AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात एकाच दिवशी पाच रुग्णांना डिस्चार्ज, महाराष्ट्राला मोठा दिलासा

महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना एक दिलासादायक माहिती समोर आली आहे (Five Corona Patient successfully recover ). पुण्याच्या नायडू रुग्णालयात आणखी तिघांची प्रकृती सुधारली असून त्यांनादेखील डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुण्यात एकाच दिवशी पाच रुग्णांना डिस्चार्ज, महाराष्ट्राला मोठा दिलासा
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Mar 26, 2020 | 12:34 AM
Share

पुणे : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना एक दिलासादायक माहिती समोर आली आहे (Five Corona Patient successfully recover ). पुण्याच्या नायडू रुग्णालयात आणखी तिघांची प्रकृती सुधारली असून त्यांनादेखील डिस्चार्ज देण्यात आला आहे. या रुग्णांना डिस्चार्ज देण्याअगोदर एका दाम्पत्याला डिस्चार्ज देण्यात आलं होतं. त्यानंतर तीन रुग्णांचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतर त्यांनाही डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे नायडू रुग्णालयातून आज पाच रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला (Five Corona Patient successfully recover ).

तीनही रुग्ण पहिल्या कोरोनामुक्त दाम्पत्याच्या सहवासातील आहेत. एक या दाम्पत्याची मुलगी, दुसरा या दाम्पत्याच्या टॅक्सीचा चालक आणि तिसरा यांचा सहप्रवासी आहे. तिघांची पहिली टेस्ट निगेटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांची दुसरी टेस्ट एनआयव्हीकडून पुन्हा निगेटिव्ह आली. त्यामुळे या तीनही कोरोनामुक्त नागरिकांना रात्रीच डिस्चार्ज देण्यात आला.

तिघांनाही 10 मार्चला नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर 14 दिवसांनी त्यांची पहिली टेस्ट करण्यात आली. ही टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर दुसरी टेस्ट निगेटीव आली. मात्र घरी सोडल्यानंतर त्यांना 14 दिवस होम क्वारंटाईन ठेवण्यात येणार आहे.

दरम्यान, नायडू रुग्णालयातून डिस्चार्ज मिळत असताना पहिल्या कोरोनामुक्त दाम्पत्याने रुग्णालयाचे सर्व कर्मचारी आणि डॉक्टरांचे पत्रामार्फत आभार मानले.

पहिल्या कोरोनामुक्त दाम्पत्याचे पत्र

सप्रेम नमस्कार,

नायडू आणि ससून रुग्णालयातील सर्व डॉक्टर, नर्स, स्टाफ आणि अधिष्ट,

मी आणि माझी पत्नी नायडू रुग्णालयात 9 मार्च 2020 रोजी टेस्टसाठी अॅडमीट झालो होतो. टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे आम्ही रुग्णालयात दाखल झालो. आम्ही डॉक्टरांच्या सहाय्यानुसार नियमांचे तंतोतंत पालन केले आणि 14 दिवस पूर्ण झाल्यावर 15 व्या दिवशी आणि 16 व्या दिवशी टेस्ट घेतली. या दोन्ही टेस्ट निगेटीव्ह आल्यामुळे आम्हाला दोघांना घरी सोडत आहेत. आम्ही या कोरोनापासून मुक्त निरोगी झालो आणि बाकीचे पेशंटही बरे होणार याची खात्री आहे. पण सर्वांनी नियमांचे पालन करावे. माननीय पंतप्रधान, आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि इतर मेडिकल स्टाफ आणि सर्व सरकारी अधिकारी ज्या सूचना करतात त्याचे पालन केले तर या रोगाला हटवू शकता.

आम्ही पुन्हा एकदा नायडू रुग्णालयाचे सर्व डॉक्टर, स्टाफ, ससून रुग्णालयातील सर्व डॉक्टर, स्टाफ यांचे आणि पुणे मनपा सर्व अधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आरोग्य सेवा सर्वांना मिळेल ही अपेक्षा व्यक्त करतो.

मुंबईतही 8 जणांना डिस्चार्ज 

मुंबईतही कस्तुरबा रुग्णालयातील 12 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 8 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. इतर चौघांनाही लवकरच डिस्चार्ज दिला जाणार आहे. डिस्चार्ज मिळालेल्या आठही रुग्णांना पुढचे 14 होम क्लारंटाईनमध्ये राहावं लागणार आहे. कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि संपूर्ण प्रशासन प्रचंड मेहनत घेत आहे. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळताना दिसत आहे.

संबंधित बातम्या :

पुण्यातील ‘कोरोना’मुक्त दाम्पत्यावर राज्य सर्वेक्षण अधिकाऱ्यांची भावनिक कविता

बीडमध्ये संचारबंदीवरुन पोलीस-नागरिकांमध्ये हाणामारी

Follow Us
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय.

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!.

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!

इंग्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतरही भारतीय संघाला मोठा फायदा, शुभमन गिल, विराट कोहली आणि रोहितला मिळाली आनंदाची बातमी.

इंग्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतरही भारतीय संघाला मोठा फायदा, शुभमन गिल, विराट कोहली आणि रोहितला मिळाली आनंदाची बातमी

CJP Delhi Protest : आधी वांगचूक यांची भेट नंतर केंद्र सरकारचं मोठं पाऊल, CJP ची भेट घेणार; मागण्यांचं काय होणार?.

CJP Delhi Protest : आधी वांगचूक यांची भेट नंतर केंद्र सरकारचं मोठं पाऊल, CJP ची भेट घेणार; मागण्यांचं काय होणार?

मी जंतरमंतरवर कधीच जाणार नाही, तिथे देशद्रोही लोक..; प्रसिद्ध गीतकाराची रोखठोक भूमिका.

मी जंतरमंतरवर कधीच जाणार नाही, तिथे देशद्रोही लोक..; प्रसिद्ध गीतकाराची रोखठोक भूमिका