AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : ‘जगदंबा तलवार महाराष्ट्रात आणलीच पाहिजे’ उदयनराजे भोसले म्हणतात, खानाच्या कबरीभोवती…

अफझल खानाच्या तलवारीपासून जगदंबेच्या तलवारीपर्यंत.. वाचा काय म्हणाले उदयनराजे भोसले?

Video : 'जगदंबा तलवार महाराष्ट्रात आणलीच पाहिजे' उदयनराजे भोसले म्हणतात, खानाच्या कबरीभोवती...
उदयनराजे भोसलेImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: Nov 11, 2022 | 10:39 AM
Share

सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांची जगदंबा तलवार महाराष्ट्रात आणलीच पाहिजे, असं वक्तव्य भाजप खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी केलंय. ते साताऱ्यात (Satara) पत्रकारांशी बोलत होते. याशिवाय प्रतापगडावरील अफझल खानाच्या (Afzal Khan) कबरीजवळील अनधिकृत बांधकामाच्या वादावरही त्यांनी भाष्य केलं. हे अनधिकृत बांधकाम काढलं गेलं पाहिजे, असं मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केलंय. सोबत या कारवाईचं राजकारण करण्याची गरज नाही, असंही ते म्हणाले.

जगदंबा तलावर महाराष्ट्रात आणण्याच्या मागणीवर बोलताना उदयनराजे भोसले यांनी म्हटलं की..

महाराष्ट्रातील प्रत्येकाला वाटतं की जगदंबा तलवार राज्यात आणली जावी. टॉवर ऑफ लंडनमध्ये सध्या ती ठेवली गेली आहे. तिथली सिक्युरीटी मी जाऊन जातीने बघितली आहे. आता डिप्लोमसी म्हणून मोठ्या मनाने बिट्रिश सरकारने त्या त्या देशाला त्यांच्या त्यांच्या ऐतिहासिक ठेवी दिल्या पाहिजेत.

पाहा व्हिडीओ :

दरम्यान, यावेळी त्यांनी अफझल खान कबरप्रकरणावरही आपलं मत नोंदवलं. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात मान सन्मानाच्या बाबतीत कधीच कुणाला कमी केलं नाही. आपल्यावर हल्ला करणाऱ्याची कबर बांधण्याचा विचार दुसऱ्या कुणीही केला नसता. पण महाराजांचे विचार मोठे होते. जो विचार कुणीच केला नसता, तो छत्रपती शिवाजी महाराज यांनी केला, असंही उदयनराजे भोसले यांनी म्हटलंय.

या कबरीजवळील बेकायदा बांधकाम काढलं गेलंच पाहिजे. ही कबर नेमकी कशाकरता आहे, त्यामागचा इतिहास काय आहे, हे आताच्या पिढीला कळलं पाहिजे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची साताऱ्यात भेट घेतल्यानंतर उदयनराजे भोसले हे माध्यमांशी बोलत होते.

विशेष म्हणजे या कारवाईवरुन कुणीही गैरसमज करुन घेऊ नयेत, असंही ते म्हणाले. ही कारवाई मुसलमान समाजाच्या विरोधात आहे, हा गैरसमज पसरला जात असून तो चुकीचा आहे. कुणीही असा समज करुन घेऊ नये, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

अफझल खानाची कबर पर्यटनासाठी खुली करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. तसंच कबर हटवण्याची मागणी ज्याच्या त्याच्या बुद्धीप्रमाणे केली जातेय, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

प्रतापगड येथील अफझल खानाच्या कबरीजवळचं अनधिकृत बांधकाम पाडलं जावं, असे आदेश 2016 मध्ये उच्च न्यायालयाने दिले होतं. मात्र आता शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात अखेर हे बांधकाम पाडलं गेलंय. याबाबत प्रश्न विचारला असता या कारवाईला राजकीय रंग लावले जावू नयेत, असंही उदयनराजे भोसले यांनी म्हटलंय.

Follow Us
भाजप शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने...
मोठी बातमी! भाजप-शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने चर्चांना उधाण
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत..
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत सुचक विधान, थेट म्हणाले...
नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला...
Video | नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला, असं काय घडलं की...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट... धारशिवमध्ये राजकीय समीकरण पुन्हा बदलणार?
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता..
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता अगामी मोर्च्यावर
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत..
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत बड्या मंत्र्याचं मोठं विधान
पुन्हा ठाकरेंचे आमदार...फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या सोहळ्यात
पुन्हा ठाकरेंच्या आमदारांची चर्चा! फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या कार्यक्रमात ठाकरेंच्या आमदाराची हजेरी
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... मोठी खळबळ
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... शिवसेना निकालाआधीच बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचे पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर...
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचं पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, अखेर म्हणाले...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिन...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान CM नेमकं काय म्हणाले?