AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपच्या नेत्याने ईव्हीएम हॅकचं प्रात्यक्षिक करून दाखवलं होतं… उद्धव ठाकरे यांचा मोठा खळबजनक गौप्यस्फोट

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रासह इतरही राज्यांत मतचोरी झाल्याचा धक्कदायक आरोप केला आहे. या आरोपानंतर देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे शिवेसना (ठाकरे गट) पक्षानेही हा मुद्दा उचलून धरला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोग आणि सत्ताधारी भाजपाला धारेवर धरलं आहे.

भाजपच्या नेत्याने ईव्हीएम हॅकचं प्रात्यक्षिक करून दाखवलं होतं... उद्धव ठाकरे यांचा मोठा खळबजनक गौप्यस्फोट
| Updated on: Aug 11, 2025 | 4:42 PM
Share

Uddhav Thackeray : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रासह इतरही राज्यांत मतचोरी झाल्याचा धक्कदायक आरोप केला आहे. या आरोपानंतर देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे शिवेसना (ठाकरे गट) पक्षानेही हा मुद्दा उचलून धरला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोग आणि सत्ताधारी भाजपाला धारेवर धरलं आहे. त्यांनी मतदान प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून भाजपाच्याच एका नेत्याने ईव्हीएम हॅक करण्याचं प्रात्यक्षिक करून दाखवलं होतं असा खळबळजनक दावा केला आहे. उद्धव ठाकरेंच्या या दाव्यानंतर आता हा नेता नेमका कोण होता? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. तसेच आता भाजपाच्या गोटातून ठाकरेंना नेमके कशा पद्धतीने प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत कोणता दावा केला?

राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर त्यावर खासदार शरद पवार यांनी भाष्य केले होते. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवेळी मला दोन जण भेटायला आले होते. त्यांनी मला 160 जागा जिंकून देऊ असे सांगितले होते. पण मी ते नाकारले, असे खळबळजनक विधान केले होते. पवारांच्या याच दाव्यावर तुमची भूमिका काय? असा प्रश्न यावेळी ठाकरेंना विचारण्यात आला. यावर बोलताना निवडणुका आल्यावर अशी लोकं भेटतात. अशा लोकांना आम्ही गांभीर्याने घेतलं नाही. आम्ही त्यांना थारा दिला नव्हता. आम्हाला अशा पद्धतीने जिंकायचं नव्हतं, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली. पुढे बोलताना त्यांनी भाजपसोबत युती असताना भाजपचे एक नेते आले होते. त्यांनी ईव्हीएम कसं हॅक केलं जातं याचं प्रात्यक्षिक दाखवलं होतं. आता ते नेते नाहीत, असा मोठा आणि खळबळजनक दावा केला.

कोर्टात जाऊन काय करावं?

निवडणूक प्रक्रिया आणि मतदार याद्यांतील कथित घोळाप्रकरणी तुम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार का? असाही प्रश्न यावेळी ठाकरेंना विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना कोर्टात जाऊन काय करावं. डीलिट झालेली नावे कोर्टाला देणं आम्हाला बंधनकारक नाही असं आयोग म्हणतं. निवडणूक आयोग हे कोर्टाच्या वर आहे का? राष्ट्रपतींच्याही वर निवडणूक आयुक्त आहेत का? असे अनेक सवाल ठाकरेंनी उपस्थित केले.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.