AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shivsena : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात शिवसेनेचा प्रतोद कोण? भावना गवळी की राजन विचारे? संभ्रम कायम

सोमवारपासून संसदीय पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. यामध्ये शिवसेनेचा मुख्य प्रतोद कोण असा सवाल उपस्थित होत आहे. कारण प्रतोदपदी असलेल्या भावना गवळी ह्या आता एकनाथ शिंदे गटाच्या संपर्कात आहेत. त्यामुळे सावध पवित्रा घेत खा. संजय राऊत यांनी शिवसेनेच्या प्रतोदपदी राजन विचारे यांची नियुक्ती करण्याचे पत्र लोकसभा सचिवालयांकडे दिले होते. मात्र, कोर्टाच्या निर्णयापर्यंत आता सचिवालयाने 'वेट अॅण्ड वॉच' ती भूमिका घेतलेली आहे.

Shivsena : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात शिवसेनेचा प्रतोद कोण? भावना गवळी की राजन विचारे? संभ्रम कायम
खा. भावना गवळी, पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि खा. राजन विचारे
| Edited By: | Updated on: Jul 15, 2022 | 2:48 PM
Share

मुंबई : विधानसभेत बहुमत चाचणीच्या दरम्यान (Shivsena) शिवसेनेचा मुख्य प्रतोद कोण असा सवाल उपस्थित झाला होता. आता हीच स्थिती (Parliamentary session) संसदेतील पावसाळी अधिवेशनात निर्माण होणार का असा सवाल उपस्थित होत आहे. कारण खा. भावना गवळी ह्या शिंदे गटाच्या संपर्कात आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी खा. राजन विचारेंची नियुक्ती होण्याचे पत्र (Lok Sabha Secretariat) लोकसभा सचिवालयाकडे खा. संजय राऊत यांनी दिले होते. मात्र, यावर कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे सोमवारपासून सुरु होत असलेल्या संसदीय पावसाळी अधिवेशनात शिवसेनेचा प्रतोद कोण ? हा पेच निर्माण झाला आहे. विधानसभेतील चित्र स्पष्ट होत नसताना आता लोकसभेतील प्रतोद पदावरुन पुन्हा एकदा सेनेची कोंडी झाली का असा सवाल उपस्थित होत आहे.

नेमके काय आहे प्रकरण?

सोमवारपासून संसदीय पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. यामध्ये शिवसेनेचा मुख्य प्रतोद कोण असा सवाल उपस्थित होत आहे. कारण प्रतोदपदी असलेल्या भावना गवळी ह्या आता एकनाथ शिंदे गटाच्या संपर्कात आहेत. त्यामुळे सावध पवित्रा घेत खा. संजय राऊत यांनी शिवसेनेच्या प्रतोदपदी राजन विचारे यांची नियुक्ती करण्याचे पत्र लोकसभा सचिवालयांकडे दिले होते. मात्र, कोर्टाच्या निर्णयापर्यंत आता सचिवालयाने ‘वेट अॅण्ड वॉच’ ती भूमिका घेतलेली आहे. याबाबत कोणतीही सुनावणी झालेली नाही. त्यामुळे सोमवारी पावसाळी अधिवेशनात शिवसेना प्रतोद म्हणून कुणाची उपस्थिती दर्शविणार हा मोठा प्रश्न आहे. याबाबत ज्यांची शिफारस केली त्यांना प्रतोद पद हे मिळालेले नाहीत तर भावना गवळी नेमक्या काय करणार हे देखील अद्याप स्पष्ट झालेले नाही.

राज्याच्या राजकारण, परिणाम देशाच्या राजधानीत

शिवसेनेतील आमदारांनी केलेले बंड सत्तांतराच्या माध्यमातून संपुष्टात आले असले तरी त्याचे परिणाम मात्र, कायम आहेत. कारण राज्यात आमदार, जिल्हा प्रमिख, नगरसेवक हे एवढेच शिंदे गटात सहभागी होतात असे नाही तर आता खासदारही शिंदे गटाच्या संपर्कात आहेत. यामध्ये भावना गवळी यांचे नाव आघाडीवर आहे. त्यामुळे राज्यात आमदारांचे झालेले बंडाचे लोण आता राजधानी दिल्लीपर्यंत जाऊन ठेपले आहे. खासदारांच्या या भूमिकेमुळे प्रतोदपदी कोण हा सवाल उपस्थित झाला आहे. शिवाय लोकसभा सचिवालयाने याबाबत स्पष्ट भूमिका न घेतल्याने यामधील तिढा अधिक गुंतागुंतीचा झाला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अवलंबून

सध्या शिंदे गट आणि शिवसेना यांच्यामधला वाद सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही. यामध्ये प्रतोद पदाचाही विषय आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय काय निकाल देणार यावरच लोकसभा सचिवालय आपली भूमिका ठरविणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.