AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Udhav Thackeray : ज्योतिषाला विचारून काय उपयोग? तुमचे भविष्य दिल्लीतील मायबाप ठरवितात, उद्धव ठाकरे यांची सडकून टिका..

Udhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्यात ठाकरी बाणा दाखविला..

Udhav Thackeray : ज्योतिषाला विचारून काय उपयोग? तुमचे भविष्य दिल्लीतील मायबाप ठरवितात, उद्धव ठाकरे यांची सडकून टिका..
ठाकरे यांचा हल्लाबोलImage Credit source: सोशल मीडिया
| Edited By: | Updated on: Nov 26, 2022 | 11:41 PM
Share

बुलढाणा : उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी बुलढाण्यातून खास ठाकरी शैलीतून राज्य सरकारचा समाचार घेतला. सरकारवर चौफेर टिका करत त्यांनी जाब विचारला. हे सरकार आश्वासनांची खैरात करणारं आहे, पण प्रत्यक्षात कोणाच्याच पदरात काहीच पडणार नसल्याचे, सांगायला ते विसरले नाहीत. मुख्यमंत्र्यांचा दैववादाच्या मुद्यावर त्यांनी खास ठाकरी शैलीत समाचार घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM Eknath Shinde) , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) , फुटलेले आमदार आणि सरकारी धोरणे यावर ठाकरे तुटून पडले.

गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री स्वतःचा हात दाखवायला गेले होते. आज ते कामाख्या देवीचा नवस फेडायला गेले आहेत. ज्यांना स्वतःचे भविष्य माहित नाही, ते आपलं काय भविष्य ठरविणार अशी घणाघाती टिका ठाकरे यांनी केली. त्यांनी ज्योतिष्याकडे हात दाखविल्याबद्दल मुख्यमंत्र्यावर जोरदार हल्लाबोल चढविला.

मुख्यमंत्र्यांची हात की सफाई आम्ही पाहिलेली आहे, संपूर्ण महाराष्ट्राने ती पाहिलेली असल्याचा टोमणा शिंदेंना त्यांनी लगावला. शिंदेंनी शिवसेनेतील 40 आमदार फोडल्याबाबत ठाकरे यांनी त्यांच्यावर तोंडसूख घेतले. मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांवरही त्यांनी टिका केली.

तुमचं भविष्य कुडमुड्या ज्योतिषाला कशाला विचारता, ते भविष्य, तुमचे माय-बाप दिल्लीत बसले आहेत, त्यांच्या हाती असल्याचा टोला, ठाकरे यांनी शिंदे यांना लगावला. शिंदे सरकारमागे दिल्लीश्वराचा हात आहे. त्यांच्याच इशाऱ्यावर राज्य सरकारचा कारभार सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला.

सध्याचं राज्यातील सरकार केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर नाचत असल्याचा आरोप त्यांनी चिखली येथील जाहीर सभेत केला. केंद्राच्या तालावर हे सरकार काम करत आहे आणि हिंदुत्वाच्या मुद्यावर सत्तेतून बाहेर पडल्याची शेखी मिरवत असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.