AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रामदास आठवले यांना हवा योगी सरकारमध्ये हिस्सा? आरपीआयचा हेतू काय?

मोदी सरकारमधील सामाजिक न्याय आणि अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी योगी सरकारमध्ये आपल्या आरपीआय पक्षालाही सत्तेत वाट मिळावा असे म्हटले आहे. संविधान बदलणे, आरक्षण हटवणे या विरोधी पक्षांच्या खोटेपणामुळे भाजपचे नुकसान झाले आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

रामदास आठवले यांना हवा योगी सरकारमध्ये हिस्सा? आरपीआयचा हेतू काय?
pm modi, yogi adityanath, ramdas athavaleImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Mahesh Pawar
Mahesh Pawar | Updated on: Jul 06, 2024 | 9:25 PM
Share

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय) राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उत्तर प्रदेशच्या योगी सरकारमधील सरकारमध्ये आपल्या आरपीआयलाही हिस्सा मिळायला हवा अशी मागणी केलीय. उत्तर प्रदेशमध्ये ज्याप्रमाणे अपना दल, निषाद पक्ष यांना सरकारमध्ये भागीदारी मिळाली आहे. त्याचप्रमाणे आरपीआयला वाटा मिळायला हवा. लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमधून 70 जागा मिळण्याच्या भाजपच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. भाजपला स्वबळावर केवळ 33 जागा मिळाल्या. संविधान बदलणे, आरक्षण हटवणे या विरोधी पक्षांच्या खोटेपणामुळे भाजपचे नुकसान झाले. त्यामुळे भाजपने उत्तर प्रदेशात आरपीआयला सोबत घेण्याची गरज आहे असे ते म्हणाले.

RPI च्या उत्तर प्रदेश युनिटतर्फे चारबाग, रवींद्रालय येथे सलग तिसऱ्यांदा मंत्री झाल्याबद्दल रामदास आठवले यांचा सत्कार सभारंभ आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात बोलताना रामदास आठवले यांनी ही मागणी केली. येत्या काही महिन्यांत महाराष्ट्रात निवडणुका आहेत. NDA आघाडी 170 ते 180 जागा जिंकून तेथे सरकार स्थापन करेल. आरपीआयनेही या निवडणुकांसाठी 8 ते 10 विधानसभा जागांची मागणी केली आहे असे आठवले यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील जनतेला इंडिया आघाडीने आरक्षण हटवण्याचे आणि संविधान रद्द करण्याचा खोटा प्रचार करून एनडीए सरकारच्या विरोधात ब्लॅकमेल केले. त्यामुळे भाजपच्या जागा कमी झाल्या. परंतु, असे असतानाही केंद्रात एनडीएचे सरकार स्थापन झाले. यावरून मोदीजी यांची लोकप्रियता कमी झालेली नाही हे दिसून येते. पंतप्रधान मोदी यांनी नेहमीच संविधानाचा आदर केला आहे असे ते म्हणाले. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची अर्थव्यवस्था जगात दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आली. यावेळी त्याला तिसऱ्या क्रमांकावर नेण्याचे उद्दिष्ट आहे असेही त्यांनी सांगितले.

हातरस घटनेवर भाष्य करताना ते म्हणाले, ज्या बाबांच्या सत्संगात चेंगराचेंगरी झाली त्यांची मालमत्ता जप्त करण्यात यावी. ज्या गरीब कुटुंबांतील लोक मरण पावले आहेत त्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी. त्यासाठी ते मुख्यमंत्र्यासोबत बोलणार आहेत. हातरसमध्ये 121 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुःखद आणि गंभीर आहे. मुख्यमंत्री योगीजींच्या सूचनेनुसार निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे, जी या प्रकरणाची गंभीरपणे चौकशी करत आहे. जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असेही आठवले यांनी स्पष्ट केले.

Follow Us
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या भागात पवासाची हजेरी!
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या  भागात पवासाची हजेरी!
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले तरी कुठे? वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप!
विरोधीपक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड
विरोधी पक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड चर्चा; 45 मिनीटे... काय घडलं?
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला..
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला महत्त्वाचा आदेश, आता...
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना पवरांनी दिली मोठी..
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना दिली मोठी जबाबदारी, स्वतःच म्हणाले...
पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील
Pune Water Cut | पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील; महापालिकेची मोठी घोषणा काय?
4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?
Sachin Sawant | 4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?; उज्ज्वला योजनेवरून काँग्रेसचा संताप
लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केल
Video | लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केलेल्या विधानाची राज्यात मोठी चर्चा!
धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच!
Dahanu | धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच! साखरे गावाचा पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच वेधलं लक्ष