AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Girish Mahajan: खडसे पुन्हा चर्चेत, भाजपाला सोडचिठ्ठी दिल्यानंतरचा तो नेमका किस्सा काय?

भाजपमधील अंतर्गत मतभेदामुळेच एकनाथ खडसे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. विधान परिषदेच्या निवडणुकीपूर्वीच त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर मात्र, सत्तांतर झाले आणि सर्व चित्रच बदलून गेले आहे. आता खडसेंच्या मनात नेमके काय सुरु आहे हे महत्वाचे आहे.

Girish Mahajan: खडसे पुन्हा चर्चेत, भाजपाला सोडचिठ्ठी दिल्यानंतरचा तो नेमका किस्सा काय?
मंत्री गिरीश महाजन यांचे खळबळजनक वक्तव्य
| Updated on: Oct 02, 2022 | 8:20 PM
Share

जळगाव : मध्यंतरी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाच फोन केल्याची चर्चा रंगली होती. ऐवढेच नाही तर खडसे पुन्हा भाजपात (BJP Party) येणार अशी चर्चाही सुरु झाली होती. याबाबत एकनाथ खडसे यांनीच स्पष्टीकरण दिल्यानंतर चर्चेला पूर्णविराम मिळाला होता. आता पुन्हा खडसे चर्चेत आले आहेत ते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या वक्तव्याने. नाशिक येथील भाषण संपल्यानंतर एकनाथ खडसे हे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ आले होते. त्यावेळी त्यांनी बसू, काय ते मिटवून टाकू असे म्हटले होते. गिरीश महाजनांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पु्न्हा एकनाथ खडसेंच्या मनात नेमके काय सुरु आहे, याची चर्चा होत आहे.

जळगावातील एका कार्यक्रमानंतर गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी नाशिकमधील एकनाथ खडसेंचा तो काय किस्सा याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले. नाशिकमध्ये भाषण संपल्यानंतर एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन एकदा बसू, काय आहे ते मिटवून टाकू असे म्हणाल्याचे गिरीश महाजनांनी सांगितले आहे..

खडसेंच्या त्या वक्तव्यामुळे त्यांच्या मनात नेमके काय आहे ? याबाबत आता चर्चा सुरु झाली आहे. मात्र, त्या दरम्यान गर्दी जास्त असल्याने मला त्यांना सर्वकाही विचारता आले नसल्याचे गिरीश महाजनांनी सांगितले.

भाजपमधील अंतर्गत मतभेदामुळेच एकनाथ खडसे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. विधान परिषदेच्या निवडणुकीपूर्वीच त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर मात्र, सत्तांतर झाले आणि सर्व चित्रच बदलून गेले आहे. आता खडसेंच्या मनात नेमके काय सुरु आहे हे महत्वाचे आहे.

खडसेंनी बसू, मिटवून टाकू असे म्हणल्यानंतर आता मंत्रिमंडळाचा विस्तार बाकी आहे. त्यामुळे पक्षांतर्गत बैठका आणि निर्णय होणे महत्वाचे आहे. एकदा का ही प्रक्रिया पूर्ण झाली की, मग त्यांच्यासोबत बसून त्यांचे काय म्हणणे आहे ते ऐकूण घेतले जाणार असल्याचे महाजनांनी सांगितले.

एकनाथ खडसे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत नेमके काय झाले ? असे विचारले असता याबाबत देवेंद्र फडणवीसच अधिक व्यवस्थित सांगू शकतील असे महाजन म्हणाले आहे. महाजनांच्या गौप्यस्फोटानंतर खडसेंच्या मनात नेमकं काय सुरु आहे? याची जोरदार चर्चा होत आहे.

Follow Us
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी.
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का.
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक.
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,.
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर,
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर,.
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि.
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्.
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?.
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार.
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ.