AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात कुठे कुठे मतदानावर बहिष्कार?

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिक आपल्या प्रश्नांवर आक्रमक होताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी नागरी प्रश्न प्रलंबित असल्याने मतदारांनी थेट निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला, तर काही ठिकाणी राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली. लातूर जिल्ह्यातील सुनेगाव येथेही असाच प्रकार पाहायला मिळाला. या ठिकाणी नागरिकांनी मतदानावर पूर्ण बहिष्कार  टाकला आहे. या गावात मतदानाच्या दिवशी दुपारपर्यंत एकाही […]

राज्यात कुठे कुठे मतदानावर बहिष्कार?
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: | Updated on: Jan 15, 2021 | 8:06 PM
Share

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिक आपल्या प्रश्नांवर आक्रमक होताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी नागरी प्रश्न प्रलंबित असल्याने मतदारांनी थेट निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला, तर काही ठिकाणी राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली.

लातूर

जिल्ह्यातील सुनेगाव येथेही असाच प्रकार पाहायला मिळाला. या ठिकाणी नागरिकांनी मतदानावर पूर्ण बहिष्कार  टाकला आहे. या गावात मतदानाच्या दिवशी दुपारपर्यंत एकाही नागरिकाने मतदान केले नाही. गावाला रस्ता नाही, बस येत नाही. त्यामुळे नागरिकांना अत्यंत हाल अपेष्टांचे जीवन जगावे लागत आहे. त्यामुळे सुनेगाव शेन्द्रीच्या गावकऱ्यांनी बहिष्काराचे हत्यार उपसले. सुनेगाव येथे तहसीलदार आणि उपजिल्हाधिकाऱ्यांनी 2-3 वेळा गावात भेट दिली. तसेच स्थानिकांचे मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, याचा उपयोग झाला नाही. साधारण 1200 लोकसंख्येच्या या गावात एकूण 558 मतदार आहेत. मात्र नागरी प्रश्न जैसे थे असल्याने त्यांनी मतदानावरच बहिष्कार टाकला.

सोलापूर

अक्कलकोट तालुक्यातही 10 गावांमध्ये कोणीही मतदान केले नाही. आळगी, गुड्डेवाडी, अंकलगीसह 10 गावांनी पाण्याच्या प्रश्नासाठी मतदानावर बहिष्कार टाकला. येथील गावकऱ्यांनी उजनी धरणातून हिळी बंधाऱ्यात पाणी सोडण्याची मागणी केली आहे.

बीड

बीडमधील 2 गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला. बीड तालुक्याच्या कुंभारी गावातील नागरिकांनी गाव पुनर्वसन आणि तळ्यात गेलेल्या जमिनीचा मोबदला न दिल्याने मतदानास नकार दिला. बीड तालुक्यातील सौंदाना गावाने स्वातंत्र्यापासून रस्ता न झाल्याच्या रागातून मतदानावर बहिष्कार टाकला.

उस्मानाबाद

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात तर थेट अपक्ष उमेदवार शंकर गायकवाड यांनीच मतदानावर बहिष्कार टाकला. गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याने, गावकऱ्यांना पाठिंबा देत असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील काही भाग सोलापूर जिल्ह्यात मोडतो. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील वाणेवाडी येथील ग्रामस्थांनी मुलभूत सुविधा मिळत नसल्याने मतदानावर बहिष्कार टाकला.

जालना

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या जालना लोकसभा मतदारसंघातही 51 गावे पाणी प्रश्नावर आक्रमक झाली. औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील 11 गावांनी थेट मतदानावर बहिष्कार टाकला, तर इतर 40 गावांनी राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी केली. जालना जिल्ह्यातील बापकळ गावातील सर्वच मतदारांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला. हे गाव जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदार क्षेत्रात येते. 1250 लोकसंख्या असलेले या गावात 747 मतदार आहेत. बापकळ या गावाचा परभणी लोकसभा मतदार संघात समावेश होतो. आज सकाळपासून या गावातील एकाही गावकऱ्याने मतदान केलं नाही. गावाजवळील हातवन पाणी प्रकल्प रखडल्याने या गावातील गावकऱ्यांनी मतदानावर सामूहिक बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. पाणी प्रकल्प रखडल्याने गावात पाणीटंचाई असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे.

मुंबई 

महाराष्ट्रातील पारंपारिक मच्छीमारांचा पर्शियन नेट मासेमारीला, एल.ई.डी लाईटद्वारे होत असलेल्या मासेमारीला तीव्र विरोध आहे. यावर बंदी घालण्याच्या मागणीसाठी कोकणातील मासेमारी करणाऱ्या समुदायानेही मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला.

नवी मुंबई

गेल्या 30 वर्षांपासून नवी मुंबईमधील विस्तारीत गावठाणाचा आणि घरांचा प्रश्न प्रलंबित आहे. कोणताही राजकीय पक्ष हे प्रश्न सोडवण्यास तयार नाही. याचा फक्त राजकारणासाठी वापर होत असल्याचा आरोप करत येथील 28 गावांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला.

कोल्हापूर 

कोल्हापूरच्या धामणी खोऱ्यातील 30 हजार मतदारांनी पाण्याच्या प्रश्नावर लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला. जिल्ह्यातील तब्बल 60 ग्रामपंचायतींनी याबाबतचा ठराव केला. तसेच राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदीही केली.

भिवंडी

भिवंडी लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या कल्याण पश्चिममधील 5 सोसायटींनी आपले नागरी प्रश्न सुटावे यासाठी निवडणुकीवर बहिष्कार टाकला. वारंवार पाठपुरावा करुनही रस्त्याचा प्रश्न न सुटल्याने स्थानिक नागरिकांनी हा निर्णय घेतला. याबाबत त्यांनी थेट निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहून याची माहितीही दिली. यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी याची दखल घेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला नागरिकांच्या प्रश्नावर कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या. तसेच नागरिकांना मतदानावरील बहिष्कारापासून परावृत्त करण्यास सांगितले.

Follow Us
NEET पेपरफुटी प्रकरणी पंतप्रधान मोदींच्या ट्विटवर CJP चं रिट्विट; थेट
NEET पेपरफुटी प्रकरणी पंतप्रधान मोदींच्या ट्विटवर CJP चं रिट्विट; थेट म्हणाले....
मोदींची मोठी घोषणा! NEET पेपरफुटीबाबत पंतप्रधान मोदींचं ट्विट
PM Modi Tweet | मोदींची मोठी घोषणा! NEET पेपरफुटीबाबत पंतप्रधान मोदींचं ट्विट
'मी अजूनही जिवंत आहे'; सोनम वांगचुक यांचा रुग्णालयातून भावनिक व्हिडीओ,
'मी अजूनही जिवंत आहे'; सोनम वांगचुक यांचा रुग्णालयातून भावनिक व्हिडीओ, म्हणाले आजच उपोषण...
अण्णा हजारे मैदानात! CJP आंदोलनाला मोठा पाठिंबा; मौन आंदोलनाची घोषणा
Anna Hajare | दिल्लीनंतर अण्णा हजारे मैदानात! CJP आंदोलनाला मोठा पाठिंबा; सरकारविरोधात मौन आंदोलनाची घोषणा
गोदावरीच्या पुरात अडकले नेपाळचे पर्यटक! नेमकं काय घडलं?
Nashik Flood Rescue Operation | गोदावरीच्या पुरात अडकले नेपाळचे पर्यटक! नाशिकमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन, नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद! 16 मेट्रो स्थानकेही...
Jantar Mantar Students Protest | दिल्लीतील आंदोलनास्थळवरून अपडेट्स : धर्मेंद्र प्रधानांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद! 16 मेट्रो स्थानकेही बंद
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागेल, नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतर कॉकरोच जनता पार्टीची थेट पोस्ट...

धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागेल, नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतर कॉकरोच जनता पार्टीची थेट पोस्ट..

सरकारची मोठी घोषणा! नीट परीक्षा पेपरफुटीत थेट निर्णय, नरेंद्र मोदी यांनी...

सरकारची मोठी घोषणा! नीट परीक्षा पेपरफुटीत थेट निर्णय, नरेंद्र मोदी यांनी..

Vanchit Maharashtra Bandh : वंचितच्या महाराष्ट्र बंदमुळे काय परिस्थिती आहे? कुठे कडकडीत बंद, कसा प्रतिसाद जाणून घ्या.

Vanchit Maharashtra Bandh : वंचितच्या महाराष्ट्र बंदमुळे काय परिस्थिती आहे? कुठे कडकडीत बंद, कसा प्रतिसाद जाणून घ्या

बाथरुम सीनमध्ये बळजबरी किस करत..; तेजस्वी प्रकाशच्या बॉयफ्रेंडवर अभिनेत्रीचा मोठा आरोप.

बाथरुम सीनमध्ये बळजबरी किस करत..; तेजस्वी प्रकाशच्या बॉयफ्रेंडवर अभिनेत्रीचा मोठा आरोप

Virat Kohli: आंदोलनादरम्यान विराट कोहली मूग गिळून प्रेमानंद महाराजांकडे..; चाहत्यांनी धारेवरच धरलं.

Virat Kohli: आंदोलनादरम्यान विराट कोहली मूग गिळून प्रेमानंद महाराजांकडे..; चाहत्यांनी धारेवरच धरलं

तो फोटो ठरला ‘क्लू’, 3 वर्षांचा शोध संपला; बेपत्ता मुलाची अखेर कुटुंबियांशी भेट, पोलिसांमुळे चेहऱ्यावर फुललं हास्य !.

तो फोटो ठरला ‘क्लू’, 3 वर्षांचा शोध संपला; बेपत्ता मुलाची अखेर कुटुंबियांशी भेट, पोलिसांमुळे चेहऱ्यावर फुललं हास्य !