AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…ही तर राजकीय आत्महत्या, वाईट वाटण्याचं कारण काय? राणे यांचा पुन्हा उद्धव ठाकरेंवर निशाणा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला आहे.

...ही तर राजकीय आत्महत्या, वाईट वाटण्याचं कारण काय? राणे यांचा पुन्हा उद्धव ठाकरेंवर निशाणा
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 17, 2022 | 8:23 AM
Share

सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिवसेना (Shiv sena) उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. आता वाईट वाटून काहीच फायदा नाही. आत्महत्या करणाऱ्या माणसाला त्याचं काय वाईट वाटणार?, कारण तो स्वत:च आत्महत्या करत असतो. तशीच उद्धव ठाकरे यांनी स्वत:च आपली राजकीय आत्महत्या केल्याची टीका नारायण राणे यांनी केली. उद्धव ठाकरे हे ज्या पद्धतीने आमदारांशी वागले, पदाधिकाऱ्यांशी वागले त्यामुळे एक-एक जण त्यांच्या डोळ्यादेखत पक्षातून बाहेर पडला. 40 आमदार बाहेर पडले, मात्र एकालाही अडवण्याची उद्धव ठाकरे यांची हिंमत झाली नाही असं राणे यांनी म्हटलं आहे.

नारायण राणे यांनी नेमकं काय म्हटलं?

नायारण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघात केला आहे. आत्महत्या करणाऱ्या माणसाला आत्महत्या केल्याचं काय वाईट वाटणार. उद्धव ठाकरे यांनी स्वत:च त्यांची राजकीय आत्महत्या केली. उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने वागले, त्यामुळे 40 आमदारांनी उठाव केला, मात्र त्यातील एकालाही आडवण्याची उद्धव ठाकरे यांची हिंमत झाली नाही. आता वाईट वाटून काय फायदा? हा नियतीचा खेळ असतो, कधीकधी काही गोष्टी वाटल्या तरी सांगायच्या नसतात असा सल्लाही नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

मुंबईची जबाबदारी राणे यांच्याकडे

येत्या काळात मुंबईत महापालिका निवडणुकांसह इतरही काही निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांत मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांना रोखण्याची जबाबदारी भाजपाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे सोपवल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर नारायण राणे यांच्या संघटनात्मक कार्यक्रमांचं आयोजनही काही दिवसांपूर्वी मुंबईत करण्यात आलं होतं.

Follow Us
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदत
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
मुंबई महापालिकेकडून शालेय साहित्य वाटपास विलंब: इराण युद्ध कारणीभूत
मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
शिल्पा गवारे कुटुंबीयांकडून छळाचा आरोप, न्यायची मागणी
पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी पार
Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी, काय सुनावणी घडलं?
नेपाळ पुराचा बिहारला फटका: पाटणा, चंपारण, गोपाळगंज, सारणमध्ये सतर्कता
नेपाळमधील महापुराचा बिहारला फटका: गंगा नदीकाठच्या झोपड्या पाण्याखाली
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार मागणाऱ्या लेकाला पालकांनीच संपवलं
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात; सांस्कृतिक सोहळ्यांमध्ये सहभाग
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर...
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश