AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुढच्या स्ट्राईकवेळी विरोधकांनाच विमानाला बांधून नेऊ – व्ही.के. सिंह 

नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय वायूसेनेने पाकिस्तानच्या बालाकोट येथील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केली. या एअर स्ट्राईकमध्ये 200 ते 300 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती आहे. मात्र या हल्ल्यावर विरोधीपक्षांच्या नेत्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. या हल्ल्याचे पुरावे मागितले, यात ठार झालेल्या 300 दहशतवाद्यांचे पुरावे मागितले. मात्र विरोधीपक्षाच्या या प्रश्नांना केंद्रीय मंत्री व्ही.के. […]

पुढच्या स्ट्राईकवेळी विरोधकांनाच विमानाला बांधून नेऊ - व्ही.के. सिंह 
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM
Share

नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय वायूसेनेने पाकिस्तानच्या बालाकोट येथील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केली. या एअर स्ट्राईकमध्ये 200 ते 300 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती आहे. मात्र या हल्ल्यावर विरोधीपक्षांच्या नेत्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. या हल्ल्याचे पुरावे मागितले, यात ठार झालेल्या 300 दहशतवाद्यांचे पुरावे मागितले. मात्र विरोधीपक्षाच्या या प्रश्नांना केंद्रीय मंत्री व्ही.के. सिंह यांनी आता सडेतोड उत्तर दिले आहे. व्ही. के सिंह म्हणाले की, ज्या विरोधकांना पुरावे हवेत त्यांनाही स्ट्राईकवेळी विमानाच्या खाली बांधून घेऊन जावे आणि तिथे सोडावे. म्हणजे ते मृतदेह मोजतील आणि परत येतील.

“पुढच्यावेळी जेव्हा भारताला अशी कुठली स्ट्राईक करायची असेल, तेव्हा या प्रश्न उपस्थित करणाऱ्या विरोधीपक्षांच्या नेत्यांनाही विमानाच्या खाली बांधून घेऊन जावे. जेव्हा बॉम्ब टाकण्यात येईल तेव्हा त्यांनी टारगेट बघून घ्यावे. त्यानंतर त्यांना तिथेच उतरवावे, म्हणजे ते मृतदेह मोजतील आणि परत येतील”, अशा खोचक शब्दांत व्ही.के. सिंह यांनी विरोधीपक्षांचा समाचार घेतला आहे. तसेच, “बॉम्ब टाकला, इमारतींना निशाणा बनवलं आणि 1000 किलेग्रामच्या बॉम्बस्फोटात लोक मारल्या गेले नाहीत? काय तुम्हाला हे मोजायचं आहे? मला नाही माहित हे कुणाला मोजायची इच्छा आहे? मात्र, हे अत्यंत निराशाजनक आहे”, असेही व्ही.के. सिंह म्हणाले.

व्ही.के. सिंह यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनीही प्रतिक्रिया दिली. “मी तुमचे समर्थन करतो, या लोकांनी देशाच्या एकतेचे खंडण केले आहे, पुरावे मागताना यांना लाज वाटायला हवी”, अशा कडक शब्दांत अजित डोभाल यांनी विरोधकांवर टीका केली.

विरोधीपक्षांच्या भूमिकेवर नेहमीच हल्लाबोल करणाऱ्या व्ही.के. सिंह यांनी विरोधकांची खिल्ली उडवत एक ट्वीट केलं. “रात्री 3.30 वाजता मच्छर खूप आहेत, ते मी हिटने मारले. आता मच्छर किती मारले आहेत, हे मोजत बसू की झोपू?”, असे व्ही. के. सिंह यांनी आपल्यामध्ये ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

Follow Us
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच...
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच मोठी खळबळ; महापालिकेत काय घडलं?
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड संताप; नाव न घेता राऊतांना थेट इशारा?
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा इशारा, काय म्हणाले?
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ, खासदर फुट
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने  खळबळ, खासदर फुटीनंतर आणखी मोठा धक्का!
अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ
मोठी बातमी! अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ; सोलापुरात नेमकं काय घडतंय?
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं;
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं; थेट इशाराच दिला!
मुंबईत पोलीस तैनात! दिना पाटील यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त!
Operation Tiger | दिल्लीत बंड, मुंबईत पोलीस तैनात! संजय दिना पाटील यांच्या घराबाहेर अचानक वाढवला पोलिस बंदोबस्त!
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या...
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या... नेमकं कारण काय?
ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
Sushma Andhare | ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
6 खासदार कुठे गेले?; सामंतांच्या एका वक्तव्याने राजकारणत खळबळ!
Uday Samant | 6 खासदार कुठे गेले?; उदय सामंतांच्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ!