Deepak Kesarkar : राजकारण थांबवा प्रगती करु द्या, केसरकरांची पुन्हा शिवसेनेला विनंती

शिवसेनेतील आमदारांची भूमिका आणि राज्यात झालेले सत्तांतर यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे संघटनाच्या दृष्टीने बाहेर पडले आहेत. तर दुसरीकडे आदित्य ठाकरे हे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते. अशीच भुमिका यापूर्वीच घेतली असती तर ही वेळ आली नसते असेही शिंदे गटाच्या आमदारांकडून सुनावले जात आहेत तर सत्तेमध्ये असताना ठाकरे हे जनतेला किती वेळा भेटले असा सवालही केसरकर यांनी उपस्थित केला आहे.

Deepak Kesarkar : राजकारण थांबवा प्रगती करु द्या, केसरकरांची पुन्हा शिवसेनेला विनंती
शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकरImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 25, 2022 | 3:57 PM

मुंबई : आता (State Government) सरकारची स्थापना होऊन 27 दिवस उलटले आहेत. असे असताना रोज उठले की सरकारवर आणि केंद्रावर आरोप करणे हे चुकीचे आहे. यामुळे साध्य काही होणार नाही पण मतभेद वाढून विकास कामांना मात्र खीळ बसते. त्यामुळे आरोप-प्रत्यारोप न करता आता विकास कामांवर लक्ष करु द्या असे म्हणत शिंदे गटाचे प्रवक्ते (Deepak Kesarkar) दीपक केसरकर यांनी (Sanjay Raut) खा. संजय राऊतांवर पुन्हा टीका केली आहे. तुमच्या राजकारणामुळे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न प्रलंबित राहत आहेत. पक्षातील गळती कशी रोखायची हा तुमचा प्रश्न आहे. टीका-टिपण्णी करण्यापेक्षा विकासाचा मुद्दा घेऊन तो मार्गी लावा असा सल्लाही त्यांनी खा. राऊतांना दिला आहे. शिवाय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना त्यांनी तीन प्रश्नही विचारले आहेत.

केसरकरांचे पक्षप्रमुखांना तीन प्रश्न

पत्रकार परिषदेदरम्यान दीपक केसरकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना तीन प्रश्न विचारले आहेत. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवणार असे आश्वासन दिले होते का ? दुसरा प्रश्न, एकनाथ शिंदे यांनी मला मुख्यमंत्रीपद नको हे पद तुमच्याकडेच राहू द्या..फक्त राष्ट्रवादी-कॉंग्रेसबरोबर युती करु नका असे म्हणाले होते का? आणि तिसरा प्रश्न केसरकरांनी उपस्थित केला आहे की, राहुल शेवाळे असे म्हणाले होते की, पक्षप्रमुख आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये युती संदर्भात चर्चा होती. पण उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या 12 आमदारांचे निलंबन केले आणि तेव्हापासूनच चर्चा ही फिस्कटली असे तीन प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. मात्र, यापैकी प्रश्नाचे उत्तर न आल्याने हे सर्व खरे होते की काय अशी शंका आता निर्माण होत असल्याचे केसरकर म्हणाले आहेत.

ठाकरे जनतेला किती वेळा भेटले?

शिवसेनेतील आमदारांची भूमिका आणि राज्यात झालेले सत्तांतर यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे संघटनाच्या दृष्टीने बाहेर पडले आहेत. तर दुसरीकडे आदित्य ठाकरे हे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते. अशीच भुमिका यापूर्वीच घेतली असती तर ही वेळ आली नसते असेही शिंदे गटाच्या आमदारांकडून सुनावले जात आहेत तर सत्तेमध्ये असताना ठाकरे हे जनतेला किती वेळा भेटले असा सवालही केसरकर यांनी उपस्थित केला आहे. मात्र, आता सरकारची स्थापना झाली असून आरोप-प्रत्यारोप न करता शिंदे गटाला काम करु द्यावे असाच मुद्दा त्यांच्या पत्रकार परिषदेतील होता.

हे सुद्धा वाचा

संजय राऊतांवरही टीका

रोज सकाळी उठून केंद्रावर आणि राज्यातील महत्वाच्या नेत्यांवर टीका केली जात आहे. ही महाराष्ट्राच्या राजकारणाची परंपरा नाही. केंद्र आणि राज्याचे संबंध चांगले राहिले तरच विकासकामे होणार आहेत. मात्र, आपल्याच पक्षातील नेत्यांवर खालच्या स्तराला जाऊन टीका करायची हे राज्यासाठी योग्य नसल्याचे म्हणत केसरकरांनी राऊतांवर हल्लाबोल केला. तर केवळ त्यांच्या बोलण्यामुळे हे अंतर वाढत गेल्याचेही ते म्हणाले आहेत.

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....