AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फडणवीसांनी तिकडेच राहावे, आमच्या शुभेच्छा, बिहारच्या प्रभारीपदावरुन वडेट्टीवारांचा टोला

फडणवीसांनी तिकडेच राहावे. आमच्या शुभेच्छा," असा टोलाही वडेट्टीवार यांनी लगावला. Vijay Wadettiwar on Devendra Fadnavis new roll for Bihar election

फडणवीसांनी तिकडेच राहावे, आमच्या शुभेच्छा, बिहारच्या प्रभारीपदावरुन वडेट्टीवारांचा टोला
| Updated on: Aug 14, 2020 | 6:02 PM
Share

 चंद्रपूर : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना केंद्राकडून बिहारचे प्रभारी म्हणून नवी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यावर महाविकासआघाडीच्या अनेक नेत्यांकडून आरोप केले जात आहे. “महाराष्ट्रात भाजपचे सत्ता स्थापनेचे स्वप्न भंग झाले आहे. त्यामुळे फडणवीसांची नियुक्ती बिहारमध्ये केली जात आहे,” अशी प्रतिक्रिया राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. (Vijay Wadettiwar on Devendra Fadnavis may get new roll for Bihar election)

“देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रीय राजकारणात जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यामुळे आता त्यांनी तिकडेच राहावे. आमच्या शुभेच्छा,” असा टोलाही वडेट्टीवार यांनी लगावला.

“ज्या मुंबई पोलिसांच्या सुरक्षेत 5 वर्ष फडणवीसांनी सत्ता भोगली. त्यांच्यावरच अविश्वास म्हणजे महाराष्ट्राशी गद्दारी आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले. बिहारमध्ये गुंडाराज असताना फडणवीस आणि भाजप त्यांचीच भाषा बोलत असल्याचे विधान त्यांनी केले. ही चौकशी CBI ने ही करावी. मात्र सुशांत आत्महत्या प्रकरणात जशी भाजपने चार महिने मुद्दा लावून धरला, तसा शेतकरी आत्महत्येबाबत मात्र भाजप मौन बाळगलं आहे,” असे वडेट्टीवार म्हणाले.

राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बिहार भाजपच्या निवडणूक प्रभारी पदी नियुक्ती झाली आहे. त्यावर आता राजकीय शरसंधान केले जात आहे. राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी महाराष्ट्रात भाजपचे सत्ता स्थापनेचे स्वप्न भंग झाल्याने ही नियुक्ती झाली असल्याचे म्हटले आहे.

बिहारमध्ये येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपची रणनीती सुरु झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांचं संघटन कौशल्य पाहता, त्यांना भाजपचे बिहार प्रभारी केलं जाऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. भाजपने महाराष्ट्रातील निवडणुका देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्त्वाखाली लढल्या होत्या. त्यात भाजप महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. सत्ता स्थापन केली नसली, तरी भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या. यातूनही देवेंद्र फडणवीसांनी आपलं नेतृत्व सिद्ध केल्याचं बोललं जात आहे. (Vijay Wadettiwar on Devendra Fadnavis may get new roll for Bihar election)

संबंधित बातम्या : 

देवेंद्र फडणवीस यांना नवी जबाबदारी मिळण्याची शक्यता, केंद्रीय नेतृत्व लवकरच घोषणा करण्याची चिन्हं

बिहारच्या प्रभारीपदी देवेंद्र फडणवीस यालाच योगायोग म्हणतात : धनंजय मुंडे

अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.