AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL Final च्या दिवशीच ठरणार बिहारचा बाहुबली कोण?

बिहारमध्ये एकूण 3 टप्प्यांमध्ये मतदानप्रक्रिया पार पडणार आहे. | ( 10 November Bihar Election And IPL 2020 Result )

IPL Final च्या दिवशीच ठरणार बिहारचा बाहुबली कोण?
| Updated on: Sep 25, 2020 | 4:38 PM
Share

बिहार : बिहार विधानसभा निवडणुकांचे ( Bihar Election 2020 ) बिगुल वाजले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. बिहारमध्ये एकूण 3 टप्प्यांमध्ये मतदानप्रक्रिया पार पडणार आहे. तर 10 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. विशेष म्हणजे 10 नोव्हेंबरलाच आयपीएलच्या 13 व्या मोसमातील अंतिम सामना खेळला जाणार आहे. त्यामुळे एकाच दिवशी बिहारची सत्ता कोण काबीज करणार आणि आयपीएलच्या 13 व्या मोसमाची ट्रॉफी कोण उंचावणार हे समजणार आहे. ( 10 November Bihar Election And IPL 2020 Result )

बिहारमधील एकूण 243 जागांसाठी 3 टप्प्यात मतदानप्रक्रिया पार पडणार आहे. पहिला टप्प्यातील मतदानप्रक्रिया 28 ऑक्टोबरला पार पडेल. यात एकूण 71 जागांसाठी मतदान केले जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान 3 नोव्हेंबरला होणार आहे. हे मतदान एकूण 94 जागांसाठी होणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदान एकूण 78 जागांसाठी होणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 नोव्हेंबरला पार पडणार आहे. तर या तीनही टप्प्यातील मतदानाचा निकाल 10 नोव्हेंबरला लागणार आहे.

आयपीएल 2020 चा अंतिम सामना

आयपीएलच्या 13 व्या मोसमाची सुरुवात झाली आहे. भारतातील कोरोनापरिस्थिीमुळे यंदाच्या आयपीएलच्या मोसमाचं आयोजन यूएईमध्ये करण्यात आलं आहे. आयपीएलच्या या मोसमाचं वेळापत्रक 6 सप्टेंबरला जाहीर करण्यात आलं होतं. आयपीएलच्या साखळी फेरीत एकूण 60 सामने खेळले जाणार आहेत. यूएईतील दुबई, अबुधाबी आणि शारजा या मैदानांवर आयपीएलचे हे सामने खेळले जाणार आहेत. बीसीसीआयनुसार आयपीएलच्या या मोसमातील अंतिम सामना हा 10 नोव्हेंबरला खेळला जाणार आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत आयपीएलची फायनल मॅच रविवारी खेळवण्यात येत होती. मात्र यंदा मंगळवारी खेळण्यात येणार आहे.

कोरोनामुळे बिहार निवडणुकीवर काही प्रमाणात बंधंन आली आहेत. तसेच नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत.

कोरोना परिस्थितीत बिहारमध्ये मतदानाची वेळ एक तासाने वाढवण्यात आली आहे. त्यामुळे मतदारांना सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या दरम्यान मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. कोरोनाग्रस्तांनाही आपला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. शेवटच्या एक तासात म्हणजेच 5-6 या दरम्यान कोरोनाग्रस्तांना मतदान करता येणार आहे. उमेदवारांना प्रचारसभेत सामाजिक अंतराचं भान राखावं लागणार आहे.

मोठ्या धुमधडाक्यात उमेदवारी अर्ज दाखल केला जातो. आता मात्र त्या संबंधित उमेदावारासोबत फक्त 2 जणांनाच उपस्थित राहता येणार आहे. उमेदवारासह एकूण 5 जणांनाच दारोदार प्रचार करता येणार आहे. कोरोनाची बाधा होऊ नये, यासाठी निवडणूक आयोगानेही खबरदारी घेतली आहे. राज्य निवडणूक आयोगाला एकूण 6 लाख पीपीई कीट पुरवण्यात येणार आहे. तसेच यासोबत 46 लाख मास्क आणि 7 लाख सॅनिटायजर देण्यात येणार आहेत.

संबंधित बातम्या :

Bihar Elections | चिराग पासवान मुख्यमंत्रिपदाचे दावेदार, लोजप आग्रही; एनडीएशी वाटाघाटी

Bihar Election | बिहारचं राजकारण, संख्याबळ ते सत्ताकारण, कोण किती वरचढ?

( 10 November Bihar Election And IPL 2020 Result )

Follow Us
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा