Raju Shetty : राजकीय पक्षांनी जनतेचा विश्वास गमावला, स्वाभिमानीचा ‘एकला चलो रे चा नारा’..! आगामी निवडणुकांमध्ये नेमका बदल काय?

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील पदाधिकाऱ्यांची बैठक कराड येथे पार पडली आहे. सध्याच्या राजकीय परस्थितीवर संघटनेतील पदाधिकारी व राजू शेट्टी यांच्यामध्ये चर्चा झाल्यानंतर आता राज्यातील सर्व निवडणुका ह्या स्वतंत्रच लढायच्या. कोणत्याही राजकीय पक्षाला जवळ घेऊन निवडणुक लढायची नाही. राज्यातील सर्वच पक्षांनी जनतेचा विश्वास गमावला आहे. त्यामुळे एक नवा पर्याय म्हणून जनतेसमोर जाणे गरजेचे असल्याचे मत पदाधिकारी यांनी व्यक्त केले आहे.

Raju Shetty : राजकीय पक्षांनी जनतेचा विश्वास गमावला, स्वाभिमानीचा 'एकला चलो रे चा नारा'..! आगामी निवडणुकांमध्ये नेमका बदल काय?
Follow us
| Updated on: Jul 31, 2022 | 4:20 PM

कराड : राज्यातील (Political affairs) राजकीय घडामोडीनंतर आता संघटनाही आपल्या विस्तारावर भर देणार आहेत. गेल्या महिन्याभरापासून राज्यातील घडामोडीनंतर सर्वसामान्य जनतेचा राजकीय पक्षावरील विश्वास उडाला आहे. पक्षाने वेळोवेळी बदलेली भूमिका यामुळे भ्रमनिराश झाला आहे. त्यामुळे कुण्या पक्षाबरोबर जाण्यापेक्षा आगामी काळात (Swabhimani Shetkari Sanghtna) स्वाभिमानी शेतकरी संघटना ही स्वतंत्रपणे लढणार आहे. राज्यात आगामी काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांपासूनच या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे स्वाभिमानीचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांनी सांगितले आहे. त्यामुळे स्वत:चे अस्तित्व वाढणार असून शेतकऱ्यांसह सर्वांचेच प्रश्न मार्गी लावण्याची संधी संघटनेतील पदाधिकाऱ्यांना मिळणार असल्याचे (Raju Shetty) राजू शेट्टी यांनी सांगितले आहे.

कार्यकरणी बैठकीत निर्णय

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील पदाधिकाऱ्यांची बैठक कराड येथे पार पडली आहे. सध्याच्या राजकीय परस्थितीवर संघटनेतील पदाधिकारी व राजू शेट्टी यांच्यामध्ये चर्चा झाल्यानंतर आता राज्यातील सर्व निवडणुका ह्या स्वतंत्रच लढायच्या. कोणत्याही राजकीय पक्षाला जवळ घेऊन निवडणुक लढायची नाही. राज्यातील सर्वच पक्षांनी जनतेचा विश्वास गमावला आहे. त्यामुळे एक नवा पर्याय म्हणून जनतेसमोर जाणे गरजेचे असल्याचे मत पदाधिकारी यांनी व्यक्त केले आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांचे प्रश्न हे संघटनेने हातळल्याने स्थानिक पातळीवर संघटन तर आहेच पण त्याचा उपयोग करुन घेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

गटाची मदत मात्र पक्षापासून दूर

आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना हे उमेदवार देणार उभा करणार आहे. मात्र, हे करीत असताना कोणत्याही राजकीय पक्षाची मदत घेतली जाणार नाही. वेळप्रसंगी स्थानिक पातळीवरील गट हे संघटनेत सहभागी करुन घेतले जातील पण पक्षांना मात्र दूर ठेवले जाणार आहे. जनतेमध्ये राजकीय पक्षांना घेऊन चीड निर्माण झाली आहेत. त्याचाच फायदा घेण्याचा प्रयत्न हा स्वाभिमानीचा राहणार आहे.

जनतेच्या प्रश्नांची जाणीव

स्वाभिमानी शेतकरी संघटना ही शेतकऱ्यांच्या हितासाठी राबलेली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेच्या प्रश्नाची जाण या संघटनेतील प्रत्येकाला आहे. आता निवडणुकांमध्ये स्थानिक समस्या हाच मुद्दा राहणार आहे. शिवाय जे राजकीय पक्ष आहेत त्यांनी जनतेचा भ्रमनिराश केला आहे. मतदार आणि राजकीय पक्ष यांच्यातील अंतर वाढले असून त्याचा फायदा स्वाभिमानी संघटनेला त्याचा फायदा होईल असा विश्वास राजू शेट्टी यांनी व्यक्त केला आहे.

Non Stop LIVE Update
अजितदादांना मोठा धक्का, निलेश लंकेंचा आमदारकीचा राजीनामा
अजितदादांना मोठा धक्का, निलेश लंकेंचा आमदारकीचा राजीनामा.
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.