिषा कायंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल : "शिंदेंच्या जीवावर खासदार
मनिषा कायंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल :
राजकीय उद्योग सोडून उद्योजकांकडे लक्ष द्यावे: सामंतांवर हल्लाबोल
राजकीय उद्योग सोडून उद्योजकांकडे लक्ष द्यावे: रोहित पवारांचा उद्योगमंत्री सामंतांवर हल्लाबोल