Maharashtra Election 2024 : निवडणुकीत जप्त केलेल्या पैशांच पुढे काय होतं? जाणून घ्या
Maharashtra Election 2024 : निवडणूक काळात बऱ्याचदा मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली जाते. प्रत्येकवेळी जप्त केलेली रक्कम निवडणुकीशी संबंधित असेलच असं नाही. निवडणूक आयोगाने नेमलेल्या पथकांकडून जी रक्कम जप्त करण्यात येते, त्याचं पुढे काय होतं? ही रक्कम परत कशी मिळते? हा पैसा बेकायद असेल तर त्याचं पुढे काय होतं? ही सगळी प्रोसेस समजून घ्या.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. संध्याकाळी 6 वाजता प्रचार संपेल. आज अखेरच्या क्षणापर्यंत सर्वच राजकीय पक्ष, नेत, उमेदवार आणि कार्यकर्ते आपल्यापरीने जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील. आपल्या पक्षाचा विचार, धोरण आणि निवडणुकी जिंकल्यानंतर काय करणार? तो अजेंडा मतदारांना पटवून देण्याचा प्रयत्न करतील. पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष सत्तेत बसण्यासाठी मतदारांवर प्रभाव टाकण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील. महाराष्ट्रात केंद्रीय निवडणूक आयोगाने 15 ऑक्टोंबरला विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. 22 ऑक्टोंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली. 29 ऑक्टोंबर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती. महाराष्ट्रातील विधानसभेच्या 288 जागांसाठी 7 हजार 078 जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील 2 हजार 938 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. आता एकूण 4 हजार 140 उमेदवार रिंगणात आहेत. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी मुख्य लढत आहे. 20 नोव्हेंबर म्हणजे बुधवारी मतदान पार पडेल. त्यानंतर तीन दिवसांनी म्हणजे 23 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा...
