AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Zodiac Signs | विवाहाचं नाव ऐकूनही घामटं फुटतं, ‘या’ चार राशींच्या व्यक्ती लग्नापासून का धूम ठोकतात?

बरेच जण लग्न करण्याचे स्वप्न पाहतात. मात्र लग्नाच्या वेळेपर्यंत त्यांना बर्‍याच बदलांची भीती वाटते, त्यामुळे अनेक समस्या उद्भवतात.

Zodiac Signs | विवाहाचं नाव ऐकूनही घामटं फुटतं, 'या' चार राशींच्या व्यक्ती लग्नापासून का धूम ठोकतात?
Zodiac Signs
| Edited By: | Updated on: Sep 05, 2021 | 3:00 PM
Share

मुंबई : काही जण बोहल्यावर चढण्यासाठी अक्षरशः गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले असतात. आपल्या आयुष्यातील त्या खास दिवसासाठी त्यांनी मनात मोठमोठ्या योजनाही आखलेल्या असतात. आपले उर्वरित आयुष्य जोडीदारासोबत घालवण्यासाठी त्यांना धीर धरवत नाही. ते लग्नाबद्दल खूपच उत्साही असतात आणि एका विशिष्ट वयानंतर स्वतःचा जोडीदार शोधण्यासाठी त्यांची धडपड सुरु असते. मात्र काही जण असेही असतात, जे लग्न करण्याच्या कल्पनेलाही घाबरतात.

लग्नाच्या बाबतीत या लोकांच्या मनात खूप भीती असते आणि म्हणूनच ते एका व्यक्तीसोबत आयुष्य व्यतीत करण्यास फारसे उत्सुक नसतात. ज्योतिष शास्त्रानुसार, राशिचक्रातील चार राशी अशा आहेत, ज्यांचे हात-पाय लग्नाच्या साध्या कल्पनेनेही थंड पडतात.

कन्या रास (Virgo)

कन्या राशीच्या व्यक्ती अत्यंत उच्च दर्जाचे जीवन व्यतीत करणे पसंत करतात. त्यांना तडजोड मान्य नसते आणि म्हणूनच त्यांना परफेक्शनिस्ट असंही म्हटलं जातं. त्यांना लग्नाच्या संकल्पनेने फारसं रोमांचित वाटत नाही, कारण त्यांची धारणा असते की कोणीही त्यांच्या अपेक्षा आणि स्टँडर्ड पूर्ण करु शकणार नाही.

वृश्चिक रास (Scorpio)

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आपले मन मोकळे करणे नीटसे जमत नाही. ही त्यांची सवय त्यांना लग्नबंधनात अडकण्यापासून भयकंपित करते. त्यांना वाटते की ते आपल्या जोडीदारापाशी त्यांच्या भावना त्यांना हव्या तितक्या उत्कटपणे व्यक्त करू शकणार नाहीत.

धनु रास (Sagittarius) 

धनु राशीच्या व्यक्ती अत्यंत उत्साही असतात. त्यांच्या आयुष्यात नकारात्मकता किंवा नाटकीपणाला स्थान नाही. लग्नासोबत अनेक जबाबदाऱ्या आणि समस्या येतात, असा त्यांचा समज असतो. म्हणूनच ते लग्न करण्याच्या कल्पनेला घाबरतात.

मीन रास (Pisces)

मीन राशीचे लोक अद्वितीय आणि अपारंपरिक असतात. ते इतरांमध्ये सहजासहजी मिसळत नाहीत आणि म्हणूनच ते लग्न करण्यास फारसे उत्सुक नसतात. त्यांना वाटते की त्यांचा जीवनसाथी त्यांची मानसिकता आणि विचार प्रक्रिया समजून घेणार नाही.

बरेच जण लग्न करण्याचे स्वप्न पाहतात. मात्र लग्नाच्या वेळेपर्यंत त्यांना बर्‍याच बदलांची भीती वाटते, त्यामुळे अनेक समस्या उद्भवतात.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा

संबंधित बातम्या :

Zodiac Signs | जोडीदारासोबतच पक्के मित्र असतात या राशीच्या व्यक्ती, ठरतात सर्वोत्तम जोडपे

Zodiac Signs | या 4 राशीच्या व्यक्ती जोखीम घेताना कधीही मागेपुढे पाहात नाही, नेहमी आव्हानांसाठी असतात तयार

डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.