AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raju Shetty : राजकीय पक्षांनी जनतेचा विश्वास गमावला, स्वाभिमानीचा ‘एकला चलो रे चा नारा’..! आगामी निवडणुकांमध्ये नेमका बदल काय?

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील पदाधिकाऱ्यांची बैठक कराड येथे पार पडली आहे. सध्याच्या राजकीय परस्थितीवर संघटनेतील पदाधिकारी व राजू शेट्टी यांच्यामध्ये चर्चा झाल्यानंतर आता राज्यातील सर्व निवडणुका ह्या स्वतंत्रच लढायच्या. कोणत्याही राजकीय पक्षाला जवळ घेऊन निवडणुक लढायची नाही. राज्यातील सर्वच पक्षांनी जनतेचा विश्वास गमावला आहे. त्यामुळे एक नवा पर्याय म्हणून जनतेसमोर जाणे गरजेचे असल्याचे मत पदाधिकारी यांनी व्यक्त केले आहे.

Raju Shetty : राजकीय पक्षांनी जनतेचा विश्वास गमावला, स्वाभिमानीचा 'एकला चलो रे चा नारा'..! आगामी निवडणुकांमध्ये नेमका बदल काय?
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Jul 31, 2022 | 4:20 PM
Share

कराड : राज्यातील (Political affairs) राजकीय घडामोडीनंतर आता संघटनाही आपल्या विस्तारावर भर देणार आहेत. गेल्या महिन्याभरापासून राज्यातील घडामोडीनंतर सर्वसामान्य जनतेचा राजकीय पक्षावरील विश्वास उडाला आहे. पक्षाने वेळोवेळी बदलेली भूमिका यामुळे भ्रमनिराश झाला आहे. त्यामुळे कुण्या पक्षाबरोबर जाण्यापेक्षा आगामी काळात (Swabhimani Shetkari Sanghtna) स्वाभिमानी शेतकरी संघटना ही स्वतंत्रपणे लढणार आहे. राज्यात आगामी काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांपासूनच या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे स्वाभिमानीचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांनी सांगितले आहे. त्यामुळे स्वत:चे अस्तित्व वाढणार असून शेतकऱ्यांसह सर्वांचेच प्रश्न मार्गी लावण्याची संधी संघटनेतील पदाधिकाऱ्यांना मिळणार असल्याचे (Raju Shetty) राजू शेट्टी यांनी सांगितले आहे.

कार्यकरणी बैठकीत निर्णय

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील पदाधिकाऱ्यांची बैठक कराड येथे पार पडली आहे. सध्याच्या राजकीय परस्थितीवर संघटनेतील पदाधिकारी व राजू शेट्टी यांच्यामध्ये चर्चा झाल्यानंतर आता राज्यातील सर्व निवडणुका ह्या स्वतंत्रच लढायच्या. कोणत्याही राजकीय पक्षाला जवळ घेऊन निवडणुक लढायची नाही. राज्यातील सर्वच पक्षांनी जनतेचा विश्वास गमावला आहे. त्यामुळे एक नवा पर्याय म्हणून जनतेसमोर जाणे गरजेचे असल्याचे मत पदाधिकारी यांनी व्यक्त केले आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांचे प्रश्न हे संघटनेने हातळल्याने स्थानिक पातळीवर संघटन तर आहेच पण त्याचा उपयोग करुन घेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

गटाची मदत मात्र पक्षापासून दूर

आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना हे उमेदवार देणार उभा करणार आहे. मात्र, हे करीत असताना कोणत्याही राजकीय पक्षाची मदत घेतली जाणार नाही. वेळप्रसंगी स्थानिक पातळीवरील गट हे संघटनेत सहभागी करुन घेतले जातील पण पक्षांना मात्र दूर ठेवले जाणार आहे. जनतेमध्ये राजकीय पक्षांना घेऊन चीड निर्माण झाली आहेत. त्याचाच फायदा घेण्याचा प्रयत्न हा स्वाभिमानीचा राहणार आहे.

जनतेच्या प्रश्नांची जाणीव

स्वाभिमानी शेतकरी संघटना ही शेतकऱ्यांच्या हितासाठी राबलेली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेच्या प्रश्नाची जाण या संघटनेतील प्रत्येकाला आहे. आता निवडणुकांमध्ये स्थानिक समस्या हाच मुद्दा राहणार आहे. शिवाय जे राजकीय पक्ष आहेत त्यांनी जनतेचा भ्रमनिराश केला आहे. मतदार आणि राजकीय पक्ष यांच्यातील अंतर वाढले असून त्याचा फायदा स्वाभिमानी संघटनेला त्याचा फायदा होईल असा विश्वास राजू शेट्टी यांनी व्यक्त केला आहे.

Follow Us
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्रा
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्राल...
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यान
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यानं सांगितलं मोठं गुपित
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआ
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआधीच...मोठी अपडेट समोर!
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा!
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा! 1 एप्रिल 2021 पासून...
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं विधान वादाच्या भोवऱ्यात, काय निर्णय घेणार?
संजय पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार
Shivsena | संजय दिना पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार दाखल
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या कॅफेतील CCTVतून हादरवणार खुलासे
बदलापूरमध्ये पत्नीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघड; हार्ट अटॅकचा बनाव
मोठी बातमी! बदलापूरमध्ये पत्नीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघड; हार्ट अटॅकचा बनाव फसला, पती आणि सासू अटकेत
सत्ता डोक्यात गेलीय! संजय पाटलांवर सुषमा अंधारेंचा घणाघात
Sushma Andhare | सत्ता डोक्यात गेलीय! संजय दिना पाटलांवर सुषमा अंधारेंचा घणाघात; फडणवीसांनाही केला थेट सवाल
दोन शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलात हाहाकार; मृतांचा आकडा 10
Venezuela | दोन शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलात हाहाकार; मृतांचा आकडा 10 हजारांच्या पार जाण्याची भीती!