AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

योगी सरकारचा प्रताप; शायरांची नावे बदलून नव्या वादाला तोंड…अकबर इलाहाबादींचे केले प्रयागराजी

प्रसिद्ध हिंदी कथाकार राजेंद्र कुमार यांनी शायरांची नावे बदलण्याच्या खोडसाळपणावर आक्षेप नोंदवत हा मुर्खपणाचा कळस असल्याची टीका केली आहे.

योगी सरकारचा प्रताप; शायरांची नावे बदलून नव्या वादाला तोंड...अकबर इलाहाबादींचे केले प्रयागराजी
प्रसिद्ध शायर अकबर इलाहाबादी.
| Edited By: मनोज कुलकर्णी | Updated on: Dec 29, 2021 | 11:02 AM
Share

लखनौः जे न देखे रवी, ते देखे कवी म्हणतात…मात्र, योगी सरकारची दूरदृष्टी इतकी पल्याडची आहे की, त्यांनी चक्क या कवी आणि शायरांचीच नावे एका झटक्यात बदलून नव्याच वादाला तोंड फोडले आहे. निवडणुकीच्या तोंडावर राजकारणाचा स्तर इतका घसरावा, याबद्दल साहित्य वर्तुळातून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अनेकांनी हा सरकारच्या मुर्खपणाचा कळस असल्याची टीका केली आहे.

प्रकरण नेमके काय?

योगी सरकारने अलाहाबादचे नामकरण केले. ते आता प्रयागराज म्हणून ओळखले जाते. शायरीच्या दुनियेत जगभर प्रसिद्ध असणारे नाव अकबर इलाहाबादी. अकबर इलाहाबादी हे अलाहाबादचे. त्यामुळे ते आडनाव म्हणून इलाहाबादी हा शब्द लावत. मात्र, आता शहराचे नाव बदलले म्हणून या सुप्रसिद्ध शायराचे आडनाव बदलण्याचा खोडसाळपणा प्रशासनाने केला आहे. त्यांचे नाव अकबर इलाहाबादी ऐवजी आता अकबर प्रयागराज असे करण्यात आले आहे. इतकेच नाही, तर राशिद इलाहाबादी, तेग इलाहाबादी यांची नावेही बदलण्यात आली आहेत. त्यांच्या नावातील इलाहाबादी शब्दांऐवजी तिथे प्रयागराज असा उल्लेख करण्यात आला आहे.

वेबासाईटवरही नावे बदलली

उत्तर प्रदेशची ओळख गंगाजमनी तहजीबचा सुंदर मिलाफ अशी आहे. मात्र, इथे योगी सरकारच्या पावलाच्या पुढे पाऊल टाकण्याचे काम इथले शिक्षण विभाग करताना दिसत आहे. त्यांनी आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर ही बदलेली नावे झळकावली आहेत. त्यामुळे अलम शायरीच्या दुनियेत जगभरात वादळ उठले आहे. उच्चशिक्षण आयोगाने आपल्या वेबसाईटवर ‘अबाऊट अस’ नावाच्या कॉलममध्ये अलाहाबाद हा सबकॉलम दिलाय. तिथे क्लिक करताच शहराचा इतिहास सांगणारे पेज समोर येते. त्यावर शायरांच्या नावांचा उल्लेख इलाहाबादी ऐवजी प्रयागराजी असा केला आहे. अकबर प्रयागराजी, राशिद प्रयागराजी, तेग प्रयागराजी…या नव्या नावामुळे साहित्य वर्तुळातून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.

मुर्खपणाचा कळस…

प्रसिद्ध हिंदी कथाकार राजेंद्र कुमार यांनी या खोडसाळपणावर आक्षेप नोंदवत हा मुर्खपणाचा कळस असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणावर प्रतिक्रिया देताना त्यांनी संताप व्यक्त केला. शायराचे नाव ही त्यांची कालातीत ओळख असते. त्याचे नाव बदलने अयोग्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर प्रसिद्ध शायर श्लेष गौतम यांनी अकबर इलाहाबादी यांची ओळख पुसण्याचा अधिकार कोणालाही नाही, अशा शब्दांत योगी सरकारवर टीका केली आहे.

इतर बातम्याः

Video| माणुसकीला काळीमा, स्मशानातच सरणाची लाकडे घेऊन तुंबळ हाणामारी; नाशिकमध्ये कवी पाठारेंच्या अंत्यसंस्काराप्रसंगी आक्रीत

रिलायन्समध्ये होणार नेतृत्वबदल; मुकेश अंबानींनी दिले निवृत्तीचे संकेत, कोण होणार उत्तराधिकारी?

पाकिस्तानचा मजनू, बॉर्डर पार करुन मुंबईत, लैला नेमकी कुठं गेली? सोशल मीडियावरची दिवानी लव्ह स्टोरी

Follow Us
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट.

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?.

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?

तेलाचे भाव भडकले, अमेरिकेचे इराणमधील 5 शहरांवर हल्ले, भारताला फटका, होर्मुज खाडीतून...

तेलाचे भाव भडकले, अमेरिकेचे इराणमधील 5 शहरांवर हल्ले, भारताला फटका, होर्मुज खाडीतून..

भाजपच्या बड्या नेत्याने रात्री उशिरा रुग्णालयात घेतली सोनम वांगचूक यांची भेट; काय घडलं?.

भाजपच्या बड्या नेत्याने रात्री उशिरा रुग्णालयात घेतली सोनम वांगचूक यांची भेट; काय घडलं?

Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा.

Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा