AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत 36-0 रिझल्ट हवाय, मुख्यमंत्र्यांचं नव्या अध्यक्षांना टार्गेट

नवनियुक्त मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांच्या पदग्रहण सोहळ्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री बोलत होते. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या फायनलमध्ये जे दोन संघ होते, ते आता एकत्र आहेत. मुबंईत 36-0 असा रिझल्ट द्यायचाय, असा निर्धार मुख्यमंत्र्यांनी नवनियुक्त अध्यक्षांसमोर केला.

मुंबईत 36-0 रिझल्ट हवाय, मुख्यमंत्र्यांचं नव्या अध्यक्षांना टार्गेट
| Edited By: | Updated on: Jul 19, 2019 | 7:11 PM
Share

मुंबई : मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेना आणि भाजप यांच्या युतीत स्पर्धा असली तरी आगामी विधानसभा निवडणूक शिवसेनेबरोबरच लढणार आणि यंदा मुंबईत सर्वच्या सर्व जागा जिंकणार असा विश्वास विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केलाय. नवनियुक्त मुंबई अध्यक्ष (Mumbai BJP president) मंगल प्रभात लोढा (Mangal prabhat lodha) यांच्या पदग्रहण सोहळ्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री बोलत होते. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या फायनलमध्ये जे दोन संघ होते, ते आता एकत्र आहेत. मुबंईत 36-0 (mumbai vidhansabha seats) असा रिझल्ट द्यायचाय, असा निर्धार मुख्यमंत्र्यांनी नवनियुक्त अध्यक्षांसमोर केला. यावेळी मुंबईतील इतर महत्त्वाचे नेते आणि मंत्रीही उपस्थित होते.

युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला असो वा मुख्यमंत्री पद ‘आमचं ठरलंय’ असं म्हणता म्हणता, भाजप-शिवसेनेत चित्र रोज बिघडताना दिसतं. भाजपचं राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra fadnavis) आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात पुन्हा युती करण्यामागचा एक फॉर्म्युला निश्चित झालाय. पण लोकसभा निवडणुकीत राज्यात मिळालेलं यश आणि राज्यात तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता भाजपने शिवसेनेवर आपलं दबावतंत्र पुन्हा सुरु केलंय. भाजप नेत्यांच्या दररोज होत असलेल्या विधानांनी शिवसेनेच्या उरात धडकी भरायला सुरुवात झाली आहे.

भाजपचे नेते रोज नव्या भूमिकांचा साक्षात्कार होत असल्यामुळे शिवसेनेच्या जीवाला घोर लागलाय. त्यामुळे 2014 विधानसभा निवडणुकीच्या कटू प्रसंगाला पुन्हा सामोरं जावं लागतं की काय याची चिंता शिवसेना नेतृत्वाला लागणं स्वाभाविक आहे. पण मुख्यमंत्र्यांचे हे ताजे बोल उद्धव ठाकरे यांना नक्कीच दिलासा देणारे आहेत.

मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला युतीसाठी आश्वस्त केलं असलं, तरी युतीत भाजपचाच वरचष्मा राहील याची सुद्धा त्यांनी काळजी घेतली आहे. मंगल प्रभात लोढा (mumbai bjp president) यांच्या नेतृत्त्व गुणांचं मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत वेगळं लढलं पाहिजे अशी भूमिका लोढा यांनी मांडली. त्यांनी भाजप कार्यकर्त्याला आत्मविश्वास दिला आणि 8 चे 42 नगरसेवक झाले. भाजपची ताकद दिसली, असं मुख्यमंत्री म्हणाले.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.