AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

6 खात्यांचा पदभार असलेले राज्यमंत्री जेव्हा अभियानाचे नावच विसरतात, दत्तामामा एवढा विसरभोळेपणा बरा नव्हे!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जवळचे व विश्वासू असलेले राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे काल (शनिनार) भर सभेत अभियानाचे नावच विसरले. तर दुसऱ्या कार्यक्रमात आजची तारीख विसरले व हा सर्व प्रकार भर सभेत व खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर झाला.

6 खात्यांचा पदभार असलेले राज्यमंत्री जेव्हा अभियानाचे नावच विसरतात, दत्तामामा एवढा विसरभोळेपणा बरा नव्हे!
दत्ता भरणे
| Edited By: Akshay Adhav | Updated on: Aug 22, 2021 | 9:56 AM
Share

इंदापूर (पुणे) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जवळचे व विश्वासू असलेले राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Datta Bharane) हे काल (शनिनार) भर सभेत अभियानाचे नावच विसरले. तर दुसऱ्या कार्यक्रमात आजची तारीख विसरले व हा सर्व प्रकार भर सभेत व खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर झाला.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या कामाबद्दल नेहमीच काळजी घेत असतात, मात्र त्यांचे सहकारी असा विसरभोळेपणा करीत असतील तर ही नक्कीच आश्चर्याची बाब आहे. भरणे यांनी यापूर्वीदेखील भरसभेत सोलापूरमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले, त्यावरुनही ते चर्चेत राहिले. शेवटी त्यांना दिलगिरी व्यक्त करावी लागली.

मंत्रीच अभियानाचे नाव विसरले

महाराष्ट्र शासनाच्या ‘महाराजस्व अभियान’ हे सर्वसामान्यांची संबंधित आहे. इतक्या गंभीर विषयावर भरणे यांना या योजनेच्या नावाचा विसर पडला. महाराजस्व अभियान- संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम होता. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होता. मात्र या कार्यक्रमाच्या अभियानाचे नावच राज्यमंत्री दत्तात्रय भरणे विसरले.

दत्तामामांनी भाषणात इतरांना या अभियानाचे नाव विचारले. त्यावर तात्काळ स्टेजवरील महसूल अधिकाऱ्यांनी या अभियानाचे नाव सांगितले. मात्र शेवटपर्यंत राज्यमंत्री भरणे यांना हे नाव घेता आले नाही.

दत्तामामा एवढा विसरभोळेपणा बरं नव्हे!

तर दुसऱ्या एका कार्यक्रमात ते चक्क आजची तारीख विसरले व त्यांनी स्टेज समोरील पुढच्या लोकांनाच आजची तारीख किती असा प्रश्न केला.. यापूर्वी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे सरळ व अत्यंत साधेपणा असलेले राज्यमंत्री म्हणून परिचित होते. मात्र अशा विसरभोळेपणामुळे राज्याला त्यांची नवीन ओळख कळालेली आहे कि काय असा प्रश्न निर्माण होत आहे.

भरणे यांच्याकडे सहा अत्यंत महत्त्वाची खाती आहेत, यामध्ये बरीच खाती ही महत्वाची आहेत, त्यामुळे भरणे यांना हा विसरभोळेपणा प्रशासनाच्या दृष्टीने न परवडणारा आहे, अशा प्रतिक्रिया इंदापुरात उमटलेल्या पाहायला मिळाल्या.

(State Minister Datta Bharane forgot the name of the Government campaign )

हे ही वाचा :

दत्तात्रय भरणेंना सोलापुरात फिरू देणार नाही; शिवसेना नेत्यांचा इशारा

लय भारी! दत्ता भरणे चहा प्यायला रस्त्यावर थांबतात तेव्हा…..

Follow Us
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार