AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raju Shetty : राजकीय पक्षांनी जनतेचा विश्वास गमावला, स्वाभिमानीचा ‘एकला चलो रे चा नारा’..! आगामी निवडणुकांमध्ये नेमका बदल काय?

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील पदाधिकाऱ्यांची बैठक कराड येथे पार पडली आहे. सध्याच्या राजकीय परस्थितीवर संघटनेतील पदाधिकारी व राजू शेट्टी यांच्यामध्ये चर्चा झाल्यानंतर आता राज्यातील सर्व निवडणुका ह्या स्वतंत्रच लढायच्या. कोणत्याही राजकीय पक्षाला जवळ घेऊन निवडणुक लढायची नाही. राज्यातील सर्वच पक्षांनी जनतेचा विश्वास गमावला आहे. त्यामुळे एक नवा पर्याय म्हणून जनतेसमोर जाणे गरजेचे असल्याचे मत पदाधिकारी यांनी व्यक्त केले आहे.

Raju Shetty : राजकीय पक्षांनी जनतेचा विश्वास गमावला, स्वाभिमानीचा 'एकला चलो रे चा नारा'..! आगामी निवडणुकांमध्ये नेमका बदल काय?
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Jul 31, 2022 | 4:20 PM
Share

कराड : राज्यातील (Political affairs) राजकीय घडामोडीनंतर आता संघटनाही आपल्या विस्तारावर भर देणार आहेत. गेल्या महिन्याभरापासून राज्यातील घडामोडीनंतर सर्वसामान्य जनतेचा राजकीय पक्षावरील विश्वास उडाला आहे. पक्षाने वेळोवेळी बदलेली भूमिका यामुळे भ्रमनिराश झाला आहे. त्यामुळे कुण्या पक्षाबरोबर जाण्यापेक्षा आगामी काळात (Swabhimani Shetkari Sanghtna) स्वाभिमानी शेतकरी संघटना ही स्वतंत्रपणे लढणार आहे. राज्यात आगामी काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांपासूनच या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे स्वाभिमानीचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांनी सांगितले आहे. त्यामुळे स्वत:चे अस्तित्व वाढणार असून शेतकऱ्यांसह सर्वांचेच प्रश्न मार्गी लावण्याची संधी संघटनेतील पदाधिकाऱ्यांना मिळणार असल्याचे (Raju Shetty) राजू शेट्टी यांनी सांगितले आहे.

कार्यकरणी बैठकीत निर्णय

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील पदाधिकाऱ्यांची बैठक कराड येथे पार पडली आहे. सध्याच्या राजकीय परस्थितीवर संघटनेतील पदाधिकारी व राजू शेट्टी यांच्यामध्ये चर्चा झाल्यानंतर आता राज्यातील सर्व निवडणुका ह्या स्वतंत्रच लढायच्या. कोणत्याही राजकीय पक्षाला जवळ घेऊन निवडणुक लढायची नाही. राज्यातील सर्वच पक्षांनी जनतेचा विश्वास गमावला आहे. त्यामुळे एक नवा पर्याय म्हणून जनतेसमोर जाणे गरजेचे असल्याचे मत पदाधिकारी यांनी व्यक्त केले आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांचे प्रश्न हे संघटनेने हातळल्याने स्थानिक पातळीवर संघटन तर आहेच पण त्याचा उपयोग करुन घेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

गटाची मदत मात्र पक्षापासून दूर

आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना हे उमेदवार देणार उभा करणार आहे. मात्र, हे करीत असताना कोणत्याही राजकीय पक्षाची मदत घेतली जाणार नाही. वेळप्रसंगी स्थानिक पातळीवरील गट हे संघटनेत सहभागी करुन घेतले जातील पण पक्षांना मात्र दूर ठेवले जाणार आहे. जनतेमध्ये राजकीय पक्षांना घेऊन चीड निर्माण झाली आहेत. त्याचाच फायदा घेण्याचा प्रयत्न हा स्वाभिमानीचा राहणार आहे.

जनतेच्या प्रश्नांची जाणीव

स्वाभिमानी शेतकरी संघटना ही शेतकऱ्यांच्या हितासाठी राबलेली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेच्या प्रश्नाची जाण या संघटनेतील प्रत्येकाला आहे. आता निवडणुकांमध्ये स्थानिक समस्या हाच मुद्दा राहणार आहे. शिवाय जे राजकीय पक्ष आहेत त्यांनी जनतेचा भ्रमनिराश केला आहे. मतदार आणि राजकीय पक्ष यांच्यातील अंतर वाढले असून त्याचा फायदा स्वाभिमानी संघटनेला त्याचा फायदा होईल असा विश्वास राजू शेट्टी यांनी व्यक्त केला आहे.

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?