AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रामानुजाचार्य यांच्याबद्दल बोलताना मोदींकडून बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख! यामागचा नेमका संदर्भ काय?

Statue Of Equality : रस्पविरोधी असणारे दोन विचार एका सूत्रात बांधण्याची किमया रामानुजाचार्य यांच्याकडे होती. सामान्य माणसांसोबत कठीणातला कठीण विचार जोडण्याची किमया रामानुजाचार्य यांच्याकडे होती, असंही मोदी म्हणालेत.

रामानुजाचार्य यांच्याबद्दल बोलताना मोदींकडून बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख! यामागचा नेमका संदर्भ काय?
मोदींच्या भाषणातील आंबेडकरांचा उल्लेख आणि त्याचा नेमका संदर्भ काय?
| Updated on: Feb 05, 2022 | 7:43 PM
Share

हैदराबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते संत रामानुजाचार्य यांच्या अतिशय भव्य अशा मूर्तीचं लोकार्पण करण्यात आलं. वसंत पंचमीच्या मुहूर्तावर करण्यात आलेल्या या लोकर्पण सोहळ्यात मोदींनी संबोधित करताना रामानुजाचार्य यांच्या कार्याचा तर आढावा घेतलाच. शिवाय त्याचे विचारही किती अलौकिक आणि अमर होते, हे देखील आपल्या संबोधनात सांगितलं. विशेष म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांचाही उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी आपल्या भाषणा केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरही रामानुजाचार्य यांच्या विचारांनी प्रभावित झाले होते, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रामानुजार्चायांबाबात बाबासाहेब आंबेडकर काय म्हणायचे, हे देखील नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. समानतेचा संदेश देणाऱ्या संत रामानुजाचार्य (Ramanujacharya – Statue of Equality) यांच्या मूर्तीचा आणि आंबेडकर यांचा नेमका काय संबंध आहे, हे देखील जाणून घेणं महत्त्वाचंय.

नेमकं मोदी काय म्हणाले?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलं होतं, की रामानुजाचार्य यांच्याकडून शिका. बाबासाहेब रामानुजाचार्य यांची प्रशंसा करायचे आणि त्यांच्याकडून शिका असा संदेश अनेकांना द्यायचे, असं मोदींनी आपल्या संबोधनात म्हटलंय. समानतेचा संदेश देण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर रामानुजाचार्य यांच्या विचारांनी प्रभावित झाले होते, असं मोदींनी म्हटलंय.

भारतातील जातीभेद, धर्मभेद, वर्णभेद, अस्पृश्यता या सगळ्याच्याविरोधात बाबासाहेबांनी आपल्या उभ्या आयुष्यात लढा दिला होता. अनिष्ट चालीरीत, रुढी, परंपरा, अंधश्रद्धा यांच्याविरुद्ध बाबासाहेबांनी संघर्ष केला. समानतेचा संदेश देणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारात आणि संत रामानुजाचार्य यांच्या समानतेच्या संदेशातील समान दुवा मोदींनी आपल्या संबोधनात नमूद केलाय.

जाती धर्म नव्हे, गुण महत्त्वाचे!

रामानुजाचार्य यांच्या ज्ञानाची भव्यता अत्यंत महत्त्वाची आहे, असं मोदींनी म्हटलंय. परस्पविरोधी असणारे दोन विचार एका सूत्रात बांधण्याची किमया रामानुजाचार्य यांच्याकडे होती. सामान्य माणसांसोबत कठीणातला कठीण विचार जोडण्याची किमया रामानुजाचार्य यांच्याकडे होती, असंही मोदी म्हणालेत.

रामानुजाचार्य यांनी ज्ञानाचीही दिशा दिली. तर भक्तीचा मंत्रही दिला. एक हजार वर्षांपूर्वी रामानुजाचार्य यांनी अंधश्रद्धा, जुन्या अनिष्ट चालीरीत यांच्या भींती मोडून पाड्या. दलित, मागासलेल्यांना जवळ केल. ज्या जातींबाबत भेदभाव केला जात होता, त्यांनी विशेष सन्मान रामानुजाचार्य यांनी दिला, असंही मोदींनी म्हटलंय. रामानुजाचार्य त्यांनी सांगितलं की, संसारात जातीने नाही, तर गुणांनी कल्याण होतं.

एकदा दुसऱ्या जातीतील एका मित्राचे अंतिम संस्कार केले. तेव्हा रामानुजाचार्य यांनी भगवान श्री रामाची आठवण करुन दिली. त्यांनी सांगितलं की भगवान राम जटायूचं अंतिम संस्कार करु शकतात, तर भेदभावाचा आधारा धर्म कसा असू शकतो, हा एक मोठा संदेश आहे, असंही मोदींनी म्हटलंय. अध्यात्मातून व्यवहार शिकवण्याचंही काम रामानुजाचार्य यांनी केलं, असंही मोदींनी म्हटलंय.

संबंधित बातम्या :

Statue Of Equality: संत रामानुजाचार्यांचे विचार आजही जगाला मार्गदर्शक: नरेंद्र मोदी

PHOTO | Statue of Equality: पीएम मोदींच्या हस्ते रामानुजाचार्यांच्या पुतळ्याचे अनावरण, पहा पुतळ्याचे विलोभनीय फोटो

पाहा मोदींचं संपूर्ण भाषण :

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.