AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Political Crisis: जे वाजपेयींनी केलं तेच उद्धव ठाकरे करणार? बहुमत चाचणीआधीच राजीनामा देणार? आता समारोपाच्या भाषणाकडे लक्ष

सन 1996 साली अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यावेळी विश्वासदर्शक ठरावाच्या भाषण केले. यानंतर भाषण संपताच आपण राजीनामा देत असल्याची घोषणा वाजपेयी यांनी केली होती. अगदी त्याचप्रमाणे उद्या विश्वासदर्शक मतदानाच्या आधीच किंवा शेवटच्या भाषणानंतर मुख्यमंत्री आपला राजीनामा सादर करतील , असे मत राजकीय जाणकारांनी व्यक्त केले आहे.

Maharashtra Political Crisis: जे वाजपेयींनी केलं तेच उद्धव ठाकरे करणार? बहुमत चाचणीआधीच राजीनामा देणार? आता समारोपाच्या भाषणाकडे लक्ष
vanita kamble
vanita kamble | Updated on: Jun 29, 2022 | 8:27 PM
Share

मुंबई : एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या बंडखोरीमुळे महाराष्ट्रातील राजकारणात रान पेटले आहे. महाविकास आघाडी सरकराचा सत्ता संघर्ष आता निर्णयक टप्प्यावर येवून पोहचला आहे. बहुमत चाचणीच्या माध्यमातून ठाकरे सरकारला एक प्रकारची अग्नी परीक्षाच द्यावी लागणार आहे. मात्र, या बहुमत चाचणीच्या आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्या राजीनाम्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. अटबिहारी वाजपेयींनी (Atal Bihari Vajpayee)केलं तेच उद्धव ठाकरे करणार का? बहुमत चाचणीआधीच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा(resign as Chief Minister) देणार का? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. यामुळे आता समारोपाच्या भाषणात मुख्यमंत्री काय बोलतात. राजीनाम्याची घोषणा करतात का? याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अटलबिहारी वाजपेयींचा कित्ता गिरवणार

सन 1996 साली अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यावेळी विश्वासदर्शक ठरावाच्या भाषण केले. यानंतर भाषण संपताच आपण राजीनामा देत असल्याची घोषणा वाजपेयी यांनी केली होती. अगदी त्याचप्रमाणे उद्या विश्वासदर्शक मतदानाच्या आधीच किंवा शेवटच्या भाषणानंतर मुख्यमंत्री आपला राजीनामा सादर करतील , असे मत राजकीय जाणकारांनी व्यक्त केले आहे.

ठाकरे सरकारची शेवटची कॅबिनेट बैठक?

महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीमंडळाची बैठक आज पार पडली. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यापासून नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नामकरणास मान्यता देण्यासारखे काही महत्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात आले. ही महाविकास आघाडी सरकारची शेवटची बैठक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या बैठकीच्या शेवटी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या व्यक्तव्याचा अर्थ देखील त्यांच्या राजीनाम्याशी जोडला जात आहे.

माझ्या सहकाऱ्यांनी मला दगा दिला, मुख्यमंत्र्यांचे भावनिक उद्गार

मला सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. मला माझ्याच काही लोकांनी दगा दिल्यानं ही परिस्थिती उद्भवली आहे. पाच वर्षे हे सरकार चालणार असं म्हटलं होतं. पण, माझ्या सहकाऱ्यांनी मला दगा दिला. त्यामुळं ही परिस्थिती उद्भवली, असे भावनिक उद्गार यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले.

बंडखोर आमदारांचे पाठिंबा काढल्याचे पत्र

एकनाथ शिंदे गटातील 39 बंडखोर आमदारांनी महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढल्याचे पत्र सुप्रिम कोर्टात सादर केले आहे. याच पत्राचा आधार घेत देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे बहुमत चाचणीची मागणी केली आहे.

वर्षा बंगला सोडल्यापासून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची चर्चा

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर मुख्यमंत्र्यांनी 22 जून रोजी वर्षा बंगला सोडला होता. मला कुठल्याही आमदाराने मी मुख्यमंत्री म्हणून कारभार करण्यास सक्षम नसल्याचे सांगावे, मी एका मिनिटात राजीनामा देईल, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणले होते. यानंचर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी करत हल्लाबोल चढवला. बहुमत गमावल्यानंतर भावनिक साद कसली? विधिमंडळात शिवसैनिक नाही आमदार मतदान करतात. पुरे झालं, जनता विटली आहे, खिशातला राजीनामा बाहेर काढा आता…, असे ट्विट आता त्यांनी केले होते.

समोर बसला तर मार्ग निघेल

आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू. कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका. शिवसेनेने जो मान सन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही. समोर आलात बोललात तर मार्ग निघेल. शिवसेना पक्ष प्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे. समोर येऊन बोला आपण मार्ग काढू, असं भावनिक आवाहनही सातत्याने उद्धव ठाकरे करत आहेत. मात्र, बंडखोर एकनाथ शिंदे गट आपल्या निर्णयावर ठाम आहेत.

Follow Us
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक
रेवती सुळेंच्या रिसेप्शन सोहळ्यातील सर्वात खास व्हिडीओ!
रेवती सुळेंच्या रिसेप्शन सोहळ्यातील सर्वात खास व्हिडीओ! पंतप्रधान आणि रोहित पवारांच्या संवादादरम्यानच...